शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

झळाळती कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:44 IST

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला.

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला. काल-परवापर्यंत अगदीच लिंबूटिंबू समजल्या जाणा-या विदर्भ रणजी क्रिकेट संघाने त्या दिवशी रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून विदर्भातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीची मान ताठ केली. भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू महाराजा रणजितसिंह यांच्या नावाने १९३४ मध्ये सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात विदर्भाचा संघ फार कमी वेळा आपल्या नावाचा ठसा उमटवू शकला. विदर्भाने रणजी स्पर्धेत पदार्पण केले ते १९५७-५८ च्या हंगामात! तेव्हापासून २००१-०२ मध्ये स्पर्धेचे स्वरूप बदलेपर्यंत, विदर्भाचा संघ मध्य विभागात खेळत असे आणि बहुतांश वेळा विभागीयस्तरावरच त्याचे आव्हान संपुष्टात येत असे. अपवाद फक्त १९७०-७१ आणि १९९५-९६ च्या हंगामाचा! त्या दोन हंगामामध्ये विदर्भ उपउपांत्य फेरीत पोहोचला होता. पुढे २००२-०३ च्या हंगामापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेचे विभागीय स्वरूप संपुष्टात आणले आणि त्याऐवजी १५ आघाडीच्या संघांचा समावेश असलेला ‘एलिट’ गट आणि तळातील संघांचा समावेश असलेला ‘प्लेट’ गट, असे नवे स्वरूप स्पर्धेला दिले. त्यानंतर विदर्भाचा संघ २००२-०३ आणि २०११-१२ मध्ये ‘प्लेट’ गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. एवढीच काय ती विदर्भ रणजी संघाची आजवरची चमकदार कामगिरी! एकूण २५९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये केवळ ४१ विजय, ८९ पराजय आणि १२९ अनिर्णीत सामने ही आकडेवारी, संघाच्या एकंदर कामगिरीवरील बोलके भाष्य आहे. या पृष्ठभूमीवर, कर्नाटकसारख्या आठवेळा विजेता राहिलेल्या संघाला उपांत्य सामन्यात पराभूत करून थेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश, ही कामगिरी एकदम झळाळून उठते! कर्नाटकचा संघ यावर्षी सातत्याने दमदार कामगिरी करीत होता. मोठे सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा भरीव अनुभव त्या संघाच्या गाठीशी होता. अशा संघाला नमविणे ही सोपी गोष्ट नव्हती; मात्र विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंनी ते करून दाखविले. विदर्भ संघाच्या कामगिरीत झालेल्या या लक्षणीय बदलाचे श्रेय नि:संशयपणे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे आहे. विदर्भाच्या क्रिकेटपटूंमध्ये गुणवत्ता होतीच; मात्र त्या गुणवत्तेला पैलू पाडण्याचे व संघाला विजयाची सवय लावण्याचे काम पंडित यांनी केले. संघात विजिगीषू भावना निर्माण करण्याचे श्रेय कर्णधार फैज फजललाही द्यावेच लागेल. संघाची कामगिरी अंतिम सामन्यातही अशीच बहरो आणि रणजी चषकावर नाव कोरता येवो, हीच शुभेच्छा!

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडकRanji Trophy 2017रणजी चषक 2017