शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराजांच्या वटहुकूमाची शताब्दी

By admin | Updated: June 30, 2017 00:05 IST

आज शिक्षण हक्काचे म्हणून सांगत असताना ते हक्काने उपलब्ध करून देण्याचा कायदा राजर्षी शाहू महाराज यांनी शंभर वर्षापूर्वी केला होता.

आज शिक्षण हक्काचे म्हणून सांगत असताना ते हक्काने उपलब्ध करून देण्याचा कायदा राजर्षी शाहू महाराज यांनी शंभर वर्षापूर्वी केला होता. त्या वटहुकूमाची ही शताब्दी साजरी करायला हवी, अशी सूचना डॉ. रघुनाथ माशेलकर यांनीही केली आहे. आपल्या क्रांतिकारक कार्याने महाराष्ट्राच्या विचारधारेचे जनक ठरलेल्या राजर्षी शाहू महाराज यांची १४३ वी जयंती २६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तींनी पुढाकार घेऊन शाहू विचारांचा जागर केला. विविध प्रसार माध्यमांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यावर तसेच विचारावर नव्याने प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. ‘लोकमत’ने एक वेगळी बातमी त्या दिवशी दिली. ही बातमी होती, राजर्षी शाहू महाराज यांच्या एका ऐतिहासिक वटहुकूमाची! राजर्षी शाहू महाराज यांचे प्रत्येक पाऊल, विचार, कृती किंवा आदेश याला ऐतिहासिक महत्त्व आहे. तो एका कोल्हापूरसारख्या छोट्या संस्थानाचा निर्णय असायचा नाही, तर तमाम मानवी जातीच्या उन्नतीचा विचार त्यामागे असायचा.राजर्षी शाहू महाराज यांनी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे सूत्र स्वीकारले होते. त्यासाठी असंख्य संस्था उभ्या केल्या, जे संस्था चालविण्याची धडपड करीत होते त्यांना भरभरून मदत केली. सोयी-सवलती देऊन आणि सुरक्षा उपलब्ध करूनही लोकांच्या लक्षात शिक्षणाचे महत्त्व येत नव्हते, याची जाणीव होताच त्यांनी २१ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या शिक्षणाचा वटहुकूम काढला. त्याला यंदा शंभर वर्षे होताहेत. त्या वटहकूमाचे महत्त्व काय आणि त्याची शताब्दी साजरी करण्याची प्रेरणा कोणती असू शकते, यावर ‘लोकमत’ने या बातमीत प्रकाशझोत टाकला होता. त्याकाळी देश पातळीवर राजर्षी शाहू महाराज हे एकमेव राज्यकर्ते होते की, ज्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे आवश्यक आहे, समाजातील प्रत्येक माणूस शिकला पाहिजे अशी आग्रही भूमिका घेऊन त्याप्रमाणे वाटचाल केली. शिक्षणाच्या प्रसाराबरोबर त्याचे सार्वजनिकीकरण आणि अलीकडच्या काळात राईट टू एज्युकेशनपर्यंत आपली वाटचाल झाली आहे. ही सर्व वाटचाल शिक्षणाचे महत्त्व सांगणारी होती. मात्र राजर्षी शाहू महाराज यांनी शंभर वर्षापूर्वी हे हेरले होते.राजर्षी शाहू महाराज केवळ सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करून थांबले नाहीत, तर त्याची अंमलबजावणी केली. आपल्या पाल्याला शाळेत पाठविले नाही तर प्रतिमहा एक रुपया दंड पालकांना करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती. आई-वडिलांच्या शुश्रुषेसाठी किंवा शेतकामासाठी पाल्य घरी राहिला असेल किंवा आजारी असेल तर त्यातून सूट देण्याची तरतूदही करून ठेवली होती. ‘लोकमत’ने या सर्व ऐतिहासिक निर्णयाची पुनर्मांडणी केली तसेच सक्तीच्या शिक्षणाचा देशात झालेला हा पहिला कायदा आहे हे पुन्हा एकदा सर्वांच्या लक्षात आणून दिले.शाहू जयंतीदिनी कोल्हापुरातील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे या वर्षीचे ३२ वे मानकरी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर होते. त्यांनी सत्कार स्वीकारताना उत्तरादाखल केलेल्या भाषणात ‘शिक्षण हेच भवितव्य आहे’, असे सांगत हा माझा विचार नाही, राजर्षी शाहू महाराज यांचा शंभर वर्षापूर्वी मांडलेला आहे. त्याचे ऐतिहासिक महत्त्व असून त्या वटहुकूमाची शताब्दी राष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याची गरज आहे, असे स्पष्ट करून सांगितले. शिक्षण म्हणजेच भवितव्य अशी भूमिका मांडत त्यांनी त्याकाळी प्रतिकूल परिस्थिती असतानाही राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात शिक्षणाच्या सोयी आणि सुविधा ज्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले होते, त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या सक्तीच्या शिक्षणाविषयक वटहुकूमाकडे पाहावे लागेल, असे सांगत त्या वटहुकूमाचे महत्त्व डॉ. माशेलकर यांनी विशद केले.महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकर विचारांचा आहे, त्यांच्या विचाराने चालणारा आहे, असे वारंवार म्हटले जाते. किंबहुना त्या विचारधारेवर श्रद्धा असणाऱ्या समाजाने या वटहुकूमाचे महत्त्व एक ऐतिहासिक पाऊल म्हणून जाणले पाहिजे. आज शिक्षण हक्काचे म्हणून सांगत असताना ते हक्काने उपलब्ध करून देण्याचे धोरण घेणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या एका वटहुकूमाची ही शताब्दी साजरी करायला हवी.- वसंत भोसले