शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हेही नसे थोडके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:16 IST

व्यक्तिस्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार खºया अर्थाने सर्वसामान्यांना उपभोगता येत आहे का? या प्रश्नाचे उत्तर मागितले तर बहुतेक नाही असेच उत्तर मिळेल.

आज भारतीय स्वातंत्र्याचा ७० वा वाढदिवस साजरा करीत असताना भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार खºया अर्थाने सर्वसामान्यांना उपभोगता येत आहे का? या प्रश्नाचे उत्तर मागितले तर बहुतेक नाही असेच उत्तर मिळेल. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर काही निर्णय निश्चितच चांगले झाले, त्याचे परिणामही जाणवू लागले. नोटाबंदीच्या निर्णयाचा सुरुवातीला सर्वसामान्यांना फटका जाणवला असला तरी आता स्थिती सामान्य होऊ लागली आहे. पाकिस्तान, चीनसोबतचे संबंध ताणले असताना सरकारने खंबीर भूमिका घेतली त्याचेही स्वागत होत आहे. मात्र काही आघाड्यांवर सरकारला येत असलेले अपयश त्यामुळे नजरेआड करता येऊ शकत नाही. आज देशभरात हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तुम्हा आम्हा सर्वांचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला जगणे कठीण झाले आहे. ‘रोटी, कपडा, मकान’ हे आपल्या संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार त्यांना का मिळत नाहीत? बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना सुशिक्षित करण्याचे भरमसाठ कारखाने काढून शिक्षणसम्राट गब्बर झाले आहेत आणि होत आहेत. पण या कारखान्यातून बाहेर पडलेले देशातील सुमारे १२ कोटी सुशिक्षित तरुण (हा आकडा २०१५ चा आहे) मात्र आजही रस्त्यांवर वणवण फिरताना दिसत आहेत. सरकारने ‘राईट टू एज्युकेशन’ची सोय तर केली पण त्यांना ‘राईट टू जॉब’चा दिलासा देण्याची जबाबदारीही सरकारची आहे . ही जबाबदारी सरकार पार पाडत नसेल तर मग या रिकाम्या डोक्याच्या तरुणांनी देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा वेगळ्या मार्गाने उपयोग केला तर त्याला जबाबदार कोण? आज काश्मिरात काय स्थिती आहे. तेथील असंख्य बेकार तरुण-तरुणींनी अक्षरश: दहशतवाद्यांची ‘नोकरी’ पत्करली आहे. ऐकायला हे अविश्वसनीय आणि चमत्कारिक वाटेल पण हे वास्तव आहे. जम्मू काश्मिरात दहशतवादी कारवाया पार पाडताना अतिरेकी या तरुणांना हाताशी धरत आहेत. सुरक्षा पथकांवर दगडफेक करण्यासाठी या तरुणांना दिवसाकाठी ७०० रुपये दिले जात असल्याची माहिती आहे. कन्हैयाकुमारच्या आंदोलनात हजारो तरुण-तरुणींचा सहभाग असतो. सकल मराठा समाजाच्या मोर्चात लाखोंच्या संख्येने युवा वर्ग सामील झालेला दिसतो, तो केवळ हौस म्हणून नव्हे तर आपल्यातील असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी आणि आपले न्याय्य हक्क पदरात पाडून घेण्यासाठी ही तरुणाई रस्त्यावर उतरलेली असते. आता सरकार लोकांना दिलासा देणारे काही लोकोपयोगी निर्णय घेणार आहे. बार्कलेज इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सिद्धार्थ संन्याल यांच्या म्हणण्यानुसार मोदी सरकार आता येत्या १८ महिन्यांच्या काळात सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. ही पुढच्या निवडणुकांची तयारी म्हटले तरी उशिरा का होईना सरकारला सर्वसामान्यांचे हित आठवले हेही नसे थोडके.