शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

बँका का अनभिज्ञ?

By admin | Updated: April 9, 2016 01:20 IST

देशातील सतरा धनको बँकांचे तब्बल नऊ हजार कोटींचे कर्ज डोक्यावर घेऊन किंगफिशर एअरलाईन्सचे मालक आणि एके काळचे देशातील मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी सर्वांना अंधारात

देशातील सतरा धनको बँकांचे तब्बल नऊ हजार कोटींचे कर्ज डोक्यावर घेऊन किंगफिशर एअरलाईन्सचे मालक आणि एके काळचे देशातील मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी सर्वांना अंधारात (?) ठेवून इंग्लंडच्या दिशेने उड्डाण केल्यावर स्वाभाविकच माध्यमांनी रण माजविले तेव्हां आपल्या घमेंडखोर स्वभावास अनुसरुन त्यांनी दूरस्थ पद्धतीने माध्यमांवरच दुगाण्या झाडल्या व आपल्या मालमत्तेचा तपशील मागणारी माध्यमे कोण असा सवालही उपस्थित केला. विविध बँकांनी आपल्याला कर्ज वितरण केले तेव्हां त्यांच्याकडे हा सारा तपशील उपलब्धच आहे असेही ते म्हणाले. पण तसे असताना आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे त्यांच्या साऱ्या स्थावर मालमत्तेचा तपशील मागावा व त्यासाठी मुदतदेखील द्यावे, हे एक कोडेच आहे. मल्ल्यांनी माध्यमाना उद्दामपणे जे सांगितले ते किमान बँकांची कर्ज वितरण प्रणाली पाहू जाता खोटे नव्हते. कारण सर्वसामान्य माणूस जेव्हां कोणत्याही कर्जवाटप संस्थेकडे जातो तेव्हां अशा संस्था त्याच्याकडून सिक्युरिटी आणि कोलॅटरल सिक्युरिटी अशा दोन्हींची पूर्तता करुन घेऊन मगच कर्ज मंजूर करीत असतात. परिणामी कर्जाच्या रकमेपेक्षा या दोहोंची एकत्रित रक्कम काही पटींनी अधिकच असते. तोच न्याय संबंधित सतरा बँकांनी लावला असणार असे मल्ल्या यांच्या विधानावरुन वाटते. पण प्रत्यक्षात ते तसे नसावे असे आता सर्वोच्च न्यायालयाच्या फर्मानावरुन दिसते. न्यायालयाने केवळ एकट्या मल्ल्यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांच्या नावावरील मालमत्तेचाही तपशील त्यांना सादर करावयास सांगितले आहे. आपल्या डोक्यावर नऊ हजार कोटींचे कर्ज मोठेपणाने मिरवणाऱ्या मल्ल्यांनी तडजोड म्हणून चार हजार कोटी घ्या आणि प्रकरण एकदाचे मिटवून टाका, असा अत्यंत ‘उदार’ देकार मध्यंतरी दिला होता. त्यावर सतरा बँकांच्या बँकवृंदाचे नेतृत्व करणाऱ्या स्टेट बँकेने सकारात्मक विचारदेखील सुरु केला होता. परंतु देशभरातील माध्यमांनी त्यावर टिकेची झोड उठवली आणि त्यानंतर मल्ल्या यांनी आणखी दोन हजार कोटी व नंतर पुन्हा पाचशे कोटी वाढवून एकूण साडेसहा हजार कोटीत सौदा पटवा असा नवा देकार दिला. पण बँकवृंदाने आता मल्ल्यांचे सारेच देकार फेटाळून लावले आहेत. मल्ल्या यांना संबंधित बँकांशी खरोखरीच तडजोड करायची असेल तर त्यासाठी आधी त्यांनी आपली सचोटी आणि प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पुरेशा रकमेची ठेव जमा करावी आणि तडजोड करण्यासाठी जातीने हजर राहावे असे बँकवृंदाच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयास सुचविले आहे. तसे कितपत होईल याबाबत शंकाच आहे. त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन मल्ल्यांनी त्यांच्या साऱ्या मालमत्तेचा तपशील सादर केला आणि या मालमत्तेचा लिलाव करुन बँकांना त्यांचे कर्ज वसूल करण्याची मुभा न्यायालयाने दिली तरी मुंबईतील मल्ल्यांच्या एका मालमत्तेच्या लिलावाबाबतचा अगदी ताजा अनुभव निराश करणाराच आहे. परिणामी वसुलीसाठी जरा वेगळा आणि अधिक कठोर उपाय योजणे यास तूर्त तरी काही पर्याय दिसत नाही.