शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

'बुलेट विरुद्ध बॅलेट'? - ही तर नक्षलवाद्यांच्या शेवटाची सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2024 07:53 IST

निवडणुकीचा माहोल सुरू असतानाही मध्य भारतातल्या आक्रमक सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयाने नक्षलवाद्यांच्या उरात धडकी भरवणाऱ्या कारवाया सध्या सुरू आहेत.

राजेश शेगोकार, वृत्तसंपादक लोकमत, नागपूर

छत्तीसगड व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातून गडचिरोलीत माओवाद्यांच्या कुरापती नित्याच्या निवडणुका आल्या म्हणजे 'बुलेट विरुद्ध बॅलेट' असा संघर्ष आणखीच तीव्र होतो, हा अनुभवही नेहमीचाचा २९ मार्च २०२४ रोजी माओवाद्यांनी भामरागड तालुक्यात पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने एका आदिवासी तरुणाची हत्या केली. त्यानंतर मतदानावर बहिष्कार घालण्याचा फतवा काढला. 

या घटनेमुळे २०१९ च्या निवडणुकीच्या जखमांवरची खपली निघाली. गेल्यावेळी तब्बल १५ जवानांसह तीन नागरिकांचा बळी गेला होता. यावेळी मात्र चित्र बदलले. नक्षलग्रस्त भागातल्या मतदानाच्या फक्त तीन दिवस आधी १६ एप्रिल रोजी गडचिरोलीच्या सीमेवरील कांकेरच्या जंगलात सुरक्षा यंत्रणांनी तब्बल २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. नक्षलवाद्यांच्या जंगलातील तळावर घुसून मारण्याचा आक्रमक पवित्रा नक्षलविरोधी अभियानातील सुरक्षा यंत्रणांनी घेतला. त्याच्या धास्तीमुळे टप्प्यातील सर्वाधिक मतदान नक्षलग्रस्त भागातच झाले. हा योगायोग नाही. सर्वच सुरक्षा यंत्रणांनी आपसांतील समन्वयातून केलेल्या रणनीतीचा हा विजय आहे.

देशभर निवडणुकीचा माहोल असतानाही सुरक्षा यंत्रणांनी बचावात्मक पवित्रा न घेता नक्षलवाद्यांच्या उरात धडकी भरवणाऱ्या कारवाया सुरु ठेवल्यानेच ३० एप्रिल रोजी अबुझमाड येथे १० नक्षलवाद्यांना यमसदनी पाठविले गेले, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात १० मे रोजी १२ नक्षलवाद्यांचा खातमा केला व परवा भामरागडातील जंगलात तिघांना ठार केले. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान नक्षलवादी TCOC म्हणजेच टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन राबवून पोलिसांवर हल्ले करीत असतात. शत्रूच्या छोट्या-छोट्या तुकड्यांवर हल्ले चढवण्याची ही रणनीती असते. सुरक्षा यंत्रणांनी नेमकी अशीच भूमिका घेत नक्षलवाद्यांची कोंडी केली आहे. 

महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या कोअर एरियामध्ये घुसून त्यांना जबर हादरा दिला आहे. छत्तीसगढ, तेलंगणा महाराष्ट्र राज्यातील पोलिस यंत्रणा, सी- ६० पथक, नक्षलविरोधी अभियानातील अनेकांच्या समन्वयाचे हे यश आहे. नक्षलवाद्यांना ग्रामस्थांकडून मिळणारी रसद तोडण्यासाठी राबविलेल्या योजनांचाही त्यात मोठा वाटा आहे.

माओवादी चळवळीतून हिंसेकडे वळलेल्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी देणारी आत्मसमर्पण योजना, पोलिस दादालोरा खिडकी, हक्काची घरे, एक गाव-एक वाचनालय, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण अशा तब्बल २२ योजनांमधून नक्षलग्रस्त ग्रामस्थांना मुख्य प्रवाहात आणले जात आहे. तरुणांना हॉटेल मॅनेजमेंट, ऑटोमोबाइल, नर्सिंग, व्यवसाय विकास आणि इतर क्षेत्रांत व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. 

उद्योग, पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाचे चक्र फिरत आहे. गेल्या साडेतीन वर्षांत नक्षलवादी चळवळीत नवीन भरती झालेली नाही. देशभरात नक्षलवाद्यांच्या दलमची संख्या १०० पर्यंत खाली आली आहे. त्यातही जेमतेम १० ते २० दलम सक्रिय असल्याचे सांगतात. कतरंगट्टा जंगलात मारल्या गेलेल्या तीन नक्षलवाद्यांसह गडचिरोलीतील पेरिमिली दलमही संपुष्टात आले आहे. नक्षली आता हातपाय मारतील, ग्रामस्थांसाठी फतवे काढतील, पण ग्रामस्थांसोबत असलेला पोलिसांचा 'कनेक्ट' नव्या विश्वासाचे अन् विकासाचेही पर्व ठरले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याच्या पोलिस यंत्रणांना विश्वास दिला, आधुनिक शस्त्रे दिली आणि समन्वयात कसर राहणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळेच देशभरात गेल्या चार महिन्यांत आतापर्यंत सुमारे १०० हून अधिक माओवादी ठार, १३० पेक्षा जास्त पकडले गेले. यावरून सुरक्षा दलांची आक्रमकता लक्षात येते. याच कालावधीत १५० हून अधिक नक्षल्यांनी केलेले आत्मसमर्पण हा संवादाची दारे अजूनही उघडी असल्याचा संकेत आहे.

नक्षलवाद ही मध्यभारताला अशांत करणारी मोठी समस्या आहे तीचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आक्रमक करतानाच या भागातील नागरिकांच्या कल्याणाचे सूत्र सरकारने हाती घेतले. आता भारतात नक्षल्यांची अखेर जवळ आली आहे, असे संकेत दिसतात! rajesh.shegokar@lokmat.com

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी