शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सत्तेच्या अतिलालसेपायी भाजपा बळजबरीने पक्षांतरे घडवू लागलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 04:50 IST

बळजबरीच्या धर्मांतराविषयी संघ आणि भाजपा परिवाराची भूमिका नेहमी आक्रमक असते. मात्र सत्तेच्या अतिलालसेपायी आता हाच भाजपा चक्क बळजबरीने पक्षांतरे घडवून आणू लागला आहे.

बळजबरीच्या धर्मांतराविषयी संघ आणि भाजपा परिवाराची भूमिका नेहमी आक्रमक असते. मात्र सत्तेच्या अतिलालसेपायी आता हाच भाजपा चक्क बळजबरीने पक्षांतरे घडवून आणू लागला आहे. धर्मांतरासाठी आमिषे दाखविली जातात, असा आरोप होत असतो तर पक्षांतरासाठी आमिषांसोबत नाकाबंदी, कोंडी केली जाते. पर्याय खुंटल्याने लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळी भाजपामध्ये जात आहे. खान्देशात तसाही भाजपा ‘शतप्रतिशत’कडे वाटचाल करीत आहे. सार्वत्रिक निवडणुकांची प्रतीक्षाही न करता संपूर्ण पालिका भाजपामध्ये आणण्याचे घाऊक कार्य वेगाने सुरू आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर नगरपालिका काँग्रेस-राष्टÑवादीच्या ताब्यात होती. अडीच वर्षांनंतर सत्ताधारी नगरसेवकांनी घाऊकपणे बंडखोरी केली आणि महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघातील शिंदखेडा नगरपंचायतीत काँग्रेस-राष्टÑवादीशी संबंधित नेत्यांची आघाडी सत्तेत आहे. नोव्हेंबर महिन्यात तेथे निवडणूक होणार आहे. सत्ताधारी गटनेत्याने दहा नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. याची पुनरावृत्ती रावल आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे धुळ्यात करीत आहेत. पुढील वर्षी तेथे निवडणूक आहे. महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता आहे. सर्वपक्षीय मातब्बर नेते आणि नगरसेवकांना ‘भाजपा’मध्ये पावन करून घेण्याचे केंद्र उघडल्याप्रमाणे साप्ताहिक पक्षांतर सोहळे होत आहेत. जळगावचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या पत्नी व विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत दारुण पराभवाला सामारे जावे लागले. त्यापूर्वी विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्षाची कामगिरी सुमार दर्जाची राहिली. राष्टÑवादीच्या नेत्यांनी स्थापन केलेल्या आघाडीने पालिकेत सत्ता स्थापन केली आणि आता लोकनियुक्त नगराध्यक्षांसह १३ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मंत्री, आमदारपदाचा वापर करून पालिकांची कोंडी करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आमदार निधीतून करावयाची कामे पालिकेमार्फत न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय घेणे, शासकीय योजनांचे प्रस्ताव अडकवून ठेवणे या कारवायांमुळे नगरसेवक मेटाकुटीला येणे स्वाभाविक आहे. विकास कामे होत नसतील आणि या परमार्थातून ‘स्वार्थ’साधत नसेल तर नगरसेवक होण्यात काय फायदा हा व्यावहारिक विचार करून त्यांनी ‘भाजपा’वासी होण्याचा निर्णय बहुदा घेतला असावा.

टॅग्स :BJPभाजपा