शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

सत्तेच्या अतिलालसेपायी भाजपा बळजबरीने पक्षांतरे घडवू लागलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 04:50 IST

बळजबरीच्या धर्मांतराविषयी संघ आणि भाजपा परिवाराची भूमिका नेहमी आक्रमक असते. मात्र सत्तेच्या अतिलालसेपायी आता हाच भाजपा चक्क बळजबरीने पक्षांतरे घडवून आणू लागला आहे.

बळजबरीच्या धर्मांतराविषयी संघ आणि भाजपा परिवाराची भूमिका नेहमी आक्रमक असते. मात्र सत्तेच्या अतिलालसेपायी आता हाच भाजपा चक्क बळजबरीने पक्षांतरे घडवून आणू लागला आहे. धर्मांतरासाठी आमिषे दाखविली जातात, असा आरोप होत असतो तर पक्षांतरासाठी आमिषांसोबत नाकाबंदी, कोंडी केली जाते. पर्याय खुंटल्याने लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळी भाजपामध्ये जात आहे. खान्देशात तसाही भाजपा ‘शतप्रतिशत’कडे वाटचाल करीत आहे. सार्वत्रिक निवडणुकांची प्रतीक्षाही न करता संपूर्ण पालिका भाजपामध्ये आणण्याचे घाऊक कार्य वेगाने सुरू आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर नगरपालिका काँग्रेस-राष्टÑवादीच्या ताब्यात होती. अडीच वर्षांनंतर सत्ताधारी नगरसेवकांनी घाऊकपणे बंडखोरी केली आणि महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघातील शिंदखेडा नगरपंचायतीत काँग्रेस-राष्टÑवादीशी संबंधित नेत्यांची आघाडी सत्तेत आहे. नोव्हेंबर महिन्यात तेथे निवडणूक होणार आहे. सत्ताधारी गटनेत्याने दहा नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. याची पुनरावृत्ती रावल आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे धुळ्यात करीत आहेत. पुढील वर्षी तेथे निवडणूक आहे. महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता आहे. सर्वपक्षीय मातब्बर नेते आणि नगरसेवकांना ‘भाजपा’मध्ये पावन करून घेण्याचे केंद्र उघडल्याप्रमाणे साप्ताहिक पक्षांतर सोहळे होत आहेत. जळगावचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या पत्नी व विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत दारुण पराभवाला सामारे जावे लागले. त्यापूर्वी विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्षाची कामगिरी सुमार दर्जाची राहिली. राष्टÑवादीच्या नेत्यांनी स्थापन केलेल्या आघाडीने पालिकेत सत्ता स्थापन केली आणि आता लोकनियुक्त नगराध्यक्षांसह १३ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मंत्री, आमदारपदाचा वापर करून पालिकांची कोंडी करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आमदार निधीतून करावयाची कामे पालिकेमार्फत न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय घेणे, शासकीय योजनांचे प्रस्ताव अडकवून ठेवणे या कारवायांमुळे नगरसेवक मेटाकुटीला येणे स्वाभाविक आहे. विकास कामे होत नसतील आणि या परमार्थातून ‘स्वार्थ’साधत नसेल तर नगरसेवक होण्यात काय फायदा हा व्यावहारिक विचार करून त्यांनी ‘भाजपा’वासी होण्याचा निर्णय बहुदा घेतला असावा.

टॅग्स :BJPभाजपा