शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

‘बिचारे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 03:25 IST

भाजपाला धरवत नाही आणि त्या पार्टीला सोडताही येत नाही अशी अवस्था जे पक्ष व पुढारी सध्या अनुभवत आहेत त्यात शिवसेना, अकाली दल, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी व अण्णाद्रमुक या पक्षांसारखेच शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, नितीशकुमार, अरुण शौरी, जेठमलानी व रामदास आठवले हे पुढारीही आहेत.

भाजपाला धरवत नाही आणि त्या पार्टीला सोडताही येत नाही अशी अवस्था जे पक्ष व पुढारी सध्या अनुभवत आहेत त्यात शिवसेना, अकाली दल, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी व अण्णाद्रमुक या पक्षांसारखेच शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, नितीशकुमार, अरुण शौरी, जेठमलानी व रामदास आठवले हे पुढारीही आहेत. त्यांना भाजपावाले फारसे मोजत नाहीत आणि त्यांना त्यांचे पूर्वायुष्यातील राजवैभव वा सामाजिक सन्मान विसरता येत नाही. त्यामुळे ते भाजपाजवळ आहेत आणि नाहीतही. जेवढे टोचता येईल तेवढे टोचून बघायचे आणि नंतर गप्प बसायचे अशी त्यांची सध्याची केविलवाणी स्थिती आहे. पक्ष सोडला वा बाजू सोडली तर निष्ठेचा प्रश्न येतो न सोडली तर सध्याची फरफट अनुभवावी लागते. एकेकाळी ही माणसे आणि हे पक्ष केवढ्या जोरात होते. त्यांचे शब्द झेलायला सरकार, प्रशासन व माध्यमे केवढी उत्सुक असत. आता त्यांची रया गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना, पक्षाच्या खासदारांना, पुढाऱ्यांना आणि संघालाच जेथे मोजत नाहीत तेथे या वळचणीला आलेल्या वा ती सोडू न शकणाºया दयनीयांना कितीसे महत्त्व देतील. यशवंत सिन्हा कधी काळी देशाचे अर्थमंत्री होते, परराष्ट्र खातेही त्यांनी सांभाळले होते. प्रशासनाचा अनुभव पाठीशी असल्याने त्यांच्या सल्ल्याला वाजपेयींच्या कारकीर्दीत केवढा मान होता. डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार काँग्रेसचे होते तरी तेही यशवंत सिन्हांच्या शब्दाचा आदर करीत. अरुण शौरी हे तर एकेकाळी केवळ पुढारी म्हणूनच नाहीत तर विश्वसनीय पत्रपंडित म्हणून भाजपासकट सर्वत्र गौरविले जात. आता संबित पात्राही त्यांची खिल्ली उडविताना व त्यांचे मोल मोजताना दिसतात. नितीशकुमार कधीकाळी मोदींचे प्रतिस्पर्धी म्हणून गणले जात. आता त्यांची मोदींच्या गोठ्यातील गाय झाली आहे. शत्रुघ्न सिन्हा नट होते. काही काळ ते देशाचे आरोग्यमंत्रीही होते. आता ते मंत्री नाहीत आणि नट म्हणूनही त्यांना फारशी कामे मिळत नाहीत. त्यांना मोदींनी कशाला विचारायचे? रामदास आठवले हे तर विचारात घ्यावे असेही पुढारी नाहीत. त्यांचा पक्ष कुठे, ते कुठे, त्यांचे अनुयायी कुठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून आता ते किती अंतरावर गेले आहेत? शिवसेना प. महाराष्टÑात प्रबळ आहे. पण तिची ताकद कमी करण्याचे व आम्ही तिला फारशी किंमत देत नाही हे दाखविण्याचेच धोरण महाराष्टÑातील फडणवीस सरकारने आखले आहे. एकेकाळी प्रमोद महाजन व मुंडे सेनेला सांभाळत. आता कुणी दुय्यम दर्जाचे मंत्री तिला सांभाळतात. सेना ‘स्वबळाची’ भाषा अधूनमधून बोलते. पण त्या भाषेचा अर्थ आपले वजन जोखून पाहण्याखेरीज व जमलेच तर त्याचा जास्तीचा मोबदला पदरात पाडून घेण्याखेरीज दुसरा नसतो हे सारेच समजून आहेत. सेनेची अनेक माणसे आमच्यात यायला तयार आहेत असे भाजपाचे पुढारी त्याखेरीज बोलत नाहीत. अकाली दलाचा पंजाबातील भाव ओसरला आहे. त्या दलासोबतच भाजपाचा पराभव काँग्रेसच्या कॅ. अमरिंदरसिंगांनी एकहाती केला आहे. काश्मिरात भाजपाला दुसरा मित्र नाही आणि होता तो मित्रही त्याच्यापासून दुरावला आहे. भाजपाचीही अडचण ही की धर्मवादी पक्षांखेरीज दुसरे त्यांच्यासोबत येत नाहीत आणि स्वत:ला धर्मवादी म्हणवून घेणे बहुतेक पक्षांना व पुढाºयांना परवडणारे नाही. परिणामी आहे त्या स्थितीत आहोत तसे राहायचे. अधूनमधून आपले अस्तित्व सिद्ध करायला मोदींच्या सरकारवर टीका करायची आणि मग गप्प बसायचे. ज्यांना संघटनेत स्थान नाही आणि बाहेर भाव नाही त्या पुढाºयांची आणि पक्षांची स्थिती अशीच होणार. कारण त्यांना आजच्याहून वेगळे पवित्रे घेता येत नाहीत हे त्यांना समजले आहे व लोकही ते समजून आहेत. माणसे मोठी आहेत, चांगलीही आहेत. पण त्यांच्या दुबळेपणावर इलाज तरी कोणता असतो ? अशी माणसे मग दुर्लक्षित व उपेक्षित राहतात आणि आपल्या उपेक्षेवर चिडण्यापलीकडे त्यांच्या हाती दुसरे काही उरतही नाही.