शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

Budget 2021: ... आता आर्थिक आरोग्यासाठी लस हवी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 03:49 IST

Budget 2021: वर्ष २०२०-२१ हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूपच अडचणीचे वर्ष ठरले आहे. एकीकडे श्रीमंत अतिश्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरिबीच्या दरीत गाडले जात आहेत.

- उमेश शर्मा(चार्टर्ड अकाऊण्टण्ट)वर्ष २०२०-२१ हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूपच अडचणीचे वर्ष ठरले आहे. एकीकडे श्रीमंत अतिश्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरिबीच्या दरीत गाडले जात आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२०-२१ नुसार सामान्य व्यक्तीचे सरासरी वार्षिक उत्पन्न ७५००/- ते  ८५००/- रुपयांपर्यंत कमी झाले आहे. कोरोना महामारीचा परिणाम भारतीय नागरिकांच्या आरोग्यावर तर झालाच. शिवाय या महामारीमुळे शासकीय खर्चात वाढ झाली.  प्रत्येक नागरिकांच्या उत्पन्न आणि बचतीवरसुध्दा या महामारीचा परिणाम झाला आहे. परंतु, शास्त्रज्ञांनी कोरोनावर मात करणारी लस विकसित केली आहे. त्यामुळे भारतीयांचे आरोग्य लवकरच सुधारेल, अशी आशा करूया.  प्रत्येक नागरिक आपल्याला ही लस कधी मिळेल, अशी आशा लावून बसला आहे. जगाच्या तुलनेत भारताने कोरोनानामक जीवघेण्या महामारीवर लवकर  मात  केली आहे, असे आशादायक चित्र सध्या आहे.   कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधक लस भारतीयांना मिळाली आहे. त्याचप्रमाणे या महामारीत रोजगार गमावलेले, उत्पन्नात घट सोसणारे आणि व्यवसायाला मोठी झळ पोहोचलेले भारतीय नागरिक केंद्रीय अर्थसंकल्पातून आपल्याला  आर्थिक मदतीचा हात देणारी काहीतरी लस मिळेल अशी आशा लावून बसले आहेत!२०२१ सालच्या या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय पगारदार, करदात्यांना कोणकोणत्या अपेक्षा आहेत? - त्याची यादी करायची ठरवली, तर हे असे चित्र दिसेल :१. पगारदार व्यक्तींना बचतीसाठी व खर्चासाठी पैसा मिळावा म्हणून आयकर प्रमाणित वजावटीची मर्यादा रु ५०,०००/- वरून रुपये १,००,०००/- पर्यंत वाढविण्यात यावी.२. सर्वसामान्य व्यक्तींना लागू होणारी आयकराची बेसिक इक्झम्शन लिमिट रु. २,५०,०००/- वरून रु ३,५०,०००/- पर्यंत वाढविण्यात यावी.३. ८० सी ची मर्यादा सध्या रू १,५०,०००/- आहे. ती वाढवून २,५०,०००/- पर्यंत केल्यास बचतीला अजून वाव मिळेल.४. सध्याच्या परिस्थितीत आरोग्य विम्यासाठी मिळणारी वजावट खूपच अपुरी आहे.  सध्याची वजावट रु. २५,०००/- वरून रु. १,००,०००/- पर्यंत वाढवण्यात यावी.५.  कंपनी करदात्यांसाठी कराचा दर १५ टक्के आणि २२ टक्के असा वेगवेगळा त्या त्या अटीनुसार आहे. परंतु, सामान्य व्यक्ती, पार्टनरशीप फर्म इत्यादींना लागू होणारा दर ३० टक्के वरून २५ टक्के करण्यात यावा.६. नवीन करदात्यांनी नवीन उद्योग सुरू केल्यास  स्टार्टअपला असतात, तशा सवलती त्यांना मिळाव्यात. त्यामुळे बेरोजगारी कमी होऊन नवीन उद्योजकांना चालना मिळेल.अशा प्रकारे आर्थिक मदतीची लस उपलब्ध करुन दिल्यास  बाजारात खेळते भांडवल येईल. विक्री वाढेल, अर्थव्यवस्थेला चालना  मिळेल. कोरोनाप्रतिबंधक लसीइतकीच आर्थिक आरोग्य रक्षण करणारी ही लस सर्वसामान्य मध्यमवर्गीय भारतीयांसाठी आज फार महत्त्वाची आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारतbudget 2021बजेट 2021