शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

मनाचिये गुंथी - प्रत्येकाचा पाऊस

By admin | Updated: June 2, 2017 00:17 IST

पाऊस सगळ्यांना आवडतो. सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, कलावंतांपासून

पाऊस सगळ्यांना आवडतो. सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, कलावंतांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वांनाच तो हवा असतो. माणसांनाच काय पण प्राणी, पक्षी, फुलपाखरे, झाडे-झुडपे यांनाही तो हवा असतो.माणसाच्या प्रतिभेला पाऊस स्पर्श करतो आणि तिची वेगवेगळी रूपे तरारून येतात. कवी पावसावर कविता करतात. कथा, कादंबऱ्या, चित्रपट निर्माण होतात. अजरामर पेंटिंग्ज, संगीतातील बंदिशी जन्माला येतात. प्रेमीजनाना पावसात भिजायला आवडते, चित्रपटनिर्मात्यांना ओलेती नायिका दाखवायला आणि प्रेक्षकांना ती पहायला आवडते. पाऊस कधी घननिळा होऊन बरसतो आणि झाडाच्या फांदीतून हिरवा मोरपिसारा अवचित उलगडतो (मंगेश पाडगावकर), कधी मातीच्या सुगंधाशी एकरूप होऊन बरसू लागतो आणि मोकळ्या केसात थेंबांचे मोती गुंफू लागतो (शांता शेळके), कधी तो बेभान होऊन धिंगाणा घालत चंद्रमौळी घराची आणि बागेची नासधूस करतो (इंदिरा संत) तर कधी झाडांच्या पानांना कुरवाळत दु:खाच्या मंद सुरांनी एखाद्या संवेदनशील कवीची (ग्रेस) झोपमोड करतो...कलावंतांना वाटते की पाऊस आपल्या मालकीचा आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे; पण प्रत्यक्षात मुके जीव, निसर्ग आणि सर्वसामान्य माणसेही आपापल्या पद्धतीने पावसावरील प्रेम व्यक्त करीत असतात. त्यांचाही तो हक्कच नाही का? विजांचा कडकडाट आणि म्हातारीचे दळण यातील नाते शोधत गोधडीत गुडूप झोपी जाणारा नातू, भात लावणीसाठी घोंगडीची खोळ डोक्यावर घेऊन समाधी अवस्थेत बैलांच्या मागे सुटलेला नांगर, पावसाच्या पहिल्याच सरीने पालवणारे विशाल छातीचे पहाड, सुदूर माळराने, योगनिद्रेतून जागे होणारे बेडूक, खेकडे, ऐलापैलाच्या भाजीचे सुसाट सुटणारे वेल्हाळ अंकुर, हा सारा सृजनशील प्रतिसाद म्हणजे त्या पावसाला दिलेली टाळी नसते का? मात्र पाऊस जितका उत्फुल्ल आणि कोमल तितकाच तो रौद्र आणि विध्वंसक ! क्षणात तो होत्याचे नव्हते करून टाकतो. तसे पाहता विध्वंस हासुद्धा माणसाच्या जगण्याचाच एक भाग. तो धडा माणसाला शिकवण्याची जबाबदारी पाऊस घेतो. म्हणूनच यशस्वी आणि अनुभवी माणसे आपण किती पावसाळे पाहिले याचा दाखला देतात, उन्हाळे किंवा हिवाळ्यांचा नाही ! काहीही असले तरी पाऊस, सर्वांना हवा असतो. यंदाही तो मनसोक्त कोसळावा एवढीच अपेक्षा. बा पावसा, या वर्षी सर्वांना समान न्याय दे, एखाद्या गावात पडायचे विसरू नकोस, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही (यशवंत मनोहर) असे म्हणण्याची वेळ कुणावर येऊ देऊ नकोस, एवढीच प्रार्थना...- प्रल्हाद जाधव -