शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

...दुसऱ्याचं ते कार्ट !

By admin | Updated: March 17, 2016 03:58 IST

‘आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी म्हणच आहे मुळात. तिचा प्रत्यय समस्त राजकारणी सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार या विषयावर बोलताना अगदी आवर्जून आणून देत

‘आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी म्हणच आहे मुळात. तिचा प्रत्यय समस्त राजकारणी सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार या विषयावर बोलताना अगदी आवर्जून आणून देत असतात. भ्रष्टाचार म्हटलं की ज्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते असे सांगतात त्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे तब्बल अकरा आमदार एका बनावट कंपनीला उपकृत करण्यासाठी लाच स्वीकारीत असल्याची एक चित्रफीत नुकतीच उजेडात आली. भाजपाचे एक राष्ट्रीय अध्यक्ष बंगारु लक्ष्मण मागे असेच चित्रबद्ध झाले होते. ममतांच्या आमदारांचे हे शौर्य उघडकीस आल्यानंतर संसदेत गदारोळ माजणे अगदी स्वाभाविक होते. पण ममता बॅनर्जी यांनी संबंधित चित्रफीत मुळातच बनावट आहे आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ती उजेडात आणून तृणमूलला बदनाम करण्याचा तो खटाटोप आहे असे अगदी ठासून सांगितले. हा खटाटोप किंवा कट डावे पक्ष, काँग्रेस आणि भाजपा यांनी मिळून रचला असून येणाऱ्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष पराभूत होणार असल्याने हताशेपोटी त्यांनी हे केल्याचा प्रत्त्यारोप पक्षाचे सौगत राय अणि डेरेक ओब्रायन यांनी केला आहे. कोणत्याही कारणाने का होईना डावे-काँग्रेस-भाजपा युती होणार असेल तर मोठी धमालच होणार आहे. ममतांचा त्यांच्या आमदारांवर इतका दृढ विश्वास आहे की त्यांच्याकडून साधा खुलासा मागविण्याची मागणीदेखील त्यांनी उडवून लावली आहे. अर्थात हे काही नवे नाही. प्रत्येक पक्ष आपले लोकप्रतिनिधी साव तर परपक्षाचे लोकप्रतिनिधी चोर आहेत असेच जाहीरपणे सांगत असतो. त्यापायीच मग जेव्हां त्यांच्याच पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात तेव्हां मात्र असे आरोप तथ्यहीन असतात, ते एक कुभांड असते आणि या कुभांडास राजकीय विद्वेषाने प्रेरीत केलेले असते. पण तरीही ममता बॅनर्जी म्हणजे छगन भुजबळांची पाठराखण करणाऱ्या शरद पवार नव्हेत! त्यांच्या मनात सार्वजनिक जीवनातील अस्वच्छतेबाबत कमालीची चीड आहे. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआच्या केन्द्रीय मंत्रिमंडळात त्या रेल्वे मंत्री असताना त्यांचेच तत्कालीन सहकारी जॉर्ज फर्नांडीस यांच्या समता पार्टीच्या अध्यक्ष जया जेटली यांचे नाव एका भ्रष्टाचार प्रकरणात समोर आले तेव्हां ममतांनी जॉर्ज यांचा तत्काळ राजीनामा मागितला होता व तो येईना तेव्हां आधी मंत्रिपद भिरकावले होते व नंतर वाजपेयी सरकारला असलेला पाठिंबा मागे घेऊन ते गडगडवले होते. याचा अर्थ इतकाच की त्या काळात त्या सत्तेच्या राजकारणात अंमळ अपरिपक्व होत्या. आता त्या परिपक्वही झाल्या आहेत आणि तरबेजही!