शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मुलांना सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:40 IST

देशातील वाढत्या मानसिक प्रदूषणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. एवढे क्रौर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कशी निर्माण झाली तेच कळत नाही.

देशातील वाढत्या मानसिक प्रदूषणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. एवढे क्रौर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कशी निर्माण झाली तेच कळत नाही. या मानसिक प्रदूषणामुळे लेकरांना मोकळेपणाने खेळणेबागडणेही अशक्य होऊन बसले असून जगण्याची सहजताच आम्ही गमावून बसलो आहोत. मुलांसाठी आईच्या कुशीनंतर सर्वाधिक सुरक्षित मानली जाणारी शाळासुद्धा आता असुरक्षित वाटायला लागली आहे. लहान मुलांवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडून अत्याचार होत असल्याचे समोर येत आहे. विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न पडतो. अशा या गढूळ वातावरणात आपल्या मुलांना जपणे अत्याधिक आवश्यक झाले असून शिक्षकांसोबतच पालकांनीही त्यात पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. मंडळाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नियमावली अधिक कठोर करतानाच विद्यार्थी आणि पालकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्याकरिता अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शाळांना विद्यार्थ्यांना ‘कोमल’ हा चित्रपट दाखविण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शातील अंतर कळावे हा यामागील उद्देश आहे. पालकांनीही हा चित्रपट बघितला पाहिजे. कारण मुलांना या प्रदूषणाची झळ बसू नये यासाठी पालकांची सजगता महत्त्वाची आहे. वर्ल्ड व्हिजन इंडिया नामक स्वयंसेवी संघटनेने दोनतीन महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून जी आकडेवारी समोर आली ती अतिशय धक्कादायक तसेच या देशातील बालपण किती धोक्यात आहे, याचे वास्तव उघड करणारी आहे. या सर्वेक्षणानुसार येथील प्रत्येक दुसरा मुलगा लैंगिक शोषणाचा शिकार ठरतो आहे. दुर्दैव हे की एवढ्या मोठ्या प्रमाणात शोषणाच्या घटना घडत असतानाही समाजात याविषयी पाहिजे तेवढी जागरूकता आणि संवेदनशीलता जाणवत नाही, आणि याचे प्रमुख कारण आहे लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याकडे बघण्याचा आपला उदासीन दृष्टिकोन. आपल्या कुटुंबांमध्ये अजूनही लैंगिक शिक्षणावर मोकळी चर्चा होत नाही. बरेचदा तर हा विषय काढणेसुद्धा गैर समजले जाते. परंतु बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत या विषयावर मोकळेपणाने बोलणे, संवाद साधणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून मुलं त्यांना होणारा त्रास अथवा समस्यांबद्दल न संकोचता बोलू शकतील, आणि अशा विकृत मानसिकतेपासून वेळीच आपला बचाव त्यांना करता येईल. पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी जसे विविध उपक्रम राबविले जातात तशीच चळवळ आता हे मानसिक प्रदूषण थोपविण्यासाठीही हाती घ्यावी लागणार आहे.