शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या गडावर भाजपाचा झेंडा!

By admin | Updated: March 23, 2017 23:13 IST

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार धक्का दिला आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार धक्का दिला आहे. लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी लाट होती. त्या लाटेचा परिणाम झाला होता. दक्षिण महाराष्ट्रातील चारपैकी एक खासदारपद भाजपाने पटकावले होते. विधानसभा निवडणुकीत सव्वीसपैकी सहा आमदार भाजपाने निवडून आणले. तेव्हा असे मानले जात होते की, भाजपाच्या यशाची ही सीमा आहे. मात्र, केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्याने गावोगावचे राजकारणही बदलू लागले. मुळात या प्रदेशात भाजपाची ताकद अत्यंत मर्यादित होती. ती एवढी मर्यादित होती की, दक्षिण महाराष्ट्रातील तीन जिल्हा परिषदांच्या १९१ सदस्यांमध्ये भाजपाचे केवळ चार सदस्य होते. सत्ता फारच दूर होती. सांगली जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून एकदाही भाजपाचा उमेदवार निवडून आला नव्हता. मावळत्या सभागृहातही एकही सदस्य नव्हता. तोच भाजपा साठपैकी पंचवीस जागा जिंकत शिवसेनेच्या मदतीने सत्तारूढ पक्ष झाला आहे.कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपाने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड ताकद लावली होती. गेल्या काही महिन्यांत या तीन जिल्ह्यांत चंद्रकांतदादा दौऱ्यावर येणार म्हणताच आता कोणता कार्यकर्ता किंवा नेता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून प्रवेश करणार याचीच चर्चा होत होती. ग्रामपंचायतीत केव्हाच सत्ता नव्हती. तालुका पंचायतीच्या आवारात कधी प्रवेश झाला नाही. जिल्हा परिषदांच्या सत्ता सिंहासनाकडे पाहण्याची संधी कधी मिळाली नाही. मोदी लाटेत थोडी पडझड झाली असेल, ग्रामपातळीवर निवडणुकीत भाजपाला साथ मिळणार नाही, याच विचारात मश्गूल असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना या दोन जिल्हा परिषदांची सिंहासने भाजपाने कशी मिळविली हेच समजले नाही.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीद्वारे केंद्र तसेच राज्यातील सत्ता गेली तरी काँग्रेसी नेत्यांची गुर्मी कमी होत नाही. भाजपारूपी स्पर्धक (शत्रू म्हणायला नको) मैदान मारण्याची तयारी करीत असताना, काँग्रेसी नेते उमेदवार वाटणीवरून एकमेकांचे पाय ओढत होते. तिन्ही जिल्ह्यांत याचा परिणाम झाला. सातारा आणि सांगली जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेस सलग पंधरा वर्षे सत्तेत होती. यापैकी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काळाची पावले ओळखून एकसंधपणे तालुका-तालुका सांभाळला. एवढेच नव्हे तर भाजपाचे वारे असताना आणि काँग्रेसची साथ नसताना राष्ट्रवादीने सातारा जिल्हा परिषदेत आजवरचे सर्वोत्तम यश संपादन केले. अकराच्या अकरा तालुका पंचायत समित्यांच्या सभापतिपदांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला.याउलट कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण झाली. अनेक वरिष्ठ नेते असूनही त्यांनी न लढता कमीत कमी हार पत्करण्याची तयारी केली होती. सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची घसरण तेहतीसवरून चौदावर झाली. काँग्रेस तेवीसवरून केवळ दहा जागांवर घसरली. हीच अवस्था कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसची झाली. या दोन्ही पक्षांत अनेक नेते गेली चाळीस वर्षे राजकारण करीत आहेत. राज्यपातळीवरील असंख्य सत्तापदे भोगली आहेत. मात्र, राजकीय वारे काय वाहते, आपण कशी सावध भूमिका घ्यायला हवी याचे अजिबात गांभीर्य नसल्याने भाजपाकडून न लढताच चितपट झाले.भाजपाने मिळविलेले यश निर्विवाद म्हणता येणार नाही; पण त्यांना यश मिळाले आहे. सातारा वगळता सांगली आणि कोल्हापूर जिल्हा परिषदांवर सत्ता मिळविली. त्यासाठी सर्व साधनांचा वापर केला. राजकीय कौशल्य दाखविले. याची संपूर्ण जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर होती. त्यांनी राजकीय गणिते जुळविली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फोडून सत्ता मिळविली असली तरी त्यांच्या खांद्यावर भाजपाचा झेंडा आहे. चाळीस वर्षे कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांतदादांनी चाळीस वर्षे नेतेगिरी करणाऱ्या चाळीस काँग्रेसी नेत्यांना सत्तेवरून बाजूला केले, हेच त्यांचे यश आहे. - वसंत भोसले