शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या खासगीकरणाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2016 06:47 IST

कृषी, उद्योग, सेवा आणि संरचना यांच्या विकासाला राष्ट्रीयीकरणापासून हातभार लावणाऱ्या देशातील २९ राष्ट्रीयीकृत बँकांचे पुन्हा खासगीकरण करण्याच्या तयारीला मोदींचे सरकार लागले आहे

कृषी, उद्योग, सेवा आणि संरचना यांच्या विकासाला राष्ट्रीयीकरणापासून हातभार लावणाऱ्या देशातील २९ राष्ट्रीयीकृत बँकांचे पुन्हा खासगीकरण करण्याच्या तयारीला मोदींचे सरकार लागले आहे. या बँकांच्या आजच्या दुरवस्थेला आजवरच्या दिल्ली सरकारांचाच सर्वाधिक हातभार व उपद्रव कारणीभूत झाला आहे. केंद्राच्या सूचनेनुसार कर्जे देणे वा ती माफ करणे आणि तसे करताना बँकांच्या प्रस्थापित नियमांकडे दुर्लक्ष करणे या गोष्टी या बँकांच्या संचालकांनीच केल्या असल्या तरी त्यांच्या तशा करण्याला सरकारचा हस्तक्षेप कारणीभूत ठरला आहे. या बँकांनी देशातील बड्या उद्योगपतींनी बुडविलेले १.४ लक्ष कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा जो देशघातकी निर्णय घेतला त्याचे कारणही सरकारचा हस्तक्षेप व बँकांची त्यापुढची शरणागती हेच आहे. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात उदारीकरणाचे जे धोरण स्वीकारले त्याच्या परिणामी या बँकांची व्यवस्था अर्धकच्ची झाली आणि आताच्या मोदी सरकारच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणाने ती कोसळण्याच्याच बेतात आली आहे. अशा स्थितीत या बँकांमधील सरकारी गुंतवणूक काढून घेऊन वा कमी करून त्या पुन्हा एकवार खासगी उद्योगपतींच्या हाती सोपविण्याचा व त्यांना पुन्हा एकवार देश लुटण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्याचा विचार केंद्रात सुरू झाला आहे. पी.जे. नायक यांच्या समितीने या बँकांबाबत दिलेल्या अहवालाच्या अंमलबजावणीचा विचार हे त्याचेच पहिले पाऊल आहे. जानेवारी २०१४ मध्ये तेव्हाच्या सरकारने नेमलेल्या या समितीने एप्रिल २०१४ मध्ये आपला अहवाल सरकारला सादर केला. मात्र त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्याने त्या सरकारला त्यावर कोणतीही कारवाई करणे जमले नाही. आताच्या सरकारने त्या अहवालाच्या आधारे आपले निर्णय घ्यायला आता सुरुवात केली आहे. या अहवालातील पहिलीच सूचना राष्ट्रीयीकृत बँकांपासून सरकारने दूर होण्याच्या दिशेने पावले टाकावी व त्यातील आपली गुंतवणूक ५० टक्क्यांहून कमी करावी ही आहे. सरकारचे या बँकांमध्ये असलेले समभाग त्याने बँकींग इन्व्हेस्टमेंट कंपनी या नव्या कंपनीकडे द्यावे आणि या कंपनीला बँकांबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार द्यावे ही त्यातील दुसरी सूचना आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक यांना या बँकांवर नियंत्रण ठेवण्याचे व त्यांना मार्गदर्शन करण्याचे आता असलेले अधिकारही या नव्या व्यवस्थेकडे देण्यात यावे. याशिवाय या बँकांचे वरिष्ठ अधिकारी व संचालक नेमण्याचे जे अधिकार सध्या सरकारला आहेत ते बँकींग बोर्डस ब्युरो या आणखी एका संस्थेकडे दिले जावे असे या अहवालाचे म्हणणे आहे. या बँकांना केंद्रीय सर्व्हेक्षण विभाग आणि सीबीआयच्या कक्षेतूनही मुक्त करण्याची एक सूचना त्यात आहे. बँकांनी नफ्यासाठी गुंतवणूक करणे, कॅम्पस मुलाखतीद्वारे नियुक्त्या करणे आणि बँक कर्मचाऱ्याची आताची वेतनव्यवस्था ‘दुरुस्त’ करून ती बँकांना मिळणाऱ्या नफ्याशी जुळती करणे याही गोष्टी त्यात आहेत. सरकारचे जे अधिकार या नव्या संघटनांकडे जातील त्यावरील माणसे सरकारनियुक्त (म्हणजे सत्तारुढ पक्षाला अनुकूल असणारीच) असतील ही सूचनाही त्यात आहे. या सगळ््या सूचनांचा एकत्र विचार केला की ही बँकांच्या खाजगीकरणाची वाटचाल आहे हे स्पष्ट होते. पुण्यात अलीकडेच झालेल्या ‘ज्ञानसंगम’ नावाच्या उद्योगपतींच्या एका बैठकीत नरेंद्र मोदींनी जे भाषण केले ते या सूचनांची अंमलबजावणी करण्याची सरकारची तयारी दर्शविणारे होते हे येथे लक्षात घ्यायचे. सरकारच्या या वाटचालीची कल्पना आलेल्या अ.भा. बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेने बँकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह देशभरातील सर्व खातेदारांनाही या खासगीकरणातील धोके व लुबाडणूक याबाबत जागे होण्याचे आवाहन केले आहे. देशातील व जगातील भांडवली वर्गाला खूष करण्यासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना अडचणीत आणण्यासाठी, देशाची विकसनशीलता थांबविण्यासाठी आणि समाजातील गरीब, शेतकरी व कामगार यासारख्या वर्गांना बँकांच्या सहाय्यावाचून वंचित करण्यासाठी सरकार उचलत असलेले हे भांडवली पाऊल आहे, असे या संघटनेचे म्हणणे आहे. इंदिरा गांधींनी या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यापूर्वी त्या सामान्य माणसांशी अशाच वागल्या आहेत. पुन्हा तेच खासगीकरण सरकार आणत असेल तर ते नक्कीच कोणाच्यातरी फायद्याचे असणार आहे. हा फायदेशीरांचा वर्ग अदानी-अंबानी यासारख्या सरकारप्रेमी भांडवलदारांचा असेल हेही उघड आहे. मोदींचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून त्याची या वर्गाशी असलेली मैत्री साऱ्यांच्या लक्षात आली आहे. या प्रयत्नाला समाजातील गरीब व श्रमिकांचा वर्ग विरोध करील हे उघड आहे. मात्र तशा साऱ्यांवर ते ‘देशविरोधी’ असल्याचा शिक्का उमटवण्याच्या राजकारणात आताचे सरकार व त्याचा पक्ष कधीचेच तरबेज झाले आहेत.