शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

झळाळती कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:44 IST

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला.

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला. काल-परवापर्यंत अगदीच लिंबूटिंबू समजल्या जाणा-या विदर्भ रणजी क्रिकेट संघाने त्या दिवशी रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून विदर्भातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीची मान ताठ केली. भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू महाराजा रणजितसिंह यांच्या नावाने १९३४ मध्ये सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात विदर्भाचा संघ फार कमी वेळा आपल्या नावाचा ठसा उमटवू शकला. विदर्भाने रणजी स्पर्धेत पदार्पण केले ते १९५७-५८ च्या हंगामात! तेव्हापासून २००१-०२ मध्ये स्पर्धेचे स्वरूप बदलेपर्यंत, विदर्भाचा संघ मध्य विभागात खेळत असे आणि बहुतांश वेळा विभागीयस्तरावरच त्याचे आव्हान संपुष्टात येत असे. अपवाद फक्त १९७०-७१ आणि १९९५-९६ च्या हंगामाचा! त्या दोन हंगामामध्ये विदर्भ उपउपांत्य फेरीत पोहोचला होता. पुढे २००२-०३ च्या हंगामापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेचे विभागीय स्वरूप संपुष्टात आणले आणि त्याऐवजी १५ आघाडीच्या संघांचा समावेश असलेला ‘एलिट’ गट आणि तळातील संघांचा समावेश असलेला ‘प्लेट’ गट, असे नवे स्वरूप स्पर्धेला दिले. त्यानंतर विदर्भाचा संघ २००२-०३ आणि २०११-१२ मध्ये ‘प्लेट’ गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. एवढीच काय ती विदर्भ रणजी संघाची आजवरची चमकदार कामगिरी! एकूण २५९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये केवळ ४१ विजय, ८९ पराजय आणि १२९ अनिर्णीत सामने ही आकडेवारी, संघाच्या एकंदर कामगिरीवरील बोलके भाष्य आहे. या पृष्ठभूमीवर, कर्नाटकसारख्या आठवेळा विजेता राहिलेल्या संघाला उपांत्य सामन्यात पराभूत करून थेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश, ही कामगिरी एकदम झळाळून उठते! कर्नाटकचा संघ यावर्षी सातत्याने दमदार कामगिरी करीत होता. मोठे सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा भरीव अनुभव त्या संघाच्या गाठीशी होता. अशा संघाला नमविणे ही सोपी गोष्ट नव्हती; मात्र विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंनी ते करून दाखविले. विदर्भ संघाच्या कामगिरीत झालेल्या या लक्षणीय बदलाचे श्रेय नि:संशयपणे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे आहे. विदर्भाच्या क्रिकेटपटूंमध्ये गुणवत्ता होतीच; मात्र त्या गुणवत्तेला पैलू पाडण्याचे व संघाला विजयाची सवय लावण्याचे काम पंडित यांनी केले. संघात विजिगीषू भावना निर्माण करण्याचे श्रेय कर्णधार फैज फजललाही द्यावेच लागेल. संघाची कामगिरी अंतिम सामन्यातही अशीच बहरो आणि रणजी चषकावर नाव कोरता येवो, हीच शुभेच्छा!

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडकRanji Trophy 2017रणजी चषक 2017