शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व परीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:15 IST

भारतीय तत्त्वज्ञानात असे सांगितले आहे की, मूळ ऊर्जा एकच असून ती आपल्या मूळ रूपात पूर्णत: तटस्थ असते. परंतु ती ऊर्जा कशाप्रकारे अभिव्यक्त होते यावरून तिच्या चांगल्या व वाईटाचा विचार केला जातो. जर ऊर्जेची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी असेल तर ती ऊर्जा चांगली मानली जाते.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायभारतीय तत्त्वज्ञानात असे सांगितले आहे की, मूळ ऊर्जा एकच असून ती आपल्या मूळ रूपात पूर्णत: तटस्थ असते. परंतु ती ऊर्जा कशाप्रकारे अभिव्यक्त होते यावरून तिच्या चांगल्या व वाईटाचा विचार केला जातो. जर ऊर्जेची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी असेल तर ती ऊर्जा चांगली मानली जाते. याउलट जर ऊर्जा नुकसानकारक असेल तर तिला नकारात्मक मानले जाते.डॉक्टर चाकूचा वापर करून शल्यचिकित्सेद्वारे रुग्णांना जीवदान देतात. त्यामुळेच त्यांना यश व संपत्ती दोन्ही प्राप्त होतात. गुन्हेगारसुद्धा चाकूचा वापर करतो. परंतु त्याला शिक्षा भोगावी लागते व समाजात त्याला हीन दर्जा दिला जातो. दोन्ही ठिकाणी चाकूचा वापर होतो परंतु एकाची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी आहे तर दुसरा नकारात्मक रूपात अभिव्यक्त होतो. म्हणजेच एक चांगला व दुसरा वाईट आहे.हे तथ्य समजून घेण्यासाठी अनेक ग्रंथांमध्ये एखाद्या वृत्ताच्या केंद्र व परिघाचे उदाहरण दिले गेले अ ाहे. केंद्रावर आपल्याला कोणतीही रेषा दिसत नाही परंतु केंद्रापासून या रेषा जस-जशा दूर जातात, तस-तसे त्या दोन रेषांमधील अंतरही वाढत जाते.परिघाला जेव्हा या रेषा छेदतात, तेव्हा त्यांच्यातील अंतर सर्वात जास्त असते. याउलट त्या रेषा जस-जशा विरुद्ध दिशेकडून केंद्राकडे येतात, तस-तसे त्यांच्यातील अंतर कमी कमी होत जाते व त्या केंद्राच्या आकारात पूर्णत: एक होतात.परमचैतन्य आपले केंद्र, विश्व वृत्ताचा परिघ व आपले कार्य वृत्ताच्या रेषा म्हणजेच त्रिज्या होय. आपण जस-जसे सांसारिक वस्तूंमध्ये गुंतत जातो, तस-तसे आपण आपल्या परमचेतनेच्या अवस्थेपासून दूर जातो व आपल्याला या विश्वात अंतरच अंतर व भेदा-भेद दिसतात. हेच भेद काही ठिकाणी जातीचे, काही ठिकाणी धर्माचे, काही ठिकाणी वर्णाचे, तर काही ठिकाणी लिंगाचे रूप घेतात. एकमेकांविषयीचा द्वेष आणि हिंसा हे भेदाचेच कारण आहे.यामुळेच भारतीय योग साधनेत आपल्या ध्यानाला आत घेऊन आपल्या परमचेतनेला स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो.ध्यान जेव्हा केंद्राकडे येते तेव्हा एकत्वाची अनुभूती होते व परमकल्याण आणि दयेचा उदय होतो.