शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

घर आया मेरा...

By admin | Updated: November 7, 2015 03:29 IST

अखेर ‘देशभक्त’ गँगस्टराचे पाय जन्मभूमीला लागले म्हणायचे! नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्न. भारतीय गुप्तचरांनी मोठ्या ‘हिकमतीने’ छोटा राजन ऊर्फ राजेन्द्र सदाशिव

अखेर ‘देशभक्त’ गँगस्टराचे पाय जन्मभूमीला लागले म्हणायचे! नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्न. भारतीय गुप्तचरांनी मोठ्या ‘हिकमतीने’ छोटा राजन ऊर्फ राजेन्द्र सदाशिव निकाळजे याला इंडोनेशियातील बाली या पर्यटन स्थळावर अडकवून ठेवले आणि त्याच्या मायभूमीकडे परतण्याची सारी सिद्धता केली, पण अचानक ज्वालामुखीच्या राखेने घोटाळा केला. बालीचा विमानतळच ठप्प झाला. तपासी यंत्रणांचे नशीबच खडतर. अखेर यातूनही मार्ग निघाला व देशाच्या राजधानीत तो अवतरला. अनेक कट्टर बदमाषांच्या बाबतीत नेहमीच जो वाद रंगतो, तसा तो त्याच्या बाबतीतही रंगला. त्याला अटक झाली की त्याने आत्मसमर्पण केले. अनेकाना वाटते की जीवाच्या भीतीने त्यानेच भारतीय गुप्तचरांना ‘टिप’ दिली आणि आॅस्ट्रेलिया सोडून तो बालीत आला कारण इंडोनेशिया आणि भारत यांच्यातील गुन्हेगारांच्या प्रत्यार्पण संधीची त्याला पूर्ण कल्पना होती. खासदार रामदास आठवले मात्र याच्याशी असहमत आहेत. त्यांच्या मते छोटा राजन दलित असल्यानेच त्याला अटक केली गेली! उद्या दाऊद इब्राहीमची उपयुक्तता संपल्याचे पाकी सरकारच्या लक्षात आले आणि त्या सरकारने दाऊदला गलितगात्र बनविले व खुद्द दाऊदने छोटा शकीलमार्फत टिप दिली व अटक करवून घेतली तर त्याच्या बाबतीत असदुद्दीन ओवेसीदेखील असेच म्हणतील की, तो मुसलमान असल्यानेच त्याला अटक केली गेली! छोटा राजनवर म्हणे पाऊणशे गुन्हे दाखल आहेत व गेली २७ वर्षे तो मुंबई पोलिसांना गुंगारा देतो आहे. त्याच्या मते मुंबई पोलिसांमध्ये दाऊदचे काही हस्तक आहेत व ते आपला घास घेण्यास टपले आहेत. राजनच्या या आरोपास माजी केन्द्रीय गृह सचिव राजकुमार सिंह यांचाही दुजोरा आहे. पण ज्या पद्धतीने राजनने पोलिसांच्या हातावर इतकी वर्षे तुरी ठेवल्या, ते पाहाता मुंबई पोलिसात त्याचेही काही हस्तक वा समर्थक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज राजन शारीरिक दृष्ट्या पूर्ण खचला आहे. त्याला सातत्याने डायलेसिवर ठेवावे लागते. आता तो सारा खर्च तमाम भारतीय करणार आहेत. कारण तो जिवंत राहाणे म्हणे अत्यावश्यक आहे. त्याचे एकमात्र कारण म्हणजे मुंबई शहरातील तेवीस वर्षांपूर्वीच्या साखळी बॉम्ब स्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहीम याला फासावर लटकविण्याइतके सज्जड पुरावे केवळ त्याच्या एकट्यापाशी आहेत. याचा अर्थ ते देशातील तपासी यंत्रणांकडे नाहीत. अर्थात यातही काही नवे नाही. अबू सालेमलाही असेच प्रत्यार्पण संधीचा लाभ उठवून भारतात आणले गेले होते, पण त्याच्या विरुद्धच्या गंभीर आरोपांपैकी एकदेखील अद्याप सिद्ध झालेला नाही!