शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

‘झाडू’न पराभव!

By admin | Updated: April 26, 2017 23:17 IST

देशातील सध्याच्या राजकीय पर्यावरणाबद्दल कोणी कितीही नाकं मुरडली, तरी मोदींची त्सुनामी अजून कायम असून, ती रोखण्याची ताकत सध्यातरी कोणाकडे नाही

देशातील सध्याच्या राजकीय पर्यावरणाबद्दल कोणी कितीही नाकं मुरडली, तरी मोदींची त्सुनामी अजून कायम असून, ती रोखण्याची ताकत सध्यातरी कोणाकडे नाही, हे वास्तव दुर्लक्षण्याजोगे नक्कीच नाही. उत्तर प्रदेशातील ‘न भूतो...’ अशा यशानंतर भाजपाने दिल्लीतील तीन महापालिकांमध्ये मिळविलेला दणदणीत विजय याचीच साक्ष देणारा आहे. दिल्लीत सरकार असताना आणि मोफत वीज-पाणी देण्याचा दावा करूनही आम आदमी पार्टीचा झालेला ‘झाडू’न पराभव मान्य करण्याऐवजी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पराभवाचे खापर पुन्हा ‘इव्हीएम’वर फोडले आहे. वास्तावाचे भान हरपले की, अशीच बहाणेबाजी केली जाते. दिल्लीतील जनतेने मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने केजरीवाल यांच्या हाती देशाची राजधानी असलेल्या ‘दिल्ली’ची सूत्रे सोपविली, मात्र भांडकुदळ स्वभावामुळे पहिल्या दिवसापासून केजरीवाल कुरकुर करत राहिले. कधी उप राज्यपालांच्या तर कधी केंद्रातील मोदी सरकारच्या नावे त्यांचे रडगाणे सुरूच आहे. विधानसभा जिंकली, तिथे मनपा काय चीज? हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला.दिल्लीतील तीन महापालिकांमधील एकूण २७० जागांपैकी भाजपाने १८५ जागा जिंकून विजयाची मालिका कायम ठेवली आहे. केजरीवाल यांच्या ‘आप’ला केवळ ४२ जागा मिळाल्या. जर भाजपाचा विजय इव्हीएममुळे असेल तर, मग या ४२ जागा ‘आप’ला कशा मिळाल्या? का तिथेही काही गडबड झाली? केजरीवाल यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. केजरीवालांचे गुरु अण्णा हजारे यांनीदेखील असाच सल्ला दिला आहे. केजरीवाल यांना सत्तेची धुंदी चढली आहे, अशी जरा अधिकची बोचरी टीका अण्णांनी केली आहे. अण्णांच्या या त्राग्यामागे बरीच कारणं आहेत. केजरीवाल मुख्यमंत्री झाले तेव्हा अण्णांचा सूर वेगळा होता. असो. राजकारणात हार-जीत होतच असते. २०१४पर्यंत भाजपाने अनेक पराभव पत्करले आहेत. निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना जागा किती मिळाल्या, यापेक्षाही टक्केवारी किती वाढली, यातच ते समाधान मानत. आज ती वेळ काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर आली आहे. दिल्ली मनपात काँग्रेस जिंकेल, असा दावा कोणीही केलेला नव्हता. कारण हा पक्ष पुरता आत्मविश्वास गमावून बसलेला आहे.दिल्लीतील काँग्रेसच्या पराभवास शीला दीक्षित आणि अजय माकन या नेत्यांमधील भांडणंदेखील कारणीभूत आहेत. असे सवतेसुभे खालसा होत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसला अच्छे दिन येणे नाही !