शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘लिटिल थिएटर’चा आधारस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:26 IST

बालनाट्य चळवळ हे मराठी रंंगभूमीवरील महत्त्वाचे पान आहे आणि रंगभूमीच्या समृद्धतेत बालरंगभूमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

बालनाट्य चळवळ हे मराठी रंंगभूमीवरील महत्त्वाचे पान आहे आणि रंगभूमीच्या समृद्धतेत बालरंगभूमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ बालनाट्यासाठी आयुष्य वेचलेल्या काही ज्येष्ठ व श्रेष्ठ नाट्यकर्मींमध्ये सुधा करमरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. अनेक दशके फक्त बालनाट्यांसाठी त्यांनी वाहून घेतले आणि या चळवळीला सकस खतपाणी घालून मोठ्या प्रेमाने तिची जोपासना केली. सुधातार्इंनी बालरंगभूमी तर गाजवलीच; परंतु त्याचबरोबर व्यावसायिक नाटकांतही त्यांनी अनेक भूमिका केल्या. मास्टर दत्ताराम, मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाणेकर, काशीनाथ घाणेकर अशा श्रेष्ठ नटांसोबत त्यांना रंगभूमीवर काम करण्याचे भाग्य लाभले. पण केवळ व्यावसायिक अभिनयक्षेत्रापुरतीच त्यांची नाट्यचळवळ मर्यादित राहिली नाही. त्यांना बालरंगभूमी सतत खुणावत होती. त्यासाठी विशेष शिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. अमेरिकेत जाऊन त्यांनी ‘बालरंगभूमी’ या संकल्पनेचा अभ्यास केला आणि बालरंगभूमीची संकल्पना त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. तोपर्यंत बालरंगभूमीवर बालनाट्याचा ठराविक असा साचा ठरला होता. त्यात आमूलाग्र बदल करण्याचा ‘पण’ त्यांनी केला. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून सकस अशी बालनाट्ये व्हायला हवीत, अशी संकल्पना त्यांच्या मनात फेर धरू लागली. यातूनच ‘बालरंगभूमी-लिटिल थिएटर’चा उदय झाला. मुलांचे नाटक कसे असायला हवे, याचे वेगळे परिमाण त्यांनी निश्चित केले. त्यासाठी त्यांनी मुलांसाठी खास नाटके लिहून घेतली आणि त्यांचे प्रयोग सादर केले. बालरंगभूमीसाठी हे एक महत्त्वाचे वळण ठरले. बालनाट्य हे मुलांच्या करमणुकीसाठी असावे, हा उद्देश पक्का करून सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीकडे पाहण्याचा तत्कालीन दृष्टिकोन बदलून टाकला. याचा परिणाम थेट मुलांना रंगभूमीकडे वळवण्याकडे झाला. त्याआधीही काही जण बालनाट्य करत होतेच; परंतु लहान मुलांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांना नाटकातून निखळ आनंद मिळावा, या हेतूने सुधा करमरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. अनेक दशके त्यांनी बालरंगभूमीवर कार्य करत, बालनाट्यांना वेगळा आयाम प्राप्त करून दिला. त्यांच्या समकालीन रंगकर्मींची साथ त्यांना या चळवळीत मिळाली. त्यांच्या हाताखालून गेलेले अनेक रंगकर्मी सध्या नाट्यसृष्टीत पाय रोवून उभे आहेत. मराठी रंगभूमीचा इतिहास लिहायचा झाला, तर सुधातार्इंनी बालनाट्यासाठी दिलेले योगदान हे त्यातील महत्त्वाचे पान असेल. बालरंगभूमीच्या चळवळीत जी मंडळी शेवटपर्यंत कार्यरत होती; त्यापैकी सुलभा देशपांडे या अलीकडेच सर्वांना सोडून गेल्या आणि त्यांच्यानंतर बालनाट्यासाठी आयुष्य वाहून घेणाºया सुधाताईही आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. ‘लिटिल थिएटर’चे याहून अधिक नुकसान ते काय असू शकेल...?