शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बापू, ‘अंग चोरणे’ कधी सोडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 07:03 IST

राज्यातील एक वजनदार मंत्री म्हणून क्रांतिकारी निर्णयाचे धनी ठरलेले सुभाषबापू देशमुख जिल्ह्याच्या राजकारणात मात्र ‘अंग चोरून’ काम करताहेत. ते ‘खुलके बॅटिंग’ कधी करणार...?

- राजा मानेराज्यातील एक वजनदार मंत्री म्हणून क्रांतिकारी निर्णयाचे धनी ठरलेले सुभाषबापू देशमुख जिल्ह्याच्या राजकारणात मात्र ‘अंग चोरून’ काम करताहेत. ते ‘खुलके बॅटिंग’ कधी करणार...?कोणत्याही क्षेत्रात झोकून देऊन काम करणे आणि अंग चोरून काम करणे हे दोन्ही प्रकार चर्चेचे तर कधी कधी कौतुकाचे ठरत असतात. राजकारणातही ‘अंग चोरून’ काम करणे हा अनेकांच्या राजकीय चातुर्याचा भाग असतो. हे चातुर्य अनेकांना यशही मिळवून देते. काही जणांच्या बाबतीत मात्र सामर्थ्य, क्षमता आणि गुणवत्ता असूनही हा प्रकार राजकारणातील ‘गतिरोधक’ ठरतो. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जिल्ह्यांचे राजकारण अशाच गतिरोधकांच्या गर्तेत अडकल्याचे दिसून येते. क्रिकेटमध्ये ‘फिल्ड का मुआयना’ करून फटकेबाजी करणाऱ्याचे कौतुक होते. पण फक्त ‘मुआयना’ करण्यातच वेळ गेला तर क्रिकेटशौकिनांच्या रोषाचे धनी तर ठरावे लागतेच लागते, शिवाय आपला संघही पराभवाच्या छायेत लोटण्याचे पाप त्या खेळाडूच्या माथी येते. असाच काहीसा प्रकार सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात चालल्याचा अनुभव सध्या येतोय. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या भाजपची सत्ता आहे. तरीही सोलापूर जिल्हा भाजपमय झाला किंवा भाजपचे संघटन गावपातळीवर पोहोचले असे म्हणणे धाडसाचे ठरावे अशीच परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यारोहण झाल्या दिवसापासून राज्यमंत्री असलेले विजयकुमार देशमुख हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना जिल्हा प्रेमाने ‘मालक’ म्हणतो. त्यांचा गोड सुस्वभाव आणि कार्यपद्धतीचा सोलापूरकरांना चांगला परिचय असल्याने पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवण्याचे धाडसही कुणी केले नाही. त्यानंतर एक वर्षापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सुभाषबापू देशमुख थेट कॅबिनेट मंत्री म्हणून सहभागी झाले. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगसारखी मजबूत खाती त्यांना मिळाली. त्या खात्यांवर त्यांनी आपली मजबूत मांडही बसविली. राज्यातल्या वजनदार मंत्र्यांपैकी एक, असा त्यांचा कौतुकाने उल्लेखही होऊ लागला. तळमळ, धडाडी आणि नवे घडविण्याची महत्त्वाकांक्षा या सद्गुणांच्या बळावर त्यांनी आपल्याकडे असलेल्या खात्यांवर आपल्या कर्तृत्वाची मोहोरही उठविली. ज्याचा सात-बारा तो सोसायटीचा सदस्य यासारख्या क्रांतिकारी निर्णयाबरोबरच बाजार समिती, जिल्हा बँका यांच्या कारभार व निवडणूक प्रक्रियेत पारदर्शीपणा आणण्याचे खंबीर धोरणही त्यांनी अंगीकारले. उपसा सिंचन योजना असो वा सहकारी रुग्णालय असो त्यांच्याबाबतीत नवा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी राज्यापुढे ठेवला. आठवडी बाजाराची संस्कृती सुदृढ करताना राज्यातील बाजार समित्या डिजिटल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पीक तारण कर्ज योजनेपासून ते मुक्त कृषी व्यापारांपर्यंतची त्यांची भूमिका शाबासकीस पात्र ठरली. या पार्श्वभूमीवर मंत्री म्हणून बेफाम बॅटिंग करणारे सुभाषबापू देशमुख हे ‘अंग चोरून’ काम कसे करतात? असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो.मंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात चौफेर टोलेबाजी करणारे सुभाषबापू सोलापूर जिल्ह्यात मात्र अंग चोरूनच काम करताहेत, असे म्हणायला खूप मोठा वाव आहे. सोलापूर महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. सोलापूर जिल्हा परिषद ‘तोंडी’ भाजपच्या ताब्यात आहे. जिल्ह्याला एक खासदार, दोन मंत्री आणि विधान परिषदेतील एक सहयोगी आमदार लाभलेला आहे. तरीही शहर आणि जिल्हा भाजपमय झाला आहे का? या प्रश्नाचे उत्तर सोलापूर जिल्ह्याला आणि संघ परिवारालाही सापडत नाही. महापालिकेत सत्ता असूनही कोणाचाच मेळ कोणाला नाही. तो मेळ घालण्याचा प्रयत्न देशमुख ‘मालक’ही करीत नाहीत आणि सुभाषबापूही करीत नाहीत. उलट दोन्ही देशमुखांच्या पक्षातल्या ‘गढ्या’ अधिक मजबूत होताना दिसताहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत सर्वांनी संपूर्ण शक्ती लावल्याचे चित्र निर्माण झाले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे हे मात्र आजही अपक्ष आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही दोन्ही देशमुख काढू शकलेले नाहीत. म्हणूनच आता सुभाषबापूंसारख्या नेत्यांना ‘बापू, अंग चोरून काम करणे कधी सोडणार?’ असा सवाल करीत आता जिल्ह्याच्या राजकारणात ‘खुलके बॅटिंग’ करा, असेच म्हणावे लागेल.