शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल?; मोदी-शहांचे वॉरमशिन जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 02:36 IST

- हरीश गुप्ता(लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर)केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता राजकारणाच्या दालनात बोलली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात होणारा हा अखेरचा फेरबदल असेल. उत्तर प्रदेशात सध्या जेवढ्या जागा पक्षाला मिळाल्या आहेत, त्या सर्व कायम राखण्याचा, ईशान्येकडील राज्यातील सर्वच्या सर्व २५ जागा मिळविण्याचा, प.बंगालात किमान अर्ध्या जागा संपादन करण्याचा ...

- हरीश गुप्ता(लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर)

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता राजकारणाच्या दालनात बोलली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात होणारा हा अखेरचा फेरबदल असेल. उत्तर प्रदेशात सध्या जेवढ्या जागा पक्षाला मिळाल्या आहेत, त्या सर्व कायम राखण्याचा, ईशान्येकडील राज्यातील सर्वच्या सर्व २५ जागा मिळविण्याचा, प.बंगालात किमान अर्ध्या जागा संपादन करण्याचा आणि आंध्रात मुसंडी मारण्याचा मोदी-अमित शहा या जोडगोळीचा विचार आहे. त्यानुसार, मंत्रिमंडळात फेरबदल होणे अपेक्षित आहे. सध्या उत्तर प्रदेशातील राजनाथ सिंग, मनेका गांधी आणि मुख्तार नकवी हे तीनच भाजपाचे कॅबिनेट मंत्री आहे. ईशान्येकडील राज्यातील एकही जण मंत्री नाही, अपवाद फक्त राज्यमंत्री किरण रिजिजू यांचा. क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्री म्हणून पाठविल्यानंतर आसामला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. मंत्रिमंडळात महाराष्टÑाचा सिंहाचा वाटा आहे. तेथील एकूण नऊ मंत्री आहेत. याउलट बिहारमधील सहकारी पक्ष वाटा न मिळाल्याने नाराज आहेत. पाच कॅबिनेट मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खाती आहेत, तर बाकीच्यांना कामच उरलेले नाही. आपल्याला न्याय मिळावा, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. जनता दल (संयुक्त) भाजपासोबत राहणार, हे पक्के झाल्याने त्यांनाही प्रतिनिधित्व हवे आहे. तेलुगू देसम पक्षाने रालोआतूृन अंग काढून घेतल्यामुळे, आंध्रात स्वत:चा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न भाजपाने चालविला आहे. बिहारला प्रतिनिधित्व देताना, जातीय समीकरणही विचारात घ्यावे लागणार आहे. उत्तर प्रदेशात दलित नेत्याचा शोध सुरू आहे. बिहारचे रामविलास पासवान आणि मध्य प्रदेशचे थावरचंद गेहलोत हे दोन दलित नेते आहेत, पण मायावतींशी मुकाबला करण्यासाठी उत्तर प्रदेशातून दलित नेत्याचा शोध सुरू आहे व तोही भाजपाचा असावा, असा प्रयत्न आहे!

मोदी-शहांचे वॉरमशिन जोरातलोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्याची इच्छा मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून बोलून दाखविली असली आणि भाजपाकडून त्याचा ढोल जरी पिटला जात असला, तरी लोकसभेच्या निवडणुका या ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच होणार आहेत. भाजपाशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांकडून भाजपाचे हायकमांड आणि पंतप्रधानांचे कार्यालय हे निवडणुकीच्या संदर्भात कोणती कामे झालीत, याचा तपशील मागवत आहेत. या सर्व प्रकारावरून हे स्पष्ट झाले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही स्थितीत पुढे ढकलल्या जाणार नाहीत! या अभ्यासावरून हेही स्पष्ट झाले आहे की, सरकार आणि सत्तारूढ पक्ष यांच्यात कोणतेही अंतर ठेवण्यात आलेले नाही! कसेही करून या निवडणुका जिंकायच्या, असा निर्धार मोदी-अमित शहा यांच्या जोडीने केला असून, तोच त्यांचा एकमेव अजेंडा आहे! मध्य प्रदेशात काँग्रेसचा एकही वरिष्ठ नेता विधानसभा निवडणूक लढणार नसला, तरी राजस्थानमध्ये मात्र सर्व वरिष्ठ नेते विधानसभा निवडणुकीत उतरणार आहेत. मध्य प्रदेश विधानसभेसाठी प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, निवडणूक प्रचारप्रमुख ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजयसिंग हे निवडणूक लढणार नाहीत.

टॅग्स :Electionनिवडणूक