शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

जीवनातही यशस्वी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:36 IST

एकदा शाळेत पाऊल टाकले की सामना होतो तो अभ्यास, परीक्षा अन् निकालाशी. अपेक्षित निकाल लागला की आनंद गगनात मावेनासा होतो.

एकदा शाळेत पाऊल टाकले की सामना होतो तो अभ्यास, परीक्षा अन् निकालाशी. अपेक्षित निकाल लागला की आनंद गगनात मावेनासा होतो. यश काहीसे हुकले की हिरमोडही होतो. नुकतेच सीबीएसईचे दहावी, बारावीचे निकाल लागले. त्यापाठोपाठ स्टेट बोर्डाचा निकालही आला. नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारत स्त्री शिक्षणाचा झेंडा उंचावला. मुलांनीही चांगली कामगिरी केली. सर्वच गुणवंत अभिनंदनास अन् कौतुकास पात्र आहेत. करिअरच्या दृष्टीने दहावी ही पहिली तर बारावी ही दुसरी महत्त्वाची पायरी मानली जाते. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये एक एक गुण मिळविण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. त्यासाठी दिवसाची रात्र करून परिश्रमही घेतले जातात. पाया मजबूत झाला की पुढची करिअरची इमारतही मजबूत होते, असे मानतात. ते बहुतांशी बरोबरही आहे. मात्र, या स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये अनेक मानसिक बदल होत असतात. या मानसिक बदलाचे पुढे गंभीर परिणामही विद्यार्थ्याच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी या दृष्टीने मुलांबाबत विचार करण्याची गरज आहे. आपलं जीवन ही देखील एक परीक्षाच आहे. जीवनाच्या प्रवासात अनेकदा आपली कसोटी लागते. पदोपदी कौटुंबिक, मानसिक, भावनिक परीक्षांना सामोरे जावे लागते. अभ्यासाच्या परीक्षांप्रमाणे या परीक्षांचे कुठलेही सिलॅबस नसते. हे प्रश्न कसे सोडवायचे याचा कुठेही परीपाठ नसतो. आपल्या अनुभवातून मिळालेल्या प्रगल्भतेच्या आधारे स्वत:च स्वत:चा गाईड बनून, या प्रश्नांची समर्पक उत्तरे आपल्यालाच शोधायची असतात. अभ्यासातील, शालेय परीक्षेतील यश हे नक्कीच महत्त्वाचे आहे. मात्र, तेवढेतच महत्त्वाचे आहे की तुम्ही जीवनात एक चांगले व्यक्ती म्हणून किती यशस्वी होता. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या जबाबदाºया तुम्ही किती यशस्वीपणे पार पाडता. कुणाच्या मदतीसाठी तुम्ही कसे धावून जाता. त्यामुळे एकीकडे करिअरचे ध्येय गाठण्यासाठी धडपड होत असताना दुसरीकडे ही भावनिक गुंतागुंत कशी सोडवायची याचे मार्ग शोधण्यासाठी आतापासूनच कुटुंबात, समाजात रममान व्हा. सर्वांना आपलसं मानून त्यांना आपलसं करण्यासाठी वेळ द्या. कोणत्याही परीक्षेचा निकाल मनासारखा लागला की तो आनंद देणाराच असतो. असाच आनंद सदैव जीवनाच्या परीक्षेतही मिळायला हवा. चांगला निकाल, एक चांगला व्यक्ती घडवतो, पण चांगले व्यक्तिमत्त्व घडले की कित्येक निकालही त्याच्या पोठोपाठ चालून येतात.