शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

बँका का अनभिज्ञ?

By admin | Updated: April 9, 2016 01:20 IST

देशातील सतरा धनको बँकांचे तब्बल नऊ हजार कोटींचे कर्ज डोक्यावर घेऊन किंगफिशर एअरलाईन्सचे मालक आणि एके काळचे देशातील मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी सर्वांना अंधारात

देशातील सतरा धनको बँकांचे तब्बल नऊ हजार कोटींचे कर्ज डोक्यावर घेऊन किंगफिशर एअरलाईन्सचे मालक आणि एके काळचे देशातील मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी सर्वांना अंधारात (?) ठेवून इंग्लंडच्या दिशेने उड्डाण केल्यावर स्वाभाविकच माध्यमांनी रण माजविले तेव्हां आपल्या घमेंडखोर स्वभावास अनुसरुन त्यांनी दूरस्थ पद्धतीने माध्यमांवरच दुगाण्या झाडल्या व आपल्या मालमत्तेचा तपशील मागणारी माध्यमे कोण असा सवालही उपस्थित केला. विविध बँकांनी आपल्याला कर्ज वितरण केले तेव्हां त्यांच्याकडे हा सारा तपशील उपलब्धच आहे असेही ते म्हणाले. पण तसे असताना आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे त्यांच्या साऱ्या स्थावर मालमत्तेचा तपशील मागावा व त्यासाठी मुदतदेखील द्यावे, हे एक कोडेच आहे. मल्ल्यांनी माध्यमाना उद्दामपणे जे सांगितले ते किमान बँकांची कर्ज वितरण प्रणाली पाहू जाता खोटे नव्हते. कारण सर्वसामान्य माणूस जेव्हां कोणत्याही कर्जवाटप संस्थेकडे जातो तेव्हां अशा संस्था त्याच्याकडून सिक्युरिटी आणि कोलॅटरल सिक्युरिटी अशा दोन्हींची पूर्तता करुन घेऊन मगच कर्ज मंजूर करीत असतात. परिणामी कर्जाच्या रकमेपेक्षा या दोहोंची एकत्रित रक्कम काही पटींनी अधिकच असते. तोच न्याय संबंधित सतरा बँकांनी लावला असणार असे मल्ल्या यांच्या विधानावरुन वाटते. पण प्रत्यक्षात ते तसे नसावे असे आता सर्वोच्च न्यायालयाच्या फर्मानावरुन दिसते. न्यायालयाने केवळ एकट्या मल्ल्यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांच्या नावावरील मालमत्तेचाही तपशील त्यांना सादर करावयास सांगितले आहे. आपल्या डोक्यावर नऊ हजार कोटींचे कर्ज मोठेपणाने मिरवणाऱ्या मल्ल्यांनी तडजोड म्हणून चार हजार कोटी घ्या आणि प्रकरण एकदाचे मिटवून टाका, असा अत्यंत ‘उदार’ देकार मध्यंतरी दिला होता. त्यावर सतरा बँकांच्या बँकवृंदाचे नेतृत्व करणाऱ्या स्टेट बँकेने सकारात्मक विचारदेखील सुरु केला होता. परंतु देशभरातील माध्यमांनी त्यावर टिकेची झोड उठवली आणि त्यानंतर मल्ल्या यांनी आणखी दोन हजार कोटी व नंतर पुन्हा पाचशे कोटी वाढवून एकूण साडेसहा हजार कोटीत सौदा पटवा असा नवा देकार दिला. पण बँकवृंदाने आता मल्ल्यांचे सारेच देकार फेटाळून लावले आहेत. मल्ल्या यांना संबंधित बँकांशी खरोखरीच तडजोड करायची असेल तर त्यासाठी आधी त्यांनी आपली सचोटी आणि प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पुरेशा रकमेची ठेव जमा करावी आणि तडजोड करण्यासाठी जातीने हजर राहावे असे बँकवृंदाच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयास सुचविले आहे. तसे कितपत होईल याबाबत शंकाच आहे. त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन मल्ल्यांनी त्यांच्या साऱ्या मालमत्तेचा तपशील सादर केला आणि या मालमत्तेचा लिलाव करुन बँकांना त्यांचे कर्ज वसूल करण्याची मुभा न्यायालयाने दिली तरी मुंबईतील मल्ल्यांच्या एका मालमत्तेच्या लिलावाबाबतचा अगदी ताजा अनुभव निराश करणाराच आहे. परिणामी वसुलीसाठी जरा वेगळा आणि अधिक कठोर उपाय योजणे यास तूर्त तरी काही पर्याय दिसत नाही.