शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

बाळासाहेब तिरपुडे वादळी व्यक्तिमत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 20:40 IST

पक्ष हितासाठी सतत अन्याय सहन करून त्याग करणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणारे जनहितासाठी सातत्याने लढणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, स्पष्ट व निर्भिड बोलणारे वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. बाळासाहेब तिरपुडे होत

ठळक मुद्देनाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी वर्षनिमित्त

अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला. आयुष्यभर अनेक कष्ट सहन केले. पक्ष हितासाठी सतत अन्याय सहन करून त्याग करणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणारे जनहितासाठी सातत्याने लढणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, स्पष्ट व निर्भिड बोलणारे वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. बाळासाहेब तिरपुडे होत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही अतिशयोक्ती नव्हे तर वस्तुस्थिती आहे.राजकीय जीवनात प्रामाणिक, स्पष्ट व निर्भिडपणे बोलणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची आजच्या तथाकथित पुढाऱ्यांना जरी गरज वाटत नसली तरी त्या तथाकथित विचारांचा बुरुज चांगलाच ढासळून उकीरडा होण्यास सुरुवात झालेली आहे. पुढाऱ्यांनी परिधान केलेल्या ढोंगी विचाराचे बुरखे जनतेस कळून चुकले आहेत. म्हणूनच सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. पुढाऱ्यास कार्यकर्त्यांची गरज असते हे जरी सत्य असले तरी आजच्या घटकेला कार्यकर्त्यांस खऱ्या नेतृत्वाची गरज निर्माण झालेली आहे. राजकीय परिस्थितीने जबरदस्त कलाटणी घेतल्याने निर्भिड व स्पष्ट व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाच्या शोधात सामान्य कार्यकर्ते आहेत आणि आज ती वेळ येवून ठेपलेली असून बरबटलेल्या राजकीय जीवनातून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता बाळासाहेब तिरपुडे यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण भासत आहे.पक्ष संघटना बांधण्यासाठी सामान्य कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असल्याने कधीही सामान्य कार्यकर्त्यास बाजूला सारण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केलेला नाही. आजचे पुढारी स्वत:साठी स्वत:चे अपत्य व नातेवाईकांना पक्षाची तिकिटे मिळवून देण्यासाठी मश्गुल आहेत. ज्याला त्याला स्वत:च्या स्वार्थाचे वेध लागलेले आहे. ज्यांची मानसिकताच संपली आहे, त्यांच्याकडून जनकल्याणाच्या बाबींची अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल. अशा नेत्यांकडून शिक्षणातील अधोगती, विकास, अन्याय, अत्याचार रोखणे यासंदर्भात अपेक्षा न केलेलीच बरी. या उलट बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा डोंगर अफाट पसरलेला असताना कोणत्याही जातीधर्माचा विचार न करता सामान्यजनांसाठी आवश्यक ते प्रयत्न करणारे व सामान्य कार्यकर्त्यास सत्तेत बसवून त्याचा योग्य सन्मान केल्याचे बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यामुळेच राजकारणातील अहितकाऱ्यांनी महाराष्ट्रातील अनेक धुरंधर नेत्याचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु बाळासाहेबांचे विचार मात्र ते संपवू शकले नाहीत. हेच बाळसाहेबांचे खरे पाठबळ व भांडवल आहे.भावी पिढीच्या दृष्टिकोनातून त्यांनी महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेस नावाची संघटना निर्माण करून विद्यार्थी नेतृत्वाची संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त फळी उभारण्याचे कार्य केले हे निर्विकार सत्य कोणीही टाळू शकत नाही.बाळासाहेबांच्या सम्यक मार्गदर्शनाने अनेक युवक तयार झालेले असून निरनिराळ्या संघटनांद्वारे विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत. तसेच वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या चळवळीसाठी अनेक राजकीय पक्षांचे पुढारी व कार्यकर्ते बाळासाहबांच्या कुशल नेतृत्वाताखाली एकत्र झाले होते. आजही विदर्भ राज्य निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत आहेत.महराष्ट्र शासनात बाळासाहेब तिरपुडे असतांना जनहिताच्या दृष्टीने गैर मागासवर्गीयांसाठी दूरदृष्टी ठेवून अनेक जनहिताच्या योजना राबविल्या असून सर्वधर्म समभाव साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शासकीय योजनांमध्ये जनहित साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला असून तळमळ, चिकाटी, व विद्वत्तेच्या आधारावर प्रशासकीय यंत्रणेत बाळासाहेबांना वर्चस्व निर्माण करता आले.

  • भाऊ भालेराव

८६६९३३१२३४

 

टॅग्स :nagpurनागपूर