शहरं
Join us  
Trending Stories
1
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
2
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
3
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
4
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
5
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
6
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
7
Astro Tips: चमचाभर तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, मंगळवारी पिंपळाच्या पारावर ठेवायला हवा; कारण...
8
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
9
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश
10
"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
11
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
12
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
13
Shravan Special Recipe: श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; कमी साहित्यात चविष्ट रेसेपी 
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
15
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
16
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
17
घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक
18
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
19
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
20
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला

दान महिमा

By admin | Updated: March 10, 2015 22:44 IST

दम म्हणजे इंद्रियनिग्रह होय. मनुष्य जीवनामध्ये इंद्रियांचा निग्रह करणे फार महत्त्वाचे आहे. इंद्रियांचा स्वभाव असा आहे की, त्या त्या इंद्रियांचा

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधलेदम म्हणजे इंद्रियनिग्रह होय. मनुष्य जीवनामध्ये इंद्रियांचा निग्रह करणे फार महत्त्वाचे आहे. इंद्रियांचा स्वभाव असा आहे की, त्या त्या इंद्रियांचा आवडीचा विषय समोर आला की ती ती इंद्रिये त्या त्या विषयाकडे धाव घेतात. त्याचा परिणाम असा होतो की, त्यामुळे हा मनुष्यजीव दीन होतो. संत तुकाराम महाराज सांगतात, इंद्रियांची दीने । आम्ही केलो नारायणे ।।अशा या इंद्रियांच्या चंचलतेमुळे दीन झालेला जीव अनेक दु:खाला प्राप्त होतो. खरे तर आपण ही इंद्रिये आपली म्हणतो. परंतु यातील कोणत्याही इंद्रियावर आपला ताबा नाही. जी गोष्ट पाहू नको असे म्हटले की, डोळे तेच पाहण्यात जास्त प्रवृत्त होतात. इंद्रियांच्या या चंचलतेला कारण म्हणजे आपली ‘वासना’ होय. वासना मनामध्ये निर्माण होते व मग मन वासनेच्या माध्यमातून इंद्रियाद्वारे अनेक वस्तूपर्यंत पोहोचते. म्हणून मूळ वासनाच नष्ट करावी लागते म्हणजे इंद्रियांचा निग्रह करता येतो. त्याच्याशिवाय साधक अवस्थेमध्ये तरुन जाता येत नाही. संत तुकाराम महाराज सांगतात - वासनेचे मूळ छेदीवाल्यावांचुनी ।तरलोसे कोणी न म्हणावे ।।एकदा मनातील वाईट वासनाच नष्ट झाली की, मग इंद्रिये विषयांकडे धाव घेणार नाहीत म्हणजेच इंद्रियांचा निग्रह होईल. परंतु अशा प्रकारचा इंद्रियांवर जय मिळविणे कठीण आहे. महाभारत सांगते, ‘बलवान इंद्रिय गामो विद्वांसमपिकर्षति।’याचा अर्थ इंद्रिये एवढी बलवान आहेत की, विद्वानालाही पतनाला पाठवितात. रामायणामध्ये हनुमंतराय प्रभुरामचंद्रांना सांगतात की, तुम्ही तुमच्या धनुष्यासह माझ्या हृदयात येऊन राहा. तेव्हा रामप्रभू विचारतात, धनुष्यासह का? हनुमंतराय म्हणतात, प्रभू ! माझ्या मनात सध्या कोणताही विकार, वासना नाही; परंतु ही वाईट वासना किंवा विकार कधी येईल हे सांगता येत नाही. तेव्हा अचानक एखादा विकार निर्माण झाल्यास त्याला मारण्यासाठी तुमच्याकडे धनुष्य असावे!याचा अर्थ आपण सतत जागरूक असणे गरजेचे आहे. मनाच्या ठिकाणी लागलेली अशुद्ध वासनेची घाण काढण्याकरिता सतत प्रयत्न केला पाहिजे. त्याकरिता साधनेची, अभ्यासाची, चिंतनाची आवश्यकता आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचे झाले तर -तै शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती ।।जै सोहंभाव प्रतिती । प्रगट होय ।।इंद्रियांपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर या सर्व इंद्रियांचा मालक जो भगवान परमात्मा त्याचे नामस्मरण करावे, नक्कीच आपल्या ठिकाणच्या इंद्रियांचा निग्रह होईल. हाच दैवी संपत्तीतील ‘दम’ नावाचा सद्गुण होय.