शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

नोकरशहांना अभय

By admin | Updated: January 1, 2016 02:44 IST

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरकारी नोकराना अभय देण्याचा शब्द पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी पाळला असून अखिल भारतीय सेवेतील नोकरशहांना आता कोणतेही केन्द्रीय मंत्रालय परस्पर

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरकारी नोकराना अभय देण्याचा शब्द पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी पाळला असून अखिल भारतीय सेवेतील नोकरशहांना आता कोणतेही केन्द्रीय मंत्रालय परस्पर निलंबित करु शकणार नाही. निलंबनासारखी कारवाई करण्यासारखी स्थिती निर्माण झालीच तर कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्र्याची त्याला पूर्वानुमती अनिवार्य केली आहे. सध्या या मंत्रिपदाचा कारभार पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेन्द्रसिंह यांच्याकडे असल्याने अपरोक्षरीत्या खुद्द पंतप्रधानांनीच हा निर्णय स्वत:कडे घेतला आहे. इतके दिवस कोणतेही मंत्रालय अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यास निलंबित करु शकत होते आणि निलंबनाचा कालावधी एक वर्ष पूर्ण होईपर्यंत केन्द्र स्तरावरील पुनर्निरीक्षण समिती त्यात लक्ष घालू शकत नव्हती. राज्य सरकारांनी एखाद्या अशा अधिकाऱ्याला निलंबित केले तर ४८तासांच्या आत तसे केन्द्राला कळविणे आता बंधनकारक केले गेले असून केन्द्राने निलंबनाच्या कारवाईस अनुकूलता दाखविली नाही अथवा महिनाभराच्या आता संबंधिताच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली गेली नाही तर निलंबन रद्द होऊ शकते. अर्थात अपवादात्मक स्थितीतच राज्य सरकारे स्वत:च्या अखत्यारित अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करीत असतात. बहुतेक वेळा राजकीय मालकाना संतुष्ट केले नाही म्हणूनच संबंधित नोकरशहाच्या विरोधात कारवाई केली जाते. अलीकडच्या काळात उत्तरेत असे काही प्रकार घडलेही आहेत. बऱ्याचदा संसद वा विधिमंडळांमध्ये विरोधी पक्ष दबाव निर्माण करतात व त्यातूनही निलंबनाची कारवाई केली जाते. अशी कारवाई केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत प्रकरण न्यायालयात जायला हवे असते पण तसे सहसा होत नाही आणि मग न्यायालयाकडूनच संबंधित लोक निलंबन रद्द करुन घेतात. परंतु अनेकदा वर्षानुवर्षे निलंबन आणि निम्मा पगार सुरु राहतो व संबंधित नोकर पोटापाण्याची वेगळी सोय लावूनही घेतात. त्यातून सरकारी कारभारातले दोन हात कमी होतात व तिजोेरीवरील निम्मा भारही तसाच राहतो. परिणामी थेट निलंबित न करता अन्यत्र बदली करणे आणि चौकशीमध्ये संबंधिताचा हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेणे केव्हांही व्यवहार्य ठरते. त्यामुळे निलंबनाच्या कारवाईबाबत आस्ते कदमचे पंतप्रधानांचे धोरण स्वागतार्हच ठरते. तथापि ज्यांच्यावर कारवाई होते वा होऊ शकते असे सारे प्रामाणिकच असतात हे गृहीतक सर्वमान्य होण्यासारखे नाही आणि असे संरक्षक कवच प्राप्त झालेली नोकरशाही शिरजोर होणार नाही याची खात्रीही कोणी देऊ शकत नाही.