शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

तुम्ही पुन्हा परतून का येत नाही, बापू?

By विजय दर्डा | Updated: October 3, 2022 09:03 IST

आजच्या पिढीला तुमच्याविषयी फार काही माहिती नाही हा आमचाच दोष आहे, बापू !... तुमची कितीतरी स्वप्ने आजही अधुरी आहेत...!

-  विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

प्रिय बापू, माफी मागतो आपली. काल २ ऑक्टोबरला आपला जन्मदिन होता. आपल्या जन्मदिनाच्या दिवशी काही ना काही लिहिण्याची एक परंपराच होऊन गेली आहे. वेगवेगळ्या चौकात आपल्या पुतळ्यांना हार घालून आपले गुणगान गाण्याची परंपरा आहे  आणि  दुसऱ्याच दिवशी सगळे सगळे विसरून जाण्याचीही! 

बापू, माझ्या मनात दिवसभर चलबिचल होत होती. अंतर्मनात प्रश्नांच्या फैरी झडत होत्या. वाटले, आमच्या प्रिय बापूंना शेवटी कोणी केवळ पुतळ्यामध्ये बंद करून टाकले?  बापू, तुम्ही जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यासमोर इतक्या सहजपणे आणि सरळ सरळ उभे ठाकला होता, की सगळे जग पाहतच राहिले.. आणि इतक्यातच आम्ही तुम्हाला विसरलो? शतकांपासून निद्रिस्त असलेल्या जवळपास अशिक्षित देशाला जागे करणे का सोपे होते बापू ! १९१५ मध्ये आपण भारतात आलात सगळ्या देशाचा दौरा केला. १९१७ मध्ये स्वातंत्र्य आंदोलनात उतरलात तेव्हा देशाचा साक्षरता दर सात टक्केसुद्धा नव्हता. इंग्रज आपल्या मुला-मुलींना गुलाम करून समुद्रापलीकडे पाठवत होते. देशाचे मनोबल तुटलेले होते; परंतु बापू, तुम्ही कमाल केलीत. वरवर अगदी साध्या दिसणाऱ्या आपल्या प्रयत्नांनी देशात चैतन्य संचारेल, यावर कोणी विश्वासही ठेवला नसता. 

चंपारणमधले नीळ उत्पादकांचे आंदोलन असो, की मिठाचा सत्याग्रह; १९३०च्या मार्च-एप्रिलमध्ये आपण २४ दिवसांची  दांडी यात्रा काढलीत. भारताचा निद्रिस्त आत्मा जागा केलात तुम्ही.  इंग्रजांच्या नजरेला नजर भिडवून बोलायला या देशाला शिकवलेत. व्हाइसरॉयने आपल्याला दिल्लीला येऊन भेटण्याचा निरोप दिला तेव्हा तुम्ही कळवलेत, ‘हा देश आमचा आहे. आपल्याला भेटायचे आहे तर सेवाग्राममध्ये येऊन भेटा !’ लंडनमध्ये पाचव्या जॉर्जना भेटायला गेलात तुम्ही. ‘इतक्या कमी कपड्यात आपण का आला आहात?’ असे विचारल्यावर तुम्ही म्हणालात, ‘सगळे कपडे तर राजाने अंगावर घातले आहेत.’

बापू, केवळ भारतालाच नव्हे तर ४०हून अधिक देशांना तुम्हीच स्वातंत्र्याची प्रेरणा दिलीत. तुम्हीच वर्णभेदाविरुद्ध आपणच आवाज उठवलात. भारत दौऱ्यावर आलेल्या बराक ओबामा यांनी संसदेत बोलताना म्हटले होते,  ‘गांधीजी नसते तर मी राष्ट्रपती होऊ शकलो नसतो.’ सामान्य माणसाच्या जीवनाच्या मर्माला तुम्ही स्पर्श केलात, बापू! त्या स्पर्शाची जादू विसरले आमचे सगळे नेते. आज संपूर्ण देश ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेच्या मागे लागला आहे. ही शिकवण तुम्हीच तर दिली होती, बापू !  स्त्री शिक्षण आणि महिलांना समान अधिकारांबद्दल तुम्ही बोलत होतात, तेव्हा याबद्दल समाजात कोणी विचारही करत नव्हते. आज सर्वशिक्षा अभियानाचा बोलबाला आहे; पण बापू त्याचेही श्रेयही तुमचेच ! भारतमातेच्या मुली आज एका मागून एक शिखरे जिंकत आहेत, हे तुम्ही जिथे असाल तिथून पाहत  असालच, बापू ! 

महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची चर्चा होते; पण तुम्ही तर हे खूप आधीच सांगितले होते, की महिलांना समान राजकीय  अधिकार असले पाहिजेत ! तुमची आठवण आली की अभिमानाने ऊर भरून येतो. या देशात मोहनदास करमचंद गांधी नावाचा एक असा महात्मा झाला, ज्याने मानवतेच्या कल्याणाचा विचार केला. चूल पेटवण्यासाठी फुंकून फुंकून फुप्फुसे जखमी करून घेणाऱ्या असहाय्य महिलांचा त्रास सहन न होऊन तुम्ही वैज्ञानिक मगनभाई यांना सेवाग्रामला बोलावून घेतले होते, आठवते? स्त्रियांना या त्रासापासून सुटका मिळेल, अशा ‘मगन चुली’चा जन्म झाला. उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा आज संपत आली आहे. त्याचे श्रेयही तुमचेच बापू ! तुम्ही  खड्डा खोदून मानवी मल गाडून टाकण्याची कल्पना मांडली होती, म्हणजे त्या मलाचे खत होईल. डोक्यावर मैला वाहण्यापासून माणसाला मुक्ती मिळाली पाहिजे, हा तुमचा आग्रह होता.

या देशाला तुम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतले आणि त्याच्या कलाने प्रश्नांची उत्तरे शोधलीत. निसर्गोपचाराचा पुरस्कार केलात. पशुधनापासून मातीचे मोल शिकवलेत. राजीव गांधी यांनी गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत सत्तेची फळे पोहोचवायची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिशेने वेगाने प्रयत्न करत आहेत; पण ग्रामविकासाच्या या शिकवणीचे जनक तर तुम्हीच आहात, बापू !

तरुणांची ताकद तुम्ही जाणलीत. महिलांची शक्ती ओळखलीत. अस्पृश्यता संपवण्याची सुरुवातही केलीत. दलितांसाठी मंदिराची दारे उघडून दिलीत. जाती, धर्म आणि पंथांमध्ये वाटल्या गेलेल्या देशाला एकत्र आणण्यासाठी मानवता हा सर्वात मोठा धर्म असल्याचे तुम्हीच सांगितलेत. तुम्ही रामराज्याचा पुरस्कार केला तेव्हा तुम्हाला धार्मिक भेद अभिप्रेत नव्हता. सर्वांसाठी समानता हवी होती तुम्हाला. हिंसेच्या प्रदीर्घ कालखंडाने इतिहास रक्तरंजित होत असताना तुम्ही सत्य आणि अहिंसेचा मार्ग प्रशस्त केला, ही किती कमालीची गोष्ट आहे. ‘रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम. ईश्वराला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान...’ हे तुमचे प्रिय भजन होते !  क्षमा, अहिंसा, उपवास, मैत्री, बंधुभाव यावर तुमचा विश्वास ठेवत होता, तुमच्या अंत:करणात भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांचा वास होता, बापू! 

विज्ञानाचा लाभ गावांनाही झाला पाहिजे, असे तुम्हाला वाटत होते. म्हणून तर महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्याशी तुमची मैत्री झाली. तुमच्याबद्दल बोलताना ते म्हणाले होते, ‘खरोखरच हाडामासाची अशी कोणी व्यक्ती या पृथ्वीतलावर आली होती, यावर विश्वास ठेवणे भविष्यातील पिढ्यांना कठीण जाईल!’

...आज परिस्थिती तशीच तर आहे. आजच्या पिढीला तुमच्याविषयी फार काही माहिती नाही, हा आमचाच दोष आहे, बापू. या भारतभूमीवर आपण पुन्हा एकदा का येत नाही? तुमची कितीतरी स्वप्ने आजही अधुरी आहेत... 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी