शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिरावर आरोप आणि खाली सत्तेचे आसन

By admin | Updated: March 20, 2017 00:05 IST

गोरखनाथ मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांच्या हाती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपविण्याचा भाजपाचा निर्णय जेवढा आश्चर्यकारक तेवढाच तो चिंताजनकही

गोरखनाथ मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांच्या हाती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपविण्याचा भाजपाचा निर्णय जेवढा आश्चर्यकारक तेवढाच तो चिंताजनकही आहे. त्या राज्यातील विधानसभेच्या चार पंचमांश जागा जिंकल्यानंतर भाजपाचा माणूस मुख्यमंत्रिपदावर येणार हे उघड होते; मात्र गेल्या अडीच वर्षांच्या एकारलेल्या राजकारणाचा अनुभव लक्षात घेता तो पक्ष हे नेतृत्व एखाद्या मध्यममार्गी, सोज्वळ व सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या लोकप्रिय व्यक्तीकडे सोपवील असे साऱ्यांना वाटले होते; मात्र आदित्यनाथ आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाचे शपथ घेणारे दोन्ही पुढारी भाजपाने विधानसभेबाहेरून आणले आहेत. आदित्यनाथ लोकसभेचे पाचव्यांदा सभासद झालेले पुढारी आहेत. केशवप्रसाद मौर्य राज्यातील पक्षाध्यक्ष तर दिनेश शर्मा हे अलाहाबाद महापालिकेचे महापौर आहेत. तात्पर्य, निवडून आलेले सारेच आमदार बाजूला सारून पक्षाने ही तीन माणसे बाहेरून आणून इतरांना मान्य करायला लावली आहेत. आदित्यनाथ हे कडवे हिंदुत्ववादी महंत आहेत आणि धार्मिक दंगली चेतविल्याचा, त्यात भाग घेतल्याचा, त्यासाठी रेल्वेचे डबे जाळल्याचा आणि अनेक निरपराधांच्या हत्त्येला जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या माथ्यावर आहे. २००७ मध्ये त्यांनी गोरखपुरातच मुसलमानांची एक मजार जाळली. त्यातून उद्भवलेल्या धार्मिक दंगलीत त्यांच्या हस्तकांनी काही मशिदी उद्ध्वस्त केल्या. मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या एक्स्प्रेसचे डबेही या लोकांनी त्याच काळात जाळले. उत्तर प्रदेश हे तसेही धार्मिक हिंसाचारासाठी बदनाम झालेले राज्य असल्याने आदित्यनाथांच्या या महंती कारवाया धार्मिक म्हणून त्यांच्या परिवारानेही गौरविल्या. हिंदुत्ववादी माध्यमांनी, नेत्यांनी, पक्षांनी व संघटनांनी आदित्यनाथांच्या त्या पराक्रमासाठी त्यांचे कौतुक केले आणि त्यांचे नाव सदैव चर्चेत राहील याची काळजीही घेतली. आताही ते राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ‘ते राममंदिर आता नक्कीच होईल’ असा घोषा त्यांच्या पक्षाने व त्यांच्या मताशी संलग्न असणाऱ्यांनी चालविला आहे. सक्तीने धर्मांतर घडवून आणल्याचाही एक आरोप आदित्यनाथांच्या डोक्यावर आहे. १८०० ख्रिश्चनांची अशी धर्मांतरे त्यांनी घडविली असून, हिंदुत्ववाद्यांनी त्यांना धर्मवीरही ठरविले आहे. हिंदी सिनेमातील लोकप्रिय नट शाहरूख खान याची हाफिज सईदशी तुलना करूनही त्याने बऱ्यापैकी कीर्ती संपादन केली आहे. समझोता एक्स्प्रेसवरील हल्ल्याशी त्यांचा संबंध असल्याचेही सीबीआयने आपल्या अहवालात नोंदविले आहे. मोदींना त्यांच्या मंत्रिमंडळात आता फेरबदल करायचे आहेत. अशावेळी एवढ्या पराक्रमी व पाचवेळा खासदार राहिलेल्या आदित्यनाथांना त्यातून वगळणे त्यांना जमणारे नव्हते. त्यांना घालवायचे तर त्यांनाही मनोहर पर्रीकरांसारख्याच युक्तीने घालविणे आवश्यक होते. केंद्रातील संकट राज्यावर टाकण्याची तशीही आपल्या राजकारणाची परंपरा जुनी आहे. एक गोष्ट मात्र भाजपाएवढीच देशानेही ध्यानात घेणे येथे आवश्यक आहे. आदित्यनाथांचे मुख्यमंत्री होणे हा देशातील १७ कोटी मुसलमान नागरिकांना भेडसावण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. देशात धार्मिक दुभंग वाढवीत नेण्याचे आणि त्या बळावर २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचे ध्येय भाजपाने आता निश्चित केले आहे. उत्तर प्रदेश विधान सभेतील ४०३ जागांपैकी एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार न देण्यापासून त्यांच्या या कामाचा आरंभ झाला तर शिरावर अनेक गुन्हे असणाऱ्या आदित्यनाथ यांच्यासारख्या महंताला त्या राज्याचे मुख्यमंत्रिपद देऊन त्या धोरणावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. कमालीची जहाल व मुस्लीमविरोधी भाषणे देणे, मुसलमान तरुणांना मारहाण करणाऱ्या व प्रत्यक्षात मारणाऱ्या हिंदू संघटनांच्या मागे उभे राहणे आणि धर्मांधतेला बळ देण्याचे महंती राजकारण आखणे हा आदित्यनाथांचा आजवरचा उद्योग आहे आणि राजकारणातल्या यशासाठी देशघातकी उद्योगाचीही मदत घेण्याचे धोरण असलेल्या पक्षाला तो चालणारा आहे. देश म्हणजे नुसता प्रदेश नव्हे. देश म्हणजे त्यातील हजारो मतमतांतरांची, धर्मांची, जातींची, संस्कृतींची आणि जीवन पद्धती जगणाऱ्या लोकांची एकजूट आहे हेच ज्यांना अमान्य आहे ते पक्ष व त्यांचे पुढारी असे टोकाच्या द्वेषाचेच राजकारण करणार. ज्यूंविषयीचा द्वेष जागवून हिटलरने जर्मनीची सत्ता मिळविली. येथे तर मिळविलेली सत्ता दृढ करण्याचेच राजकारण करायचे आहे. पंजाबात त्यांना ते जमले नाही कारण त्या राज्याच्या लोकसंख्येचे स्वरूप वेगळे आहे. गोव्यात आणि मणिपुरातही त्यांना याच कारणासाठी दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले आहे. पण आताची आदित्यनाथांची खुर्ची हे उद्याच्या धर्मांध राजकारणाचे मध्यपर्व आहे हे साऱ्यांनीच समजून घेण्याची गरज आहे. देशात सेक्युलर व सर्वसमावेशक राजकारण करू पाहणाऱ्यांना एकत्र येण्याची अक्कल जोवर येत नाही तोवर धर्मांधांची आताची घोडदौड अशीच चालणार आहे. राजकारणातील दुष्टाचाराला धर्माची झालर चिकटविली की त्याचे देवकारण करता येते, असा समज असणाऱ्यांच्या विजयकाळात अशाच गोष्टी यापुढे घडणार आणि देशाला त्या मुकाट्याने पाहाव्या लागणार.