शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

क्रीडा संस्कृती रुजू शकेल?

By admin | Updated: August 9, 2015 03:11 IST

आॅलिम्पिक स्पर्धा हे प्रत्येक देशातल्या संस्कृतीची पातळी मोजण्याचे परिमाण मानले जाते. पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या देशाचा राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि सुवर्णपदके जिंकणाऱ्या

- भीष्मराज बाम

आॅलिम्पिक स्पर्धा हे प्रत्येक देशातल्या संस्कृतीची पातळी मोजण्याचे परिमाण मानले जाते. पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या देशाचा राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि सुवर्णपदके जिंकणाऱ्या खेळाडूंच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवले जाते. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशांचे खेळाडूसुद्धा पदके जिंकत असतात आणि जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारताचे पदकतालिकेत स्थान ५५वे आहे. क्रीडा स्पर्धा हे बालकांचे आणि युवकांचे क्षेत्र आहे. त्यांना क्रीडांगणे आणि सोयीसवलती निर्माण करणे आणि सुस्थितीत राखणे कधीच शक्य होणार नाही. त्यांना आणि त्यांच्या पालकांना भविष्याची काळजी असते. त्यामुळे पुस्तकी विद्या, जी शिक्षणाचा सर्वात सोपा भाग आहे तिच्यावर अनावश्यक भर दिला जातो. मैदानी खेळ खेळण्याने मुलांची निर्णयशक्ती योग्य प्रकारे विकसित होते. तिच्या अभावी त्यांना स्वप्नरंजनात रमण्याची सवय लागते आणि व्यवहारातली आव्हाने आणि अडचणींना तोंड देता न आल्याने ते निराशेची शिकार बनण्याचा धोका असतो. त्यांना खेळायला लावणे आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी शासन आणि समाजाची आहे.चुकीच्या धोरणांमुळे शासन विनाकारण फार मोठी जबाबदारी स्वत:कडे ओढून घेत आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे, की प्रचंड खर्च होत असूनही खेळाडूंना खेळाच्या सुविधाच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात आपण अजून मागासलेलेच आहोत. शाळेत कवायत शिकवणाऱ्या शिक्षकांनाच क्रीडा प्रशिक्षणाचा भार दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आपल्या सर्वोत्तम खेळाडूंची तयारी करून घ्यायला परदेशातले प्रशिक्षक बोलावले जातात आणि त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात खर्च केला जातो. आपल्या खेळाडूंना त्यांच्याशी संवाद साधणेही भाषेच्या अडचणीमुळे अवघड जाते. परदेशात क्रीडा प्रशिक्षकांना खूप मान मिळतो आणि त्यांचे उत्पन्न इतर कोणाहीपेक्षा जास्त असते. प्रत्येक खेळासाठी स्थानिक प्रशिक्षक तयार व्हायला हवेत. त्यांनाच भरपूर पगार देता यायला हवा. त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी विद्यापीठांतून आणि कॉलेजांतून सोय व्हायला हवी. त्यांना आणि खेळाडूंनाही उत्तम करिअर करण्याची संधी मिळायला हवी. स्पर्धात्मक खेळांसाठी फार तर १०-१५ वर्षे मिळतात. इतर करिअरसाठी वेळ देणे शक्य होत नाही. क्रीडा क्षेत्रातच क्रीडा वैद्यक, क्रीडा पत्रकारिता, क्रीडा संयोजन, क्रीडा मानसशास्त्र, क्रीडांगणे निर्माण करून सुस्थितीत राखणे, क्रीडा साधनांची निर्मिती आणि विक्री अशी अनेक करिअर उपलब्ध होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांकरिता खेळाडूंसाठी वयोमर्यादा ४० वर्षांपर्यंत वाढवायला हवी, म्हणजे प्रशासकांमध्ये उत्तम खेळाडू येऊ शकतील.अनेक खेळांच्या जिल्हा आणि राज्य संघटनांमध्ये खेळाडूंवर सतत अन्याय होत असतो. या संघटनांमध्ये संघटकांची मनमानी चाललेली असते़ याने गुणी खेळाडूंवर खेळ सोडून देण्याची पाळी येते. या बहुतेक साऱ्या संघटना शासकीय मदतीवरच चाललेल्या असतात. खेळाडूंच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी खास अधिकारी नेमण्याची गरज आहे. बऱ्याच खाजगी संस्था क्रीडा प्रचाराचे कार्य उत्तम प्रकारे करीत आहेत. शासनाने त्यांना शोधून काढून आर्थिक आणि इतर मदत द्यावी. खाजगी उद्योगपतींना व व्यापारी संस्थांनाही तसे करण्याबाबत उत्तेजन द्यावे.

(लेखक क्रीडा मनसोपचारतज्ज्ञ आहेत.)