शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उत्सुकता पुनरागमनाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 05:52 IST

एकनाथराव खडसे यांच्या मंत्रिमंडळ तर सुरेशदादा जैन यांच्या राजकारणातील पुनरागमनाची समर्थकांना उत्सुकता आहे

एकनाथराव खडसे यांच्या मंत्रिमंडळ तर सुरेशदादा जैन यांच्या राजकारणातील पुनरागमनाची समर्थकांना उत्सुकता आहेसुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे या दोन्ही नेत्यांच्या पुनरागमाविषयी समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. घरकुल प्रकरणात सुरेशदादा साडेचार वर्षांपासून कारागृहात होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्वपक्षीय नेते, मंत्री, आमदारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. जैन गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहेत, नऊ वेळा आमदार आणि दोनदा मंत्री राहिल्याने संपूर्ण राज्यात त्यांचे हितचिंतक आहेत. जामिनावर सुटल्याने स्वाभाविकपणे चाहता वर्ग भेटायला येणे अपेक्षित होते. परंतु या स्वागत, भेटीगाठींमधून राजकीय अर्थ काढले जाऊ लागले. राजकारणात परतण्याचा तूर्त विचार नाही, असे त्यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केल्यानंतरही तर्कवितर्कांना सीमा उरली नाही. दुसरीकडे एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत जंगी सभा झाली. मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागण्यामागे स्वपक्षातील काही नेत्यांचा कट कारणीभूत असल्याची जाहीर टीका खडसे यांनी पुन्हा एकदा केली. खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या, असे आवाहन समर्थकांनी केले. लवकरच खडसे मंत्री होतील, अशी ग्वाही देऊन दानवे, फुंडकर यांनी समर्थकांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जैन आणि खडसे ही दोन शक्तिकेंद्रे मानली जातात. पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिकेंद्रीत राजकारणाला अधिक महत्त्व आले आहे. जैन घरकुल प्रकरणामुळे राजकारणातून दूर झाले आणि खडसे यांना मैदान मोकळे सापडले. त्यांनी जैन यांची शैली वापरुन सर्व पक्षीयांना एकत्र करुन जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, बाजार समिती यावर वर्चस्व मिळविले. मंत्रिमंडळातील डझनभर खाती हातात असल्याने त्यांचा प्रभाव कायम राहिला. मात्र कुटुंबातील तीन सदस्यांना सत्तापदे दिल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. मंत्रिपद गेल्यानंतर स्वत: खडसे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. चाळीसगाव, पाचोरा, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर या तालुक्यांमधील खडसे समर्थकांनी बैठका घेऊन पक्ष कार्यावर बहिष्काराचा इशारा दिला आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या पदाधिकारी बैठकीला काही तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. या अस्वस्थतेची दखल प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित राहून घेतली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण पाच वर्षे असलेले विरोधी पक्षनेतेपद आणि युती सरकारच्या काळात महसूल, कृषी, उत्पादन शुल्क सारखी महत्त्वाची खाती असल्याने खडसे जिल्ह्यातील एकमेव प्रभावशाली नेते बनले. परंतु मंत्रिपद जाताच पक्षातील विरोधक सक्रीय झाले. निद्रीस्त असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने संघटनात्मक मेळावे, आंदोलनांद्वारे अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली. शिवसेनेने खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पक्ष बळकटीच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. पुढील सहा महिन्यात विधान परिषद निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका स्वबळावर लढविण्याची परंपरा असल्याने सर्व पक्ष आता तयारीला लागले आहेत. शिवसेनेला सुरेशदादा जैन यांच्या आगमनामुळे बळ मिळण्याची आशा आहे. त्या दृष्टीने मंत्र्यांपासून संपर्क प्रमुखांपर्यंत अनेक सैनिकांनी त्यांच्या भेटी घेतल्या.न्या.झोटिंग समितीच्या निष्कर्षावर खडसे यांचे तर घरकुल प्रकरणाच्या निकालावर जैन यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. हे वास्तव नेत्यांना अवगत असले तरी कार्यकर्त्यांना तातडीने पुनरागमनाची आशा लागली आहे. - मिलिंद कुलकर्णी