शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास ठेवायचा?

By admin | Updated: October 4, 2016 00:29 IST

पाकिस्तान आणि भारताच्या पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सोमवारी परस्परांशी चर्चा करुन दोन्ही देशांदरम्यानच्या नियंत्रण रेषेवरील तणाव कमी

पाकिस्तान आणि भारताच्या पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सोमवारी परस्परांशी चर्चा करुन दोन्ही देशांदरम्यानच्या नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचे मान्य केल्याचे वृत्त पाकिस्तानातील जिओ टीव्हीने अधिकृतपणे दिले असले तरी त्यावर विश्वास ठेवायचा का असा प्रश्न कोणत्याही भारतीयाच्या मनात उभा राहू शकतो. पाकी पंतप्रधानांचे सल्लागार नासीर खान जंजुआ यांनी अजित डोवाल यांच्याशी संपर्क साधला आणि तणाव दूर करण्याचा प्रस्ताव त्यांच्या पुढ्यात ठेवला. तो डोवाल यांनी स्वीकारल्याचे पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनीही यी वृत्तास दुजोरा दिल्याचे सदर वृत्तात म्हटले आहे. नियंत्रण रेषेवर अधूनमधून चकमकी होतच असतात. पण गेल्या तीन आठवड्यांपासून तिथे फार मोठा तणाव निर्माण झाला आहे. उरी येथील भारताच्या लष्करी तळावर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख उत्तर यामुळे तणावात आणखीनच वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर नासीर खान आणि डोवाल यांच्यात चर्चा झाली. पाकने बळकावलेल्या काश्मीरात घुसून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर नजीकच्या काळात आणखी अशी कोणतीही कारवाई करण्याचा भारताचा इरादा नसल्याचे खुद्द भारतीय लष्करानेच जाहीर केले होते. अप्रत्यक्षरीत्या ते तणाव दूर करण्याचे एकतर्फी अभिवचनच होते. परंतु रविवारी रात्री उशिरा जम्मू-काश्मीरातील बारामुल्ला येथील भारताच्या लष्करी छावणीवर दोन अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात ते दोघे ठार मारले गेले, हे वेगळे. पण भारतात घुसखोरी करणारे दहशतवादी आणि आत्मघातकी अतिरेकी पाकिस्ताननाचे पुरस्कृत केलेले असतात हे स्वच्छ असल्याने अजित डोवाल यांच्या पुढ्यात ठेवण्यात आलेल्या तणावमुक्तीच्या देकाराबाबत शंका निर्माण होणे अनाठायी ठरत नाही. उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये झालेल्या मतैक्याच्या वृत्तास दुजोरा देतानाच सरताज अझीझ यांनी भारतावर आरोप करताना, नियंत्रण रेषेवर तणाव असू नये अशी पाकिस्तानची आंतरिक इच्छा असली तरी भारत मात्र तिथे सतत तणाव निर्माण करीत असल्याचा आरोप केला आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करणे आणि काश्मीरवर सारे लक्ष केन्द्रीत करणे हा पाकचा इरादा असल्याचेही अझीझ यांनी म्हटले आहे. पण त्याहीपुढे जाऊन आणि आपल्या पंतप्रधानांचा हवाला देऊन ते म्हणतात की, जोवर काश्मीरचा प्रश्न सुटत नाही तोवर नियंत्रण रेषेवरील तणाव तसाच कायम राहील याची स्पष्ट कल्पना नवाझ शरीफ यांनी जागतिक नेत्यांना दिली आहे. हे जर खरे असेल आणि काश्मीरशी पाकचा काहीही संबंध नसताना तो प्रश्न सुटेपर्यंत तणाव कमी होणार नाही याची खुद्द शरीफ यांनाच खात्री वाटत असताना नासीर खान किंवा सरताज अझीझ काय म्हणतात व काय मान्य करतात याला काहीही महत्व उरत नाही.