शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बँकांची कोंडी फुटली

By admin | Updated: June 23, 2017 00:04 IST

नोटाबंदीनंतर सहकारी आणि जिल्हा बँकांतील जुन्या नोटा घेण्यास रिझर्व्ह बँकेने घातलेली बंदी केंद्र सरकारने उठवली, हे चांगलेच झाले

नोटाबंदीनंतर सहकारी आणि जिल्हा बँकांतील जुन्या नोटा घेण्यास रिझर्व्ह बँकेने घातलेली बंदी केंद्र सरकारने उठवली, हे चांगलेच झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी व जिल्हा बँकांत पडून राहिलेल्या सुमारे २८०० कोटींच्या चलनातून बाद झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेत जातील आणि तितके नवे चलन मिळाल्यामुळे या सर्व बँकांचे व्यवहार नीट सुरू होतील. शेतीचा हंगाम सुरू होत असताना आणि बँकांनी शेतकऱ्यांना १० हजार रुपये द्यावेत, अशा सूचना दिल्या असताना, त्याची अंमलबजावणी कशी करावी, हा जिल्हा बँकांपुढे प्रश्नच होता. त्यामुळे त्यांनी आम्ही सरकारी आदेशाचे पालन करूच शकत नाही, अशी भूमिका या जिल्हा बँकांनी घेतली. केंद्र सरकारच्या नव्या आदेशामुळे आता हा प्रश्न सुटल्यात जमा आहे. मात्र इतके महिने या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने का स्वीकारल्या नाहीत? त्या न स्वीकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने का घेतला होता? याचा उलगडा अद्यापही झालेला नाही. नोटाबंदीनंतर लगेचच मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमा झाला आणि तो पैसा अनेक राजकारण्यांचा होता, असे तेव्हा सांगण्यात येत होते. तो कुणाचा आहे, हे ना तेव्हा स्पष्ट झाले, ना आता उघड झाले आहे. किमान जुन्या व बाद नोटा स्वीकारताना तो पैसा कुणाचा आहे, हे तरी कळायला हवे होते. पण केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने तसे कोणतेही बंधन या बँकांवर घातलेले नाही. केवळ ३० दिवसांत जुन्या नोटा जमा करा, असेच या बँकांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे राजकारण्यांकडील काळा पैसा या बँकांत खरोखर गेला की नुसतीच आवई उठवण्यात आली, हेही त्यामुळे स्पष्ट होण्याची चिन्हे नाहीत. अनेक सहकारी व जिल्हा बँका राजकारण्यांच्या हातात आहेत, यात वादच नाही. त्यामुळे काळ्या पैशाचा आरोप खरा असेल, तर त्याची शहानिशा होऊ न सत्य जनतेसमोर यायलाच हवे. पण त्याची गरज आता केंद्र सरकारला वाटत नसावी. या आरोपांमुळे बँकांची तब्बल सात महिने कोंडी करण्यात आली. अनेक शिष्टमंडळे पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना भेटली. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. अगदी महाराष्ट्र सरकारनेही बंदी उठवा, अशी विनंती केंद्राकडे केली होती. मात्र तेव्हा टाळाटाळ करणाऱ्या केंद्राने अचानक हा निर्णय घेतला, याचे कारण शेतकरी आंदोलने हेच असावे, असे दिसते. शेतीच्या हंगामात राज्य सरकारच्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळावेत, पतपुरवठा सुरळीत व्हावा, असा याचा हेतू दिसतो. तो चांगलाच आहे. मात्र कोट्यवधी रुपये पडून असलेल्या बँकांची इतका काळ कोंडी करून ठेवणे आणि पतपुरवठा जवळपास थांबणे, हे कृषी व आर्थिक विकासाच्या दृष्टीने अयोग्यच म्हणावे लागेल.