शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
3
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
4
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
5
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
6
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
7
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
8
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
9
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
10
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
12
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
13
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
14
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
15
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
16
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
17
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
18
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
19
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
20
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

‘झाडू’न पराभव!

By admin | Updated: April 26, 2017 23:17 IST

देशातील सध्याच्या राजकीय पर्यावरणाबद्दल कोणी कितीही नाकं मुरडली, तरी मोदींची त्सुनामी अजून कायम असून, ती रोखण्याची ताकत सध्यातरी कोणाकडे नाही

देशातील सध्याच्या राजकीय पर्यावरणाबद्दल कोणी कितीही नाकं मुरडली, तरी मोदींची त्सुनामी अजून कायम असून, ती रोखण्याची ताकत सध्यातरी कोणाकडे नाही, हे वास्तव दुर्लक्षण्याजोगे नक्कीच नाही. उत्तर प्रदेशातील ‘न भूतो...’ अशा यशानंतर भाजपाने दिल्लीतील तीन महापालिकांमध्ये मिळविलेला दणदणीत विजय याचीच साक्ष देणारा आहे. दिल्लीत सरकार असताना आणि मोफत वीज-पाणी देण्याचा दावा करूनही आम आदमी पार्टीचा झालेला ‘झाडू’न पराभव मान्य करण्याऐवजी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पराभवाचे खापर पुन्हा ‘इव्हीएम’वर फोडले आहे. वास्तावाचे भान हरपले की, अशीच बहाणेबाजी केली जाते. दिल्लीतील जनतेने मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने केजरीवाल यांच्या हाती देशाची राजधानी असलेल्या ‘दिल्ली’ची सूत्रे सोपविली, मात्र भांडकुदळ स्वभावामुळे पहिल्या दिवसापासून केजरीवाल कुरकुर करत राहिले. कधी उप राज्यपालांच्या तर कधी केंद्रातील मोदी सरकारच्या नावे त्यांचे रडगाणे सुरूच आहे. विधानसभा जिंकली, तिथे मनपा काय चीज? हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला.दिल्लीतील तीन महापालिकांमधील एकूण २७० जागांपैकी भाजपाने १८५ जागा जिंकून विजयाची मालिका कायम ठेवली आहे. केजरीवाल यांच्या ‘आप’ला केवळ ४२ जागा मिळाल्या. जर भाजपाचा विजय इव्हीएममुळे असेल तर, मग या ४२ जागा ‘आप’ला कशा मिळाल्या? का तिथेही काही गडबड झाली? केजरीवाल यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. केजरीवालांचे गुरु अण्णा हजारे यांनीदेखील असाच सल्ला दिला आहे. केजरीवाल यांना सत्तेची धुंदी चढली आहे, अशी जरा अधिकची बोचरी टीका अण्णांनी केली आहे. अण्णांच्या या त्राग्यामागे बरीच कारणं आहेत. केजरीवाल मुख्यमंत्री झाले तेव्हा अण्णांचा सूर वेगळा होता. असो. राजकारणात हार-जीत होतच असते. २०१४पर्यंत भाजपाने अनेक पराभव पत्करले आहेत. निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना जागा किती मिळाल्या, यापेक्षाही टक्केवारी किती वाढली, यातच ते समाधान मानत. आज ती वेळ काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर आली आहे. दिल्ली मनपात काँग्रेस जिंकेल, असा दावा कोणीही केलेला नव्हता. कारण हा पक्ष पुरता आत्मविश्वास गमावून बसलेला आहे.दिल्लीतील काँग्रेसच्या पराभवास शीला दीक्षित आणि अजय माकन या नेत्यांमधील भांडणंदेखील कारणीभूत आहेत. असे सवतेसुभे खालसा होत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसला अच्छे दिन येणे नाही !