शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:40 IST

देशातील वाढत्या मानसिक प्रदूषणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. एवढे क्रौर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कशी निर्माण झाली तेच कळत नाही.

देशातील वाढत्या मानसिक प्रदूषणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. एवढे क्रौर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कशी निर्माण झाली तेच कळत नाही. या मानसिक प्रदूषणामुळे लेकरांना मोकळेपणाने खेळणेबागडणेही अशक्य होऊन बसले असून जगण्याची सहजताच आम्ही गमावून बसलो आहोत. मुलांसाठी आईच्या कुशीनंतर सर्वाधिक सुरक्षित मानली जाणारी शाळासुद्धा आता असुरक्षित वाटायला लागली आहे. लहान मुलांवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडून अत्याचार होत असल्याचे समोर येत आहे. विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न पडतो. अशा या गढूळ वातावरणात आपल्या मुलांना जपणे अत्याधिक आवश्यक झाले असून शिक्षकांसोबतच पालकांनीही त्यात पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. मंडळाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नियमावली अधिक कठोर करतानाच विद्यार्थी आणि पालकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्याकरिता अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शाळांना विद्यार्थ्यांना ‘कोमल’ हा चित्रपट दाखविण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शातील अंतर कळावे हा यामागील उद्देश आहे. पालकांनीही हा चित्रपट बघितला पाहिजे. कारण मुलांना या प्रदूषणाची झळ बसू नये यासाठी पालकांची सजगता महत्त्वाची आहे. वर्ल्ड व्हिजन इंडिया नामक स्वयंसेवी संघटनेने दोनतीन महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून जी आकडेवारी समोर आली ती अतिशय धक्कादायक तसेच या देशातील बालपण किती धोक्यात आहे, याचे वास्तव उघड करणारी आहे. या सर्वेक्षणानुसार येथील प्रत्येक दुसरा मुलगा लैंगिक शोषणाचा शिकार ठरतो आहे. दुर्दैव हे की एवढ्या मोठ्या प्रमाणात शोषणाच्या घटना घडत असतानाही समाजात याविषयी पाहिजे तेवढी जागरूकता आणि संवेदनशीलता जाणवत नाही, आणि याचे प्रमुख कारण आहे लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याकडे बघण्याचा आपला उदासीन दृष्टिकोन. आपल्या कुटुंबांमध्ये अजूनही लैंगिक शिक्षणावर मोकळी चर्चा होत नाही. बरेचदा तर हा विषय काढणेसुद्धा गैर समजले जाते. परंतु बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत या विषयावर मोकळेपणाने बोलणे, संवाद साधणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून मुलं त्यांना होणारा त्रास अथवा समस्यांबद्दल न संकोचता बोलू शकतील, आणि अशा विकृत मानसिकतेपासून वेळीच आपला बचाव त्यांना करता येईल. पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी जसे विविध उपक्रम राबविले जातात तशीच चळवळ आता हे मानसिक प्रदूषण थोपविण्यासाठीही हाती घ्यावी लागणार आहे.