शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

उत्सुकता पुनरागमनाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 05:52 IST

एकनाथराव खडसे यांच्या मंत्रिमंडळ तर सुरेशदादा जैन यांच्या राजकारणातील पुनरागमनाची समर्थकांना उत्सुकता आहे

एकनाथराव खडसे यांच्या मंत्रिमंडळ तर सुरेशदादा जैन यांच्या राजकारणातील पुनरागमनाची समर्थकांना उत्सुकता आहेसुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे या दोन्ही नेत्यांच्या पुनरागमाविषयी समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. घरकुल प्रकरणात सुरेशदादा साडेचार वर्षांपासून कारागृहात होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्वपक्षीय नेते, मंत्री, आमदारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. जैन गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहेत, नऊ वेळा आमदार आणि दोनदा मंत्री राहिल्याने संपूर्ण राज्यात त्यांचे हितचिंतक आहेत. जामिनावर सुटल्याने स्वाभाविकपणे चाहता वर्ग भेटायला येणे अपेक्षित होते. परंतु या स्वागत, भेटीगाठींमधून राजकीय अर्थ काढले जाऊ लागले. राजकारणात परतण्याचा तूर्त विचार नाही, असे त्यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केल्यानंतरही तर्कवितर्कांना सीमा उरली नाही. दुसरीकडे एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत जंगी सभा झाली. मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागण्यामागे स्वपक्षातील काही नेत्यांचा कट कारणीभूत असल्याची जाहीर टीका खडसे यांनी पुन्हा एकदा केली. खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या, असे आवाहन समर्थकांनी केले. लवकरच खडसे मंत्री होतील, अशी ग्वाही देऊन दानवे, फुंडकर यांनी समर्थकांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जैन आणि खडसे ही दोन शक्तिकेंद्रे मानली जातात. पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिकेंद्रीत राजकारणाला अधिक महत्त्व आले आहे. जैन घरकुल प्रकरणामुळे राजकारणातून दूर झाले आणि खडसे यांना मैदान मोकळे सापडले. त्यांनी जैन यांची शैली वापरुन सर्व पक्षीयांना एकत्र करुन जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, बाजार समिती यावर वर्चस्व मिळविले. मंत्रिमंडळातील डझनभर खाती हातात असल्याने त्यांचा प्रभाव कायम राहिला. मात्र कुटुंबातील तीन सदस्यांना सत्तापदे दिल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. मंत्रिपद गेल्यानंतर स्वत: खडसे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. चाळीसगाव, पाचोरा, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर या तालुक्यांमधील खडसे समर्थकांनी बैठका घेऊन पक्ष कार्यावर बहिष्काराचा इशारा दिला आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या पदाधिकारी बैठकीला काही तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. या अस्वस्थतेची दखल प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित राहून घेतली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण पाच वर्षे असलेले विरोधी पक्षनेतेपद आणि युती सरकारच्या काळात महसूल, कृषी, उत्पादन शुल्क सारखी महत्त्वाची खाती असल्याने खडसे जिल्ह्यातील एकमेव प्रभावशाली नेते बनले. परंतु मंत्रिपद जाताच पक्षातील विरोधक सक्रीय झाले. निद्रीस्त असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने संघटनात्मक मेळावे, आंदोलनांद्वारे अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली. शिवसेनेने खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पक्ष बळकटीच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. पुढील सहा महिन्यात विधान परिषद निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका स्वबळावर लढविण्याची परंपरा असल्याने सर्व पक्ष आता तयारीला लागले आहेत. शिवसेनेला सुरेशदादा जैन यांच्या आगमनामुळे बळ मिळण्याची आशा आहे. त्या दृष्टीने मंत्र्यांपासून संपर्क प्रमुखांपर्यंत अनेक सैनिकांनी त्यांच्या भेटी घेतल्या.न्या.झोटिंग समितीच्या निष्कर्षावर खडसे यांचे तर घरकुल प्रकरणाच्या निकालावर जैन यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. हे वास्तव नेत्यांना अवगत असले तरी कार्यकर्त्यांना तातडीने पुनरागमनाची आशा लागली आहे. - मिलिंद कुलकर्णी