शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

भाजपाचे दुष्काळी दौरे उपचारात्मकच!

By admin | Updated: May 14, 2016 01:37 IST

तद्दन उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या राजकीय दौऱ्यांतून अगर भेटींतून फारसे काही निष्पन्न होत नसते; परंतु तरी ते केले जातात, कारण किमान लोकभावनांशी समरसता साधण्याचा हेतू त्यामागे असतो

तद्दन उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या राजकीय दौऱ्यांतून अगर भेटींतून फारसे काही निष्पन्न होत नसते; परंतु तरी ते केले जातात, कारण किमान लोकभावनांशी समरसता साधण्याचा हेतू त्यामागे असतो. राज्यातील सत्ताधारी भाजपाने दुष्काळ पाहणीसाठी जे दौरे चालविले आहेत त्याकडेही याच भूमिकेतून पाहता यावे. शिवाय, या दौऱ्यांमागे या पक्षाचा आणखीही एक उद्देश असावा तो म्हणजे सहयोगी शिवसेनेवर मात करण्याचा; जो लपून राहू शकलेला नाही.दुष्काळाच्या वणव्यात होरपळलेल्या ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील वस्तुस्थिती जाणून घेण्याकरिता ‘भाजपा’चे मंत्री, आमदार व अन्य पदाधिकारी नुकतेच नाशिक जिल्हा दौऱ्यावर येऊन गेलेत. नाशकातच झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय झाला होता. कारण या दौऱ्यांमागेही पार्श्वभूमी होती ती शिवसेनेतर्फे करण्यात आलेल्या अशाच दौऱ्यांची. सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात दौरे करून दुष्काळी उपाययोजनांसाठी व संपूर्ण कर्जमाफीकरिता प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची इशारेबाजी केली होती. परस्परांमधील वर्चस्ववादात लोकांची सहानुभूती शिवसेनेला कशी लाभेल, याचा विचार त्यामागे होता. विविध आघाड्यांवर भाजपाकडून कशी अन्यायाची भूमिका पार पाडली जाते, हे लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिवसेनेतर्फे नाशकात महामोर्चाही काढण्यात आला होता. या एकूणच एकतर्फी प्रचारतंत्राचा समाचार घेऊन, आपणही लोकांच्या बरोबर आहोत; भाजपाचे सरकार दुष्काळाच्या प्रश्नी तितकेच संवेदनशील आहे हे दाखवून देण्यासाठी संपूर्ण राज्यातच या दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आता पावसाळा तोंडावर आला आहे. अनेक ठिकाणी तर वळवाच्या पावसाने वर्दीही देऊन झाली आहे. अशात भाजपाचे पदाधिकारी आपले दुष्काळी दौरे पूर्ण करतील कधी आणि त्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर होऊन त्यानुसार उपाययोजना साकारतील कधी, याबाबत शंका घेतली जाणे अस्वाभाविक नाही. कारण तसाही राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहेच. भाजपाच्या सदर पाहणी दौऱ्यांकडे केवळ उपचार म्हणून पाहता येणारे आहे ते त्याचमुळे. महत्त्वाचे म्हणजे, उपचाराचा आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार असला तरी, तोदेखील भाजपाला प्रभावीपणे पार पाडता आला नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या दुष्काळाने जो कहर मांडला आहे त्यातून नाशिक जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात तीस शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. दुष्काळाचा दाह किती असहनीय ठरला आहे त्याची या दुर्दैवी घटनांतून प्रचिती यावी. परंतु तालुका-तालुक्यांत दौऱ्यावर येऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून गेलेल्या भाजपाच्या नेत्यांनी जिल्ह्यातील कुणा आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केल्याची अगर त्यांना दिलासा दिल्याची वार्ता वाचावयास मिळू शकलेली नाही. त्याउलट शिवसेनेच्या मंत्री व पदाधिकाऱ्यांनी संबंधितांच्या भेटी तर घेतल्याच, शिवाय आपल्या परीने पक्षस्तरावरून काही जणांना आर्थिक मदतही दिली. जिल्ह्यातील काही भागात शिवसेनेतर्फे पाण्याचे टँकर्स व जनावरांसाठी चारा छावण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. संवेदनशीलतेची कृतिशील दखल घेतल्याचे त्यातून दिसून आले. तेव्हा भाजपाचा उपचारही परिणामकारकतेची पातळी गाठू शकला नसल्याचेच यातून स्पष्ट व्हावे. दुसरे म्हणजे, जिल्ह्यात अन्यत्र असे दौरे करताना नेमके भाजपाचे आमदार असलेल्या चांदवड तालुक्यालाच त्यातून वगळण्यात आले. त्यामुळे केवळ अन्य पक्षीय आमदारांच्याच कार्यक्षेत्रात दुष्काळी दौरे करून भाजपातर्फे निव्वळ राजकारणच केले गेल्याचे म्हणता येणारे आहे. - किरण अग्रवाल