शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दान महिमा

By admin | Updated: March 10, 2015 22:44 IST

दम म्हणजे इंद्रियनिग्रह होय. मनुष्य जीवनामध्ये इंद्रियांचा निग्रह करणे फार महत्त्वाचे आहे. इंद्रियांचा स्वभाव असा आहे की, त्या त्या इंद्रियांचा

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधलेदम म्हणजे इंद्रियनिग्रह होय. मनुष्य जीवनामध्ये इंद्रियांचा निग्रह करणे फार महत्त्वाचे आहे. इंद्रियांचा स्वभाव असा आहे की, त्या त्या इंद्रियांचा आवडीचा विषय समोर आला की ती ती इंद्रिये त्या त्या विषयाकडे धाव घेतात. त्याचा परिणाम असा होतो की, त्यामुळे हा मनुष्यजीव दीन होतो. संत तुकाराम महाराज सांगतात, इंद्रियांची दीने । आम्ही केलो नारायणे ।।अशा या इंद्रियांच्या चंचलतेमुळे दीन झालेला जीव अनेक दु:खाला प्राप्त होतो. खरे तर आपण ही इंद्रिये आपली म्हणतो. परंतु यातील कोणत्याही इंद्रियावर आपला ताबा नाही. जी गोष्ट पाहू नको असे म्हटले की, डोळे तेच पाहण्यात जास्त प्रवृत्त होतात. इंद्रियांच्या या चंचलतेला कारण म्हणजे आपली ‘वासना’ होय. वासना मनामध्ये निर्माण होते व मग मन वासनेच्या माध्यमातून इंद्रियाद्वारे अनेक वस्तूपर्यंत पोहोचते. म्हणून मूळ वासनाच नष्ट करावी लागते म्हणजे इंद्रियांचा निग्रह करता येतो. त्याच्याशिवाय साधक अवस्थेमध्ये तरुन जाता येत नाही. संत तुकाराम महाराज सांगतात - वासनेचे मूळ छेदीवाल्यावांचुनी ।तरलोसे कोणी न म्हणावे ।।एकदा मनातील वाईट वासनाच नष्ट झाली की, मग इंद्रिये विषयांकडे धाव घेणार नाहीत म्हणजेच इंद्रियांचा निग्रह होईल. परंतु अशा प्रकारचा इंद्रियांवर जय मिळविणे कठीण आहे. महाभारत सांगते, ‘बलवान इंद्रिय गामो विद्वांसमपिकर्षति।’याचा अर्थ इंद्रिये एवढी बलवान आहेत की, विद्वानालाही पतनाला पाठवितात. रामायणामध्ये हनुमंतराय प्रभुरामचंद्रांना सांगतात की, तुम्ही तुमच्या धनुष्यासह माझ्या हृदयात येऊन राहा. तेव्हा रामप्रभू विचारतात, धनुष्यासह का? हनुमंतराय म्हणतात, प्रभू ! माझ्या मनात सध्या कोणताही विकार, वासना नाही; परंतु ही वाईट वासना किंवा विकार कधी येईल हे सांगता येत नाही. तेव्हा अचानक एखादा विकार निर्माण झाल्यास त्याला मारण्यासाठी तुमच्याकडे धनुष्य असावे!याचा अर्थ आपण सतत जागरूक असणे गरजेचे आहे. मनाच्या ठिकाणी लागलेली अशुद्ध वासनेची घाण काढण्याकरिता सतत प्रयत्न केला पाहिजे. त्याकरिता साधनेची, अभ्यासाची, चिंतनाची आवश्यकता आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचे झाले तर -तै शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती ।।जै सोहंभाव प्रतिती । प्रगट होय ।।इंद्रियांपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर या सर्व इंद्रियांचा मालक जो भगवान परमात्मा त्याचे नामस्मरण करावे, नक्कीच आपल्या ठिकाणच्या इंद्रियांचा निग्रह होईल. हाच दैवी संपत्तीतील ‘दम’ नावाचा सद्गुण होय.