शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

मुख्यमंत्री कोणाचे?

By admin | Updated: January 31, 2017 04:59 IST

दर पाच वर्षांनी कोणत्या ना कोणत्या निवडणुकांचे बिगुल वाजते. सत्ताधारी-विरोधकात रणसंग्राम सुरू होतो, प्रचाराची राळ उठते, आरोप-प्रत्त्यारोपांची धुळवड साजरी होते.

दर पाच वर्षांनी कोणत्या ना कोणत्या निवडणुकांचे बिगुल वाजते. सत्ताधारी-विरोधकात रणसंग्राम सुरू होतो, प्रचाराची राळ उठते, आरोप-प्रत्त्यारोपांची धुळवड साजरी होते. त्यात सत्तेच्या हव्यासापायी परस्परांची इतकी उणीदुणी काढली जातात की ते पाहून आणि ऐकून मतदार बुचकळ्यात पडतात. नेत्यांचे खरे रूप कोणते हेच कळेनासे होते. राजसिंहासनासाठी मग कोणाला महाभारत आठवते, त्यातील कौरव-पांडव, शकुनीमामा आठवतात तर कोण कोणाची औकात काढून एकमेकांना पाणी पाजण्याचीही भाषा करतो. कोण कोणाविरुद्ध काय बोलतो या गोष्टी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. गेल्या पंचवीस वर्षांपासून एकमेकांच्या हातात हात (सोयीने) घेऊन वाटचाल करणाऱ्या शिवसेना-भाजपाची युती काल-परवा संपुष्टात आली आणि उभय पक्षांकडून एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकण्यापर्यंत मजल गेली. सारेच राजकीय पक्ष जनमताचा कौल आजमावण्यासाठी आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्याच आयुधांचा वापर करतात. आरोपाला प्रत्त्युत्तर देतात. राजकीय पक्षांपुरते हे ठीक आहे; परंतु राज्याचा प्रथम नागरिक ज्यावेळी इतक्या टोकाची भाषा वापरून वा कोणे एकेकाळच्या मित्रपक्षाला चिथावणी देणारे वक्तव्य करीत असेल तर ते मुख्यमंत्री नेमके कोणाचे, राज्याचे की विधानसभेत ते ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्या पक्षाचे असा प्रश्न आम जनतेत उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, या दोन्हीही महनीय पदांवरील व्यक्ती देश आणि राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतात, त्यामुळे त्यांनी स्वपक्षाऐवजी त्या पदाची प्रतिष्ठा राखणे गरजेचे असते. लोकशाहीची मूल्ये जर तिचे रक्षण करणारेच अशा रितीने पायदळी तुडविणार असतील तर पक्षाचे प्रमुख किंवा अन्य नेत्यांच्या वक्तव्याबाबत काय अपेक्षा करायची?