शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

बिटकॉइनचा भूलभुलैया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 04:48 IST

पैशाच्या देवाणघेवाणीसाठी वापरले जाणारे माध्यम म्हणजे पैसा. सुवर्णमोहरा ते तांब्या-पितळेची नाणी, नोटांपासून ते चेक, बॉँडचे खरे रूप पैसाच.

पैशाच्या देवाणघेवाणीसाठी वापरले जाणारे माध्यम म्हणजे पैसा. सुवर्णमोहरा ते तांब्या-पितळेची नाणी, नोटांपासून ते चेक, बॉँडचे खरे रूप पैसाच. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही नाण्यांची विविध रूपे सांगितलेली असून, त्यातल्या रुप्यरूप या नाण्यावरूनच रुपया हा शब्द आला. वेगवेगळ्या धातूंनी नाणी बनविली जात; पण एकच पथ्य पाळणे आवश्यक असायचे, की नाण्याचे जे मूल्य राज्यव्यवस्थेने ठरविले आहे त्या धातूच्या तुकड्याचीही बाजारात तीच किंमत राहिली पाहिजे. महंमद तुघलक या राज्यकर्त्याने हे पथ्य पाळले नाही आणि दर्शनी मूल्य जास्त असलेली लोखंडाची नाणी सुरू केली. याचा फायदा घेऊन काहींनी स्वत:च्या टांकसाळी सुरू करून नाणी पाडली. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, असे इतिहास सांगतो. विनिमयाचे साधन म्हणून पैसा वापरताना त्याची रूपे काळानुसार नेहमीच बदलत गेली आहेत. राज्यसंस्थेने त्यावर कायमच अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. सध्या चर्चेत असलेले बिटकॉइन हेदेखील पैशाचे असेच एक रूप. येथे तर धातूही नाही. ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार न करता एक खास अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. हे सगळे व्यवहार आॅनलाइन चालतात. एका ब्लॉकचेन नेटवर्कवर असलेल्या दोन व्यक्तींमध्ये ते होतात. यामुळे त्यावर इतर कुणाचे, अगदी सरकारचेही नियंत्रण नसते. हीच त्याची ताकद ठरली. विशिष्ट संख्येचीच बिटकॉइन उपलब्ध असल्याचे सांगितले गेल्याने किमतीत प्रचंड वाढ झाली. दहा-वीस पट नफा मिळू लागला. अमिताभ बच्चन यांना ११० कोटी रुपये नफा झाल्याचे वृत्त झळकले. अनेकांनी लाखो रुपये कमावल्याच्या कहाण्या प्रसृत झाल्या; पण त्यातही अनेकांचा मोह सुटला नाही. भारद्वाज नावाच्या बंधूंनी गेनबिटकॉइन नावाची कंपनी स्थापन केली. तुमचे बिटकॉइन त्यांच्याकडे दिले, तर दरमहा ठरावीक रक्कम मिळण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, यामध्ये हे समजले नाही, की आपल्याकडील किमती बिटकॉइन घेऊन एम कॅप हे नाणे दिले जात होते. त्याची किंमत अत्यंत किरकोळ झाली आहे. आभासी जगात पैशांचा आभास निर्माण करून फसवणुकीचे हे उदाहरण. विशेष म्हणजे, फसवणूक झालेल्यांपैकी बहुतेक जण सुशिक्षित आणि तंत्रस्नेही आहेत. पण पैशाची भूल पडली, की सारासार विवेक हरवतो. मग, ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ हीच म्हण खरी ठरते!