शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

सबका मूड बदल रहा है...

By राजा माने | Updated: January 19, 2018 03:29 IST

देश बदलो न् बदलो सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांचा मात्र ‘मूड बदल रहा है...’ या बदललेल्या ‘मूड’चा परिणाम राजकारणापेक्षाही विकासाची गती वाढविण्यासाठी होवो...

देश बदलो न् बदलो सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांचा मात्र ‘मूड बदल रहा है...’ या बदललेल्या ‘मूड’चा परिणाम राजकारणापेक्षाही विकासाची गती वाढविण्यासाठी होवो...राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वजनदार खात्याचे मंत्री देणाºया सोलापूर जिल्ह्याची राजकीय हवा सध्या आल्हाददायक बनू लागली आहे. ताण-तणाव, डावपेच आणि आपल्याच घरातील स्पर्धकांचे पंख छाटून आपलेच घर ‘बडा घर, पोकळ वासा’ बनविण्याच्या मोहिमा देखील थंडावण्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या आहेत. वातावरणातील हा बदल राजकारण्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनादेखील जाणवू लागला आहे. आता आपणही ‘मतदार राजा’ या भूमिकेला साजेसा पेहराव करण्याच्या तयारीला लागावे अशी भावना झाली तर आश्चर्य वाटू नये. सुशीलकुमार शिंदे यांचा उल्लेख नेहमीच ‘सिर्फ नामही काफी है’ या कौतुकपंक्ती जोडूनच नेहमी होतो. तसे ते खरेही आहे. सुशीलकुमार शिंदेंसारखा राष्टÑीय पातळीवरील नेता तयार व्हायला अनेक वर्षे जातात. त्या वर्षांमध्ये तयार होणाºया नेत्यांबरोबरच ज्या भागात तो तयार होतो त्यांनाही खूप मोठे योगदान द्यावे लागते. त्याच कारणाने सुशीलकुमारांची महती आणि ज्येष्ठत्व आता त्यांच्या पदावर नाही तर नावातच आहे हे वास्तव त्यांच्या विरोधकांनाही स्वीकारावे लागते.मोहिते-पाटील घराण्याचा राजकारणातील पूर्वीचा दबदबा राहिला नसला तरी खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या लोभस व्यक्तिमत्त्वामुळे अस्तित्त्व मात्र टिकून आहे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्याच्या राष्टÑवादीच्या राजकारणात तरुणतुर्कांनी बाजी मारली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या मुत्सद्दी छायेखाली तरुण तुर्कांचे नेतृत्व स्थापित केले. या पार्श्वभूमीवर २०१४ पासून झालेल्या सर्वच निवडणुका या नवे रंग दाखविणाºया ठरल्या.तब्बल दोन तपापासून ‘लोकमंगल’ परिवाराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत राजकारण करणाºया सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळात थोडी उशिरा एन्ट्री झाली. त्यापूर्वी त्यांचे पक्षातीलच सख्खे विरोधक विजयकुमार देशमुख यांनी राज्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मोदी आकर्षण, राज्यावरील भाजपची सत्ता आणि सोलापूर महापालिकेतील आजवर झालेल्या ओंगळवाण्या कारभाराचे भांडवल करीत दोन्ही देशमुखांनी महापालिका अलगद खिशात टाकली! पण दोघांमध्ये सख्खेपणाचे राजकारण सुरूच राहिले. त्याचा त्रास सोलापूरच्या जनतेला सोसावा लागला. जिल्ह्यातील भाजपच्या कलागती इथल्या संघ परिवाराला कानावर हात ठेवून पाहण्यापलीकडे काहीही उरले नव्हते. अखेर मुख्यमंत्र्यांनीच दोन्ही देशमुख आणि त्यांच्या निष्ठावन सवंगड्यांना एका छताखाली आणण्यासाठी तंबी द्यावी लागली. जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या गोटात गेल्या महिन्यापर्यंत अशीच अस्वस्थता होती. आता सर्वांचाच मूड बदलतो आहे. सुशीलकुमार लोकसभेच्या तयारीला लागल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही देशमुखदेखील ‘एकोपा नाट्य’ निष्ठेने रंगवत आहेत. पवार काका-पुतणे आजतरी जिल्ह्यातील राष्टÑवादी मजबुतीच्या प्रयत्नात दिसतात. लोकसभा व विधानसभा निवडणुका २०१९ मध्ये एकत्रच होतील हा अंदाज बांधत सर्वच विधानसभा मतदारसंघातील नेत्यांचे ‘बैल-बारदाणा’ जमविण्याचे काम सुरू झाले आहे. एकूणच ‘सबका मूड बदल रहा है...’- राजा माने