शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

सत्तेच्या अतिलालसेपायी भाजपा बळजबरीने पक्षांतरे घडवू लागलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 04:50 IST

बळजबरीच्या धर्मांतराविषयी संघ आणि भाजपा परिवाराची भूमिका नेहमी आक्रमक असते. मात्र सत्तेच्या अतिलालसेपायी आता हाच भाजपा चक्क बळजबरीने पक्षांतरे घडवून आणू लागला आहे.

बळजबरीच्या धर्मांतराविषयी संघ आणि भाजपा परिवाराची भूमिका नेहमी आक्रमक असते. मात्र सत्तेच्या अतिलालसेपायी आता हाच भाजपा चक्क बळजबरीने पक्षांतरे घडवून आणू लागला आहे. धर्मांतरासाठी आमिषे दाखविली जातात, असा आरोप होत असतो तर पक्षांतरासाठी आमिषांसोबत नाकाबंदी, कोंडी केली जाते. पर्याय खुंटल्याने लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळी भाजपामध्ये जात आहे. खान्देशात तसाही भाजपा ‘शतप्रतिशत’कडे वाटचाल करीत आहे. सार्वत्रिक निवडणुकांची प्रतीक्षाही न करता संपूर्ण पालिका भाजपामध्ये आणण्याचे घाऊक कार्य वेगाने सुरू आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर नगरपालिका काँग्रेस-राष्टÑवादीच्या ताब्यात होती. अडीच वर्षांनंतर सत्ताधारी नगरसेवकांनी घाऊकपणे बंडखोरी केली आणि महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघातील शिंदखेडा नगरपंचायतीत काँग्रेस-राष्टÑवादीशी संबंधित नेत्यांची आघाडी सत्तेत आहे. नोव्हेंबर महिन्यात तेथे निवडणूक होणार आहे. सत्ताधारी गटनेत्याने दहा नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. याची पुनरावृत्ती रावल आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे धुळ्यात करीत आहेत. पुढील वर्षी तेथे निवडणूक आहे. महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता आहे. सर्वपक्षीय मातब्बर नेते आणि नगरसेवकांना ‘भाजपा’मध्ये पावन करून घेण्याचे केंद्र उघडल्याप्रमाणे साप्ताहिक पक्षांतर सोहळे होत आहेत. जळगावचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या पत्नी व विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत दारुण पराभवाला सामारे जावे लागले. त्यापूर्वी विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्षाची कामगिरी सुमार दर्जाची राहिली. राष्टÑवादीच्या नेत्यांनी स्थापन केलेल्या आघाडीने पालिकेत सत्ता स्थापन केली आणि आता लोकनियुक्त नगराध्यक्षांसह १३ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मंत्री, आमदारपदाचा वापर करून पालिकांची कोंडी करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आमदार निधीतून करावयाची कामे पालिकेमार्फत न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय घेणे, शासकीय योजनांचे प्रस्ताव अडकवून ठेवणे या कारवायांमुळे नगरसेवक मेटाकुटीला येणे स्वाभाविक आहे. विकास कामे होत नसतील आणि या परमार्थातून ‘स्वार्थ’साधत नसेल तर नगरसेवक होण्यात काय फायदा हा व्यावहारिक विचार करून त्यांनी ‘भाजपा’वासी होण्याचा निर्णय बहुदा घेतला असावा.

टॅग्स :BJPभाजपा