शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

चिनी दादागिरी

By admin | Updated: July 27, 2016 03:43 IST

चीन आणि भारत या दोन्ही शेजाऱ्यांकडे जग भविष्यातील जागतिक महासत्ता म्हणून बघत आहे. भारताची पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती आणि चीनमधील माओप्रणित क्रांती

चीन आणि भारत या दोन्ही शेजाऱ्यांकडे जग भविष्यातील जागतिक महासत्ता म्हणून बघत आहे. भारताची पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती आणि चीनमधील माओप्रणित क्रांती या दोन्ही घडामोडी आगेमागेच घडल्या असल्या तरी, साम्यवादी शिस्तीच्या बडग्याच्या बळावर चीन विकासाच्या बाबतीत भारताच्या बराच पुढे निघून गेला आहे. गत काही वर्षांपासून तर चीन स्वत:ला महासत्ता समजूनच वागायला लागला आहे. अगदी अमेरिकेसारख्या महासत्तेलाही धमकावण्यापर्यंत चीनची मजल गेली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनाही तो देश भीक घालत नसल्याचे, दक्षिण चीन सागर प्रकरणाच्या निमित्ताने नुकतेच जगाला दिसले. आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयास जुमानत नसल्याचे ठणकावल्यावरही आपले कुणी काहीही वाकडे करू शकत नाही, हे बघून शेफारलेल्या चीनने शेजारी देशांना कस्पटाप्रमाणे वागणूक देण्यास प्रारंभ केला आहे. अशात गत काही दिवसात भारताने दोनदा चीनला सडेतोड जबाब दिल्यामुळे त्या देशाचा अगदी तिळपापड झाल्याचे, चिनी प्रसारमाध्यमांमध्ये उमटत असलेल्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. लडाखमध्ये भारत-चीन सीमारेषेलगत १०० रणगाडे तैनात करून, भारताने नुकताच चीनला मोठा धक्का दिला. त्यामुळे झालेला चीनचा दाह शांत होण्यापूर्वीच, वेगवेगळी नावे धारण करून संवेदनशील ठिकाणांना वेळोवेळी भेटी देणाऱ्या तीन चिनी पत्रकारांंना देश सोडण्याची तंबी भारताने काही दिवसांपूर्वी दिली. लागोपाठ घडलेल्या या दोन घडामोडींमुळे ड्रॅगनच्या शेपटाला किती भयंकर आग लागली आहे, याची प्रचिती ‘ग्लोबल टाइम्स’या सरकारी मालकीच्या दैनिकाने भारताविरुद्ध सोडलेल्या फुत्कारांवरून येते. चिनी पत्रकारांच्या हकालपट्टीचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील, अशी धमकीच ‘ग्लोबल टाइम्स’ने दिली आहे. तत्पूर्वी, भारताने लडाखमध्ये रणगाडे तैनात केले तेव्हाही, भारताच्या अशा कृतीमुळे भारतातील चिनी गुंतवणुकीवर विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशारा याच वर्तमानपत्राने दिला होता. विकासाची भूक प्रदीप्त झालेल्या भारताला मिळेल तेथून गुंतवणूक हवी आहे, हे खरे आहे; पण चीनलाही भारताच्या विशाल बाजारपेठेची तेवढीच गरज आहे, हे चीनने विसरता कामा नये. सध्या चिनी अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले आहे. युरोप व अमेरिकेला होणारी चीनची निर्यात मोठ्या प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे भारताला जेवढी चीनची गरज आहे, तेवढीच गरज चीनलाही भारताची आहे. मध्यंतरी भारत अद्यापही १९६२ मधील युद्धाच्या छायेतून बाहेर पडला नसल्याची टीका चीनने केली होती. प्रत्यक्षात मात्र चीनच अजूनही १९६२ मधील मानसिकतेतून बाहेर पडला नसल्याचे चीनच्या धमक्यांवरून दिसते. दादागिरीमुळे आपण भारताला अमेरिकेच्या गोटात ढकलून आपल्या विरोधात एक मजबूत आघाडी उभी राहायला मदत करीत आहोत, हे चीनला कळायला हवे.