शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मुलांना सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:40 IST

देशातील वाढत्या मानसिक प्रदूषणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. एवढे क्रौर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कशी निर्माण झाली तेच कळत नाही.

देशातील वाढत्या मानसिक प्रदूषणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. एवढे क्रौर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कशी निर्माण झाली तेच कळत नाही. या मानसिक प्रदूषणामुळे लेकरांना मोकळेपणाने खेळणेबागडणेही अशक्य होऊन बसले असून जगण्याची सहजताच आम्ही गमावून बसलो आहोत. मुलांसाठी आईच्या कुशीनंतर सर्वाधिक सुरक्षित मानली जाणारी शाळासुद्धा आता असुरक्षित वाटायला लागली आहे. लहान मुलांवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडून अत्याचार होत असल्याचे समोर येत आहे. विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न पडतो. अशा या गढूळ वातावरणात आपल्या मुलांना जपणे अत्याधिक आवश्यक झाले असून शिक्षकांसोबतच पालकांनीही त्यात पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. मंडळाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नियमावली अधिक कठोर करतानाच विद्यार्थी आणि पालकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्याकरिता अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शाळांना विद्यार्थ्यांना ‘कोमल’ हा चित्रपट दाखविण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शातील अंतर कळावे हा यामागील उद्देश आहे. पालकांनीही हा चित्रपट बघितला पाहिजे. कारण मुलांना या प्रदूषणाची झळ बसू नये यासाठी पालकांची सजगता महत्त्वाची आहे. वर्ल्ड व्हिजन इंडिया नामक स्वयंसेवी संघटनेने दोनतीन महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून जी आकडेवारी समोर आली ती अतिशय धक्कादायक तसेच या देशातील बालपण किती धोक्यात आहे, याचे वास्तव उघड करणारी आहे. या सर्वेक्षणानुसार येथील प्रत्येक दुसरा मुलगा लैंगिक शोषणाचा शिकार ठरतो आहे. दुर्दैव हे की एवढ्या मोठ्या प्रमाणात शोषणाच्या घटना घडत असतानाही समाजात याविषयी पाहिजे तेवढी जागरूकता आणि संवेदनशीलता जाणवत नाही, आणि याचे प्रमुख कारण आहे लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याकडे बघण्याचा आपला उदासीन दृष्टिकोन. आपल्या कुटुंबांमध्ये अजूनही लैंगिक शिक्षणावर मोकळी चर्चा होत नाही. बरेचदा तर हा विषय काढणेसुद्धा गैर समजले जाते. परंतु बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत या विषयावर मोकळेपणाने बोलणे, संवाद साधणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून मुलं त्यांना होणारा त्रास अथवा समस्यांबद्दल न संकोचता बोलू शकतील, आणि अशा विकृत मानसिकतेपासून वेळीच आपला बचाव त्यांना करता येईल. पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी जसे विविध उपक्रम राबविले जातात तशीच चळवळ आता हे मानसिक प्रदूषण थोपविण्यासाठीही हाती घ्यावी लागणार आहे.