शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

केंद्र व परीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:15 IST

भारतीय तत्त्वज्ञानात असे सांगितले आहे की, मूळ ऊर्जा एकच असून ती आपल्या मूळ रूपात पूर्णत: तटस्थ असते. परंतु ती ऊर्जा कशाप्रकारे अभिव्यक्त होते यावरून तिच्या चांगल्या व वाईटाचा विचार केला जातो. जर ऊर्जेची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी असेल तर ती ऊर्जा चांगली मानली जाते.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायभारतीय तत्त्वज्ञानात असे सांगितले आहे की, मूळ ऊर्जा एकच असून ती आपल्या मूळ रूपात पूर्णत: तटस्थ असते. परंतु ती ऊर्जा कशाप्रकारे अभिव्यक्त होते यावरून तिच्या चांगल्या व वाईटाचा विचार केला जातो. जर ऊर्जेची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी असेल तर ती ऊर्जा चांगली मानली जाते. याउलट जर ऊर्जा नुकसानकारक असेल तर तिला नकारात्मक मानले जाते.डॉक्टर चाकूचा वापर करून शल्यचिकित्सेद्वारे रुग्णांना जीवदान देतात. त्यामुळेच त्यांना यश व संपत्ती दोन्ही प्राप्त होतात. गुन्हेगारसुद्धा चाकूचा वापर करतो. परंतु त्याला शिक्षा भोगावी लागते व समाजात त्याला हीन दर्जा दिला जातो. दोन्ही ठिकाणी चाकूचा वापर होतो परंतु एकाची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी आहे तर दुसरा नकारात्मक रूपात अभिव्यक्त होतो. म्हणजेच एक चांगला व दुसरा वाईट आहे.हे तथ्य समजून घेण्यासाठी अनेक ग्रंथांमध्ये एखाद्या वृत्ताच्या केंद्र व परिघाचे उदाहरण दिले गेले अ ाहे. केंद्रावर आपल्याला कोणतीही रेषा दिसत नाही परंतु केंद्रापासून या रेषा जस-जशा दूर जातात, तस-तसे त्या दोन रेषांमधील अंतरही वाढत जाते.परिघाला जेव्हा या रेषा छेदतात, तेव्हा त्यांच्यातील अंतर सर्वात जास्त असते. याउलट त्या रेषा जस-जशा विरुद्ध दिशेकडून केंद्राकडे येतात, तस-तसे त्यांच्यातील अंतर कमी कमी होत जाते व त्या केंद्राच्या आकारात पूर्णत: एक होतात.परमचैतन्य आपले केंद्र, विश्व वृत्ताचा परिघ व आपले कार्य वृत्ताच्या रेषा म्हणजेच त्रिज्या होय. आपण जस-जसे सांसारिक वस्तूंमध्ये गुंतत जातो, तस-तसे आपण आपल्या परमचेतनेच्या अवस्थेपासून दूर जातो व आपल्याला या विश्वात अंतरच अंतर व भेदा-भेद दिसतात. हेच भेद काही ठिकाणी जातीचे, काही ठिकाणी धर्माचे, काही ठिकाणी वर्णाचे, तर काही ठिकाणी लिंगाचे रूप घेतात. एकमेकांविषयीचा द्वेष आणि हिंसा हे भेदाचेच कारण आहे.यामुळेच भारतीय योग साधनेत आपल्या ध्यानाला आत घेऊन आपल्या परमचेतनेला स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो.ध्यान जेव्हा केंद्राकडे येते तेव्हा एकत्वाची अनुभूती होते व परमकल्याण आणि दयेचा उदय होतो.