शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘लिटिल थिएटर’चा आधारस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:26 IST

बालनाट्य चळवळ हे मराठी रंंगभूमीवरील महत्त्वाचे पान आहे आणि रंगभूमीच्या समृद्धतेत बालरंगभूमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

बालनाट्य चळवळ हे मराठी रंंगभूमीवरील महत्त्वाचे पान आहे आणि रंगभूमीच्या समृद्धतेत बालरंगभूमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ बालनाट्यासाठी आयुष्य वेचलेल्या काही ज्येष्ठ व श्रेष्ठ नाट्यकर्मींमध्ये सुधा करमरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. अनेक दशके फक्त बालनाट्यांसाठी त्यांनी वाहून घेतले आणि या चळवळीला सकस खतपाणी घालून मोठ्या प्रेमाने तिची जोपासना केली. सुधातार्इंनी बालरंगभूमी तर गाजवलीच; परंतु त्याचबरोबर व्यावसायिक नाटकांतही त्यांनी अनेक भूमिका केल्या. मास्टर दत्ताराम, मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाणेकर, काशीनाथ घाणेकर अशा श्रेष्ठ नटांसोबत त्यांना रंगभूमीवर काम करण्याचे भाग्य लाभले. पण केवळ व्यावसायिक अभिनयक्षेत्रापुरतीच त्यांची नाट्यचळवळ मर्यादित राहिली नाही. त्यांना बालरंगभूमी सतत खुणावत होती. त्यासाठी विशेष शिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. अमेरिकेत जाऊन त्यांनी ‘बालरंगभूमी’ या संकल्पनेचा अभ्यास केला आणि बालरंगभूमीची संकल्पना त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. तोपर्यंत बालरंगभूमीवर बालनाट्याचा ठराविक असा साचा ठरला होता. त्यात आमूलाग्र बदल करण्याचा ‘पण’ त्यांनी केला. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून सकस अशी बालनाट्ये व्हायला हवीत, अशी संकल्पना त्यांच्या मनात फेर धरू लागली. यातूनच ‘बालरंगभूमी-लिटिल थिएटर’चा उदय झाला. मुलांचे नाटक कसे असायला हवे, याचे वेगळे परिमाण त्यांनी निश्चित केले. त्यासाठी त्यांनी मुलांसाठी खास नाटके लिहून घेतली आणि त्यांचे प्रयोग सादर केले. बालरंगभूमीसाठी हे एक महत्त्वाचे वळण ठरले. बालनाट्य हे मुलांच्या करमणुकीसाठी असावे, हा उद्देश पक्का करून सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीकडे पाहण्याचा तत्कालीन दृष्टिकोन बदलून टाकला. याचा परिणाम थेट मुलांना रंगभूमीकडे वळवण्याकडे झाला. त्याआधीही काही जण बालनाट्य करत होतेच; परंतु लहान मुलांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांना नाटकातून निखळ आनंद मिळावा, या हेतूने सुधा करमरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. अनेक दशके त्यांनी बालरंगभूमीवर कार्य करत, बालनाट्यांना वेगळा आयाम प्राप्त करून दिला. त्यांच्या समकालीन रंगकर्मींची साथ त्यांना या चळवळीत मिळाली. त्यांच्या हाताखालून गेलेले अनेक रंगकर्मी सध्या नाट्यसृष्टीत पाय रोवून उभे आहेत. मराठी रंगभूमीचा इतिहास लिहायचा झाला, तर सुधातार्इंनी बालनाट्यासाठी दिलेले योगदान हे त्यातील महत्त्वाचे पान असेल. बालरंगभूमीच्या चळवळीत जी मंडळी शेवटपर्यंत कार्यरत होती; त्यापैकी सुलभा देशपांडे या अलीकडेच सर्वांना सोडून गेल्या आणि त्यांच्यानंतर बालनाट्यासाठी आयुष्य वाहून घेणाºया सुधाताईही आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. ‘लिटिल थिएटर’चे याहून अधिक नुकसान ते काय असू शकेल...?