शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - प्रत्येकाचा पाऊस

By admin | Updated: June 2, 2017 00:17 IST

पाऊस सगळ्यांना आवडतो. सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, कलावंतांपासून

पाऊस सगळ्यांना आवडतो. सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, कलावंतांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वांनाच तो हवा असतो. माणसांनाच काय पण प्राणी, पक्षी, फुलपाखरे, झाडे-झुडपे यांनाही तो हवा असतो.माणसाच्या प्रतिभेला पाऊस स्पर्श करतो आणि तिची वेगवेगळी रूपे तरारून येतात. कवी पावसावर कविता करतात. कथा, कादंबऱ्या, चित्रपट निर्माण होतात. अजरामर पेंटिंग्ज, संगीतातील बंदिशी जन्माला येतात. प्रेमीजनाना पावसात भिजायला आवडते, चित्रपटनिर्मात्यांना ओलेती नायिका दाखवायला आणि प्रेक्षकांना ती पहायला आवडते. पाऊस कधी घननिळा होऊन बरसतो आणि झाडाच्या फांदीतून हिरवा मोरपिसारा अवचित उलगडतो (मंगेश पाडगावकर), कधी मातीच्या सुगंधाशी एकरूप होऊन बरसू लागतो आणि मोकळ्या केसात थेंबांचे मोती गुंफू लागतो (शांता शेळके), कधी तो बेभान होऊन धिंगाणा घालत चंद्रमौळी घराची आणि बागेची नासधूस करतो (इंदिरा संत) तर कधी झाडांच्या पानांना कुरवाळत दु:खाच्या मंद सुरांनी एखाद्या संवेदनशील कवीची (ग्रेस) झोपमोड करतो...कलावंतांना वाटते की पाऊस आपल्या मालकीचा आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे; पण प्रत्यक्षात मुके जीव, निसर्ग आणि सर्वसामान्य माणसेही आपापल्या पद्धतीने पावसावरील प्रेम व्यक्त करीत असतात. त्यांचाही तो हक्कच नाही का? विजांचा कडकडाट आणि म्हातारीचे दळण यातील नाते शोधत गोधडीत गुडूप झोपी जाणारा नातू, भात लावणीसाठी घोंगडीची खोळ डोक्यावर घेऊन समाधी अवस्थेत बैलांच्या मागे सुटलेला नांगर, पावसाच्या पहिल्याच सरीने पालवणारे विशाल छातीचे पहाड, सुदूर माळराने, योगनिद्रेतून जागे होणारे बेडूक, खेकडे, ऐलापैलाच्या भाजीचे सुसाट सुटणारे वेल्हाळ अंकुर, हा सारा सृजनशील प्रतिसाद म्हणजे त्या पावसाला दिलेली टाळी नसते का? मात्र पाऊस जितका उत्फुल्ल आणि कोमल तितकाच तो रौद्र आणि विध्वंसक ! क्षणात तो होत्याचे नव्हते करून टाकतो. तसे पाहता विध्वंस हासुद्धा माणसाच्या जगण्याचाच एक भाग. तो धडा माणसाला शिकवण्याची जबाबदारी पाऊस घेतो. म्हणूनच यशस्वी आणि अनुभवी माणसे आपण किती पावसाळे पाहिले याचा दाखला देतात, उन्हाळे किंवा हिवाळ्यांचा नाही ! काहीही असले तरी पाऊस, सर्वांना हवा असतो. यंदाही तो मनसोक्त कोसळावा एवढीच अपेक्षा. बा पावसा, या वर्षी सर्वांना समान न्याय दे, एखाद्या गावात पडायचे विसरू नकोस, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही (यशवंत मनोहर) असे म्हणण्याची वेळ कुणावर येऊ देऊ नकोस, एवढीच प्रार्थना...- प्रल्हाद जाधव -