शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

या मीडियापासून सावध व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:24 IST

‘खरेच का हो’ असे विचारत टिष्ट्वटर किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर प्रश्न येतो ‘नेहरू म्हणे मुसलमान होते.’ असे काही वाचले की मनात येते, देशात मूर्खांएवढीच लबाडांची संख्याही मोठी आहे

‘खरेच का हो’ असे विचारत टिष्ट्वटर किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर प्रश्न येतो ‘नेहरू म्हणे मुसलमान होते.’ असे काही वाचले की मनात येते, देशात मूर्खांएवढीच लबाडांची संख्याही मोठी आहे आणि त्यांच्या हातात जगभर जाणारी प्रचाराची व धूळफेकीची साधने आली आहेत. गांधी, नेहरू, इंदिराजी, राजीव यांच्यासह इतर अनेक काँग्रेस नेत्यांविषयीची अशी ‘कानाफुसी’ बरीच वर्षे देशात एका राजकीय परिवाराने चालविली आहे. आता त्या परिवाराने अशी बदनामी सातत्याने चालविता यावी यासाठी पगारी हस्तक (ट्रोल्स) नेमले आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनपर पुस्तकाने देशात अशा दोन हजारांवर प्रचारकांची फौजच संघाने नेमली असल्याचे व राम माधव हे त्या फौजेचे सेनापती असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. खोटी बातमी वा प्रचार ही माहिती सत्यापेक्षाही अधिक वेगाने प्रवास करते व ती ज्यांच्यापर्यंत जावी असे ती पाठविणाऱ्यांना अपेक्षित असते त्यांच्यापर्यंत ती नेमकी व तात्काळ पोहचतही असते. अशा माहितीचे थोरपण वाचणाºयाच्या लक्षात तात्काळ येतेही मात्र त्यामुळे आपल्या आदरणीय स्थानांविषयी असे बोलले वा लिहिले जाते यामुळे संबंधित माणसांना व्यथित करण्याचे समाधान ती पाठविणाºयाला लाभत असते. खरे तर अशा माणसांच्या कानाखाली चांगले आवाजच काढायचे. पण त्याला कायद्याची मान्यता नाही आणि त्याविषयीची कायद्याची पावलेही कमालीची मंदगती असते. छोट्या व अजाण प्रचारकांनीच या साधनांचा उपयोग चालविला आहे असे नाही. आता बडी व प्रतिष्ठित म्हणविणारी माणसेही त्या मार्गाने जाऊन आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याच्या प्रयत्नाला लागली आहेत. ‘तुघ्लक’ या प्रसिद्ध नियतकालिकाचे संपादक व संघाचे प्रचारक एस. गुरुमूर्ती यांनी ‘खरेच का हो’ असे म्हणत एक प्रश्न आता टिष्ट्वटरवर टाकला आहे. ‘म्हणे, कार्ती चिदंबरम यांचा खटला ऐकणारे न्या. मुरलीधरन हे एकेकाळी पी. चिदंबरम यांचे सहकारी होते?’ उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गुरुमूर्ती यांना त्यांचे शब्द पुढे गिळावे लागले ती गोष्ट वेगळी. परंतु तेवढ्यावर हा प्रकार थांबणारा नाही. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांच्याविषयीची ‘खरे का हो’ अशी एक वृत्तमालिकाच मधु किश्वर या भाजपला जवळच्या असलेल्या पत्रकार महिलेने काही काळ चालविले. या व अशा प्रचारकांचे केंद्र दिल्लीत आणि बेंगळुरूमध्ये आहे आणि त्यांनी कोणती विचारणा केव्हा टिष्ट्वटरवर टाकायची हे त्यांना सांगायला त्या परिवारातली जाणती माणसेही बसली आहेत. काँग्रेस पक्षाने दीडशे वर्षांचा इतिहास असलेले त्यातली कोणतीही बाब व व्यक्ती निशाण्यावर घेऊन त्याविषयीचा अत्यंत विपर्यस्त व बरेचदा कमालीचा हीन प्रचार ज्या हस्तकांकडून होतो. त्यांना उत्तर देता नाही व त्याची त्यांना व त्यांच्या चाहत्यांना गरजही नसते. त्यामुळे त्यांना उत्तर देणारे त्यांच्यासारखेच प्रचारक आता इतरही पक्षांनी हाताशी धरले आहेत व ते त्यांना चोख व समजणारी उत्तरे देतानाही दिसत आहेत. स्मृती इराणी व त्यांच्यासारख्या इतर मंत्र्यांबाबतची अशी विचारणा सोशल मीडियावर आता येऊ लागली आहे. नुकतेच एक छायाचित्र साºया व्हिडिओनिशी फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर आले. त्यात गुजरातचे मुख्य पोलीस संचालक, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना नमस्कार करताना दाखविले आहे. मुळात हे चित्र ‘क्या यही सच है’ या चित्रपटातील एका देखाव्यावर दुसरे चित्र लादून तयार केले. गोरखपूरची निवडणूक जिंकणारे समाजवादी पक्षाचे उमेदवारही असेच पक्षविरोधी बोलताना टिष्ट्वटरवर दाखविले गेले, ममता बॅनर्जींच्या तोंडी नको तशी वाक्ये घालून त्यांचे चित्र असेच आणले गेले. मुळात ते चित्र काही वर्षांपूर्वी ममताबार्इंनी नॅनो गाडीविरुद्ध केलेल्या आंदोलनाच्या वेळचे आहे. हा प्रकार आपल्या लोकशाहीला कलंक लावणारा व साºया ज्ञान माध्यमांची इभ्रत घालविणारा आहे. सबब या सोशल मीडियाबाबत सावध होण्याची वेळ त्या मीडियानेच आता साºया जाणकारांवर आणली आहे.