शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
4
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
7
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
8
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
9
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
10
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
11
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
15
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
16
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
17
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
18
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
19
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
20
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

मुख्यमंत्री कोणाचे?

By admin | Updated: January 31, 2017 04:59 IST

दर पाच वर्षांनी कोणत्या ना कोणत्या निवडणुकांचे बिगुल वाजते. सत्ताधारी-विरोधकात रणसंग्राम सुरू होतो, प्रचाराची राळ उठते, आरोप-प्रत्त्यारोपांची धुळवड साजरी होते.

दर पाच वर्षांनी कोणत्या ना कोणत्या निवडणुकांचे बिगुल वाजते. सत्ताधारी-विरोधकात रणसंग्राम सुरू होतो, प्रचाराची राळ उठते, आरोप-प्रत्त्यारोपांची धुळवड साजरी होते. त्यात सत्तेच्या हव्यासापायी परस्परांची इतकी उणीदुणी काढली जातात की ते पाहून आणि ऐकून मतदार बुचकळ्यात पडतात. नेत्यांचे खरे रूप कोणते हेच कळेनासे होते. राजसिंहासनासाठी मग कोणाला महाभारत आठवते, त्यातील कौरव-पांडव, शकुनीमामा आठवतात तर कोण कोणाची औकात काढून एकमेकांना पाणी पाजण्याचीही भाषा करतो. कोण कोणाविरुद्ध काय बोलतो या गोष्टी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. गेल्या पंचवीस वर्षांपासून एकमेकांच्या हातात हात (सोयीने) घेऊन वाटचाल करणाऱ्या शिवसेना-भाजपाची युती काल-परवा संपुष्टात आली आणि उभय पक्षांकडून एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकण्यापर्यंत मजल गेली. सारेच राजकीय पक्ष जनमताचा कौल आजमावण्यासाठी आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्याच आयुधांचा वापर करतात. आरोपाला प्रत्त्युत्तर देतात. राजकीय पक्षांपुरते हे ठीक आहे; परंतु राज्याचा प्रथम नागरिक ज्यावेळी इतक्या टोकाची भाषा वापरून वा कोणे एकेकाळच्या मित्रपक्षाला चिथावणी देणारे वक्तव्य करीत असेल तर ते मुख्यमंत्री नेमके कोणाचे, राज्याचे की विधानसभेत ते ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्या पक्षाचे असा प्रश्न आम जनतेत उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, या दोन्हीही महनीय पदांवरील व्यक्ती देश आणि राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतात, त्यामुळे त्यांनी स्वपक्षाऐवजी त्या पदाची प्रतिष्ठा राखणे गरजेचे असते. लोकशाहीची मूल्ये जर तिचे रक्षण करणारेच अशा रितीने पायदळी तुडविणार असतील तर पक्षाचे प्रमुख किंवा अन्य नेत्यांच्या वक्तव्याबाबत काय अपेक्षा करायची?