शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

चित्रगुप्तांची इंद्रदेवांकडे धाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:11 IST

​​​​​​​इंद्र लोकांचा स्टार रिपोर्टर आपला यमके आज खूपच वैतागलेला होता.

- राजा मानेइंद्र लोकांचा स्टार रिपोर्टर आपला यमके आज खूपच वैतागलेला होता. इंद्रदरबारात हजर राहण्याचे फर्मान निघाले होते. सुनावणीचा विषय मात्र त्याला माहीत नव्हता. महागुरू नारदमुनीही त्याला काहीच सांगत नव्हते. आरक्षण, जळगाव, सांगली किंवा दुबार पेरणी अशा विषयांची यादी त्याच्या डोक्यात गोंधळ घालू लागली होती. तो दरबाराला हजर राहण्याच्या तयारीत होता. तोच नारदांचा फोन आला... नारायण... नारायण... (यमकेने फोन उचलला)यमके : प्रणाम महागुरू. मी निघण्याच्याच तयारीत होतो.नारद : निघतोयस पण सुनावणी कशाची आहे? मी तुला टिप्स देतो. तू ओळख. पहिली टीप... चित्रगुप्त!यमके : आता हे नवीन काय गुरुदेव?पाप-पुण्याचा हिशेब लावणाऱ्या धर्मराज चित्रगुप्तांचा दरबाराशी काय संबंध?नारद : संबंध आहे. मराठी भूमीत आरक्षण मुद्यावरून मराठा समाजाने आंदोलन छेडले. आता इतर समाजांचीही तशीच मालिका सुरू होऊ पाहते आहे...यमके : हे खरे आहे. तरीही इथे चित्रगुप्तांचा काय संबंध?नारद : आंदोलन असू दे नाही तर तुमच्या मराठी भूमीतील निवडणुकीचे राजकारण असू दे, इंद्रदरबाराचा संबंध येतोच.यमके : राजकारणाचं बोलाल तर सध्या देवेंद्रभाऊ-चंद्रकांतदादा आणि मोदींच्या भाजपची चलती आहे.नारद : आता तू इंद्रदरबारातील सुनावणीच्या विषयाकडे निघालेला आहेस.यमके : जळगाव, सांगली महापालिकेत परिवर्तन झाले. ते लोकांनीच केले. मग इंद्रदरबार सुनावणी आणि चित्रगुप्तांचा संबंध येतोच कुठे?नारद : संबंध नसलेले लोक आंदोलनात घुसू शकतात. मग इंद्रदरबाराच्या सुनावणीत हे विषय घुसले तर आश्चर्य कशाला वाटावे.यमके : गुरुदेव कृपया कोड्यात बोलू नका! सुनावणीचा विषय काय आहे, तो थेट सांगा.नारद : ठीक आहे, सांगतो. पाप-पुण्याचे अकाऊंट ठेवता ठेवता चित्रगुप्ताचे कॉम्प्युटर वारंवार हँग होत आहे. त्यात माझ्याच माध्यमातून स्वर्गलोकातील एका गटाने राजकारणातील धनशक्ती या विषयाचा स्वतंत्र हिशेब ठेवण्याची मागणी इंद्रदेवांकडे केली आहे.यमके : हे घडले कसे?नारद : शिष्या, तुझे आजकाल लक्ष दिसत नाही. सांगलीच्या निवडणुकीत भाजपानेच धनशक्तीचा वापर केल्याचा दावा डॉ. पतंगरावसूत बाळ विश्वजितने केला आणि हा विषय सुरू झाला.यमके : आता आपण काय करायचे?नारद : काही नाही. इंद्रदरबारात हजर राहायचे. राजकारणातील धनशक्तीचा विषय एवढा मोठा आहे की, त्यात आपल्याला ‘मम’ म्हणण्याच्या पलीकडे काहीही राहणार नाही.यमके : गुरुदेव लोकनेते वसंतदादा आणि सुरेशदादा यांच्या सांगली-जळगावमधील परिवर्तनाची कारणे सर्वांनाच माहीत आहेत. सांगलीत जयंतराव-विश्वजित कंपूने त्रयस्तपणे आत्मचिंतन केल्यास त्यांना उमजेल. जळगावातील नाथाभाऊ अन् दादांना तर सगळेच माहीत आहे.नारद : मराठी भूमीतील सर्वच राजकारण्यांना संदेश देण्यासाठीच कदाचित इंद्रांनी धनशक्तीसंदर्भात दरबार बोलावला असावा. विश्वासपूर्ण लोकशक्तीचा पुरावा न दिल्यास राजकारण्यांची नावे स्वीस बँकेच्या नाही तर चित्रगुप्तांच्या यादीत पोहोचतील एवढेच!

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस