शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

आवास योजनेतून वसतंय एक शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:46 IST

एकेक घर मिळून छोटं गाव बनतं. छोट्या गावाचं मोठ्या गावात अन् मोठ्या गावाचं नगरात रूपांतर होतं.

- बाळासाहेब बोचरेएकेक घर मिळून छोटं गाव बनतं. छोट्या गावाचं मोठ्या गावात अन् मोठ्या गावाचं नगरात रूपांतर होतं. पण इथं मात्र थेट एक नगरच वसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सोलापुरात राबवला जातो. त्याचं नाव आहे ‘रे नगर’ असंघटित क्षेत्रातील अल्प उत्पन्न गटातील ३० हजार कुटुंबांना घरे देण्याचा प्रकल्प म्हणजे सोलापूरजवळ एक स्वतंत्र नगरच वसविलं जातंय...एकेक घर मिळून छोटं गाव बनतं. छोट्या गावाचं मोठ्या गावात अन् मोठ्या गावाचं नगरात रूपांतर होतं. पण इथं मात्र थेट एक नगरच वसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सोलापुरात राबवला जातोय. त्याचं नाव आहे, रे नगर. कामगारांच्या हितासाठी काम करणारा मार्क्सवादी पक्ष अजूनही कामगारांच्या विषयापासून दूर गेलेला नाही. सोलापूरचे माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापुरातील विडी कामगारांसाठी शासकीय योजनेतून १५ हजार घरांचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी असंघटित क्षेत्रातील अल्प उत्पन्न गटातील ३० हजार कुटुंबांना घरे देण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. पंतप्रधान आवास योजनेतून त्यांनी हा प्रकल्प मंजूर करून आणला असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच सुमारे एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेलं हे स्वतंत्र शहर सोलापूरजवळ अक्कलकोट रोडवर तयार होणार आहे. सोलापूरचं ‘रे नगर’ हे आवास योजनेचं मॉडेल असून या प्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम यांनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास लखनौला बोलावून घेतले. प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटी आणि अमृत योजनाअंतर्गत देशभरातील गृहनिर्माण प्रकल्पावर लखनौ येथे कार्यशाळा झाली. त्यामध्ये सोलापूरच्या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. शिवाय या प्रकल्पाचे कौतुक आंतरराष्टÑीय पातळीवरही झाले आहे. नेदरलॅँडमध्ये या गृहनिर्माण प्रकल्पाबद्दल आडम यांना प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अल्प उत्पन्न गटातील कमी शिकलेल्या कामगार वर्गाला कायदेशीर बाबींची पूर्तता करून सवलतीत घर मिळवणे जिकिरीचे असते. अशा एकेका कामगाराला घर मिळवून देता देता आडम मास्तर म्हणजे गोरगरिबांना घरे मिळवून देणारे कामगार नेते म्हणूनच नावारूपाला आले. वास्तविक देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना डाव्या आघाडीच्या या प्रवर्तकाला प्रकल्प मंजुरी मिळवणे म्हणजे सोपे काम नाही. पण नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या या नेत्याने सरकारच्या मानगुटीवर बसून प्रकल्प मंजूर करून आणला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या नेत्याच्या चिकाटीचे अन् योजनेचे कौतुक केले. गोदूताई विडी घरकूल प्रकल्प पूर्ण केल्यानंतर मास्तरांकडे घरे मागणाºयांची संख्या वाढली. घर उभं करताना लागणारी कागदपत्रे आणि ती दिली तरी बँक कर्ज देईलच याची शाश्वती नसल्याने हत्बल झालेले शेकडो सापडले. अशा गरजू कामगारांना त्यांनी एकत्र केले. त्यांनी कुंभारीजवळ स्वस्तात जागा विकत घेतली. त्याचे प्लॉट पाडले. गरजू लाभार्थींचे दाखले अन् उतारे गोळा केले. सगळा प्रकल्प बँकेला सादर केला. बँकेने अगदी हसत कर्ज मंजूर केले आणि प्रकल्प सुरू झाला. शे-दोनशे घरे एकत्र करून एखादं खेडेगाव नीटसे वसवणे अवघड असते. तिथे या किमयागाराने ३० हजार घरांची रचना करून ठेवली आहे. एक नगरच वसविलं आहे. ज्यांच्या नशिबी झोपडपट्टीशिवाय दुसरे काही आले नसते. ज्यांना आपले घर होईल की नाही याची आशा नव्हती अशांच्या स्वप्नात आशेचा किरण निर्माण केला आहे. म्हणूनच या वसाहतीला रे नगर असं म्हटलं जातं. कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जाणाºया सोलापूर शहरात रे नगर नावाचं एक मॉडेल शहर आकारला आलंय.