शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कोणाचे?

By admin | Updated: January 31, 2017 04:59 IST

दर पाच वर्षांनी कोणत्या ना कोणत्या निवडणुकांचे बिगुल वाजते. सत्ताधारी-विरोधकात रणसंग्राम सुरू होतो, प्रचाराची राळ उठते, आरोप-प्रत्त्यारोपांची धुळवड साजरी होते.

दर पाच वर्षांनी कोणत्या ना कोणत्या निवडणुकांचे बिगुल वाजते. सत्ताधारी-विरोधकात रणसंग्राम सुरू होतो, प्रचाराची राळ उठते, आरोप-प्रत्त्यारोपांची धुळवड साजरी होते. त्यात सत्तेच्या हव्यासापायी परस्परांची इतकी उणीदुणी काढली जातात की ते पाहून आणि ऐकून मतदार बुचकळ्यात पडतात. नेत्यांचे खरे रूप कोणते हेच कळेनासे होते. राजसिंहासनासाठी मग कोणाला महाभारत आठवते, त्यातील कौरव-पांडव, शकुनीमामा आठवतात तर कोण कोणाची औकात काढून एकमेकांना पाणी पाजण्याचीही भाषा करतो. कोण कोणाविरुद्ध काय बोलतो या गोष्टी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. गेल्या पंचवीस वर्षांपासून एकमेकांच्या हातात हात (सोयीने) घेऊन वाटचाल करणाऱ्या शिवसेना-भाजपाची युती काल-परवा संपुष्टात आली आणि उभय पक्षांकडून एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकण्यापर्यंत मजल गेली. सारेच राजकीय पक्ष जनमताचा कौल आजमावण्यासाठी आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्याच आयुधांचा वापर करतात. आरोपाला प्रत्त्युत्तर देतात. राजकीय पक्षांपुरते हे ठीक आहे; परंतु राज्याचा प्रथम नागरिक ज्यावेळी इतक्या टोकाची भाषा वापरून वा कोणे एकेकाळच्या मित्रपक्षाला चिथावणी देणारे वक्तव्य करीत असेल तर ते मुख्यमंत्री नेमके कोणाचे, राज्याचे की विधानसभेत ते ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्या पक्षाचे असा प्रश्न आम जनतेत उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, या दोन्हीही महनीय पदांवरील व्यक्ती देश आणि राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतात, त्यामुळे त्यांनी स्वपक्षाऐवजी त्या पदाची प्रतिष्ठा राखणे गरजेचे असते. लोकशाहीची मूल्ये जर तिचे रक्षण करणारेच अशा रितीने पायदळी तुडविणार असतील तर पक्षाचे प्रमुख किंवा अन्य नेत्यांच्या वक्तव्याबाबत काय अपेक्षा करायची?