शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

दान महिमा

By admin | Updated: March 10, 2015 22:44 IST

दम म्हणजे इंद्रियनिग्रह होय. मनुष्य जीवनामध्ये इंद्रियांचा निग्रह करणे फार महत्त्वाचे आहे. इंद्रियांचा स्वभाव असा आहे की, त्या त्या इंद्रियांचा

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधलेदम म्हणजे इंद्रियनिग्रह होय. मनुष्य जीवनामध्ये इंद्रियांचा निग्रह करणे फार महत्त्वाचे आहे. इंद्रियांचा स्वभाव असा आहे की, त्या त्या इंद्रियांचा आवडीचा विषय समोर आला की ती ती इंद्रिये त्या त्या विषयाकडे धाव घेतात. त्याचा परिणाम असा होतो की, त्यामुळे हा मनुष्यजीव दीन होतो. संत तुकाराम महाराज सांगतात, इंद्रियांची दीने । आम्ही केलो नारायणे ।।अशा या इंद्रियांच्या चंचलतेमुळे दीन झालेला जीव अनेक दु:खाला प्राप्त होतो. खरे तर आपण ही इंद्रिये आपली म्हणतो. परंतु यातील कोणत्याही इंद्रियावर आपला ताबा नाही. जी गोष्ट पाहू नको असे म्हटले की, डोळे तेच पाहण्यात जास्त प्रवृत्त होतात. इंद्रियांच्या या चंचलतेला कारण म्हणजे आपली ‘वासना’ होय. वासना मनामध्ये निर्माण होते व मग मन वासनेच्या माध्यमातून इंद्रियाद्वारे अनेक वस्तूपर्यंत पोहोचते. म्हणून मूळ वासनाच नष्ट करावी लागते म्हणजे इंद्रियांचा निग्रह करता येतो. त्याच्याशिवाय साधक अवस्थेमध्ये तरुन जाता येत नाही. संत तुकाराम महाराज सांगतात - वासनेचे मूळ छेदीवाल्यावांचुनी ।तरलोसे कोणी न म्हणावे ।।एकदा मनातील वाईट वासनाच नष्ट झाली की, मग इंद्रिये विषयांकडे धाव घेणार नाहीत म्हणजेच इंद्रियांचा निग्रह होईल. परंतु अशा प्रकारचा इंद्रियांवर जय मिळविणे कठीण आहे. महाभारत सांगते, ‘बलवान इंद्रिय गामो विद्वांसमपिकर्षति।’याचा अर्थ इंद्रिये एवढी बलवान आहेत की, विद्वानालाही पतनाला पाठवितात. रामायणामध्ये हनुमंतराय प्रभुरामचंद्रांना सांगतात की, तुम्ही तुमच्या धनुष्यासह माझ्या हृदयात येऊन राहा. तेव्हा रामप्रभू विचारतात, धनुष्यासह का? हनुमंतराय म्हणतात, प्रभू ! माझ्या मनात सध्या कोणताही विकार, वासना नाही; परंतु ही वाईट वासना किंवा विकार कधी येईल हे सांगता येत नाही. तेव्हा अचानक एखादा विकार निर्माण झाल्यास त्याला मारण्यासाठी तुमच्याकडे धनुष्य असावे!याचा अर्थ आपण सतत जागरूक असणे गरजेचे आहे. मनाच्या ठिकाणी लागलेली अशुद्ध वासनेची घाण काढण्याकरिता सतत प्रयत्न केला पाहिजे. त्याकरिता साधनेची, अभ्यासाची, चिंतनाची आवश्यकता आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचे झाले तर -तै शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती ।।जै सोहंभाव प्रतिती । प्रगट होय ।।इंद्रियांपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर या सर्व इंद्रियांचा मालक जो भगवान परमात्मा त्याचे नामस्मरण करावे, नक्कीच आपल्या ठिकाणच्या इंद्रियांचा निग्रह होईल. हाच दैवी संपत्तीतील ‘दम’ नावाचा सद्गुण होय.