शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब तिरपुडे वादळी व्यक्तिमत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 20:40 IST

पक्ष हितासाठी सतत अन्याय सहन करून त्याग करणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणारे जनहितासाठी सातत्याने लढणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, स्पष्ट व निर्भिड बोलणारे वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. बाळासाहेब तिरपुडे होत

ठळक मुद्देनाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी वर्षनिमित्त

अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला. आयुष्यभर अनेक कष्ट सहन केले. पक्ष हितासाठी सतत अन्याय सहन करून त्याग करणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणारे जनहितासाठी सातत्याने लढणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, स्पष्ट व निर्भिड बोलणारे वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. बाळासाहेब तिरपुडे होत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही अतिशयोक्ती नव्हे तर वस्तुस्थिती आहे.राजकीय जीवनात प्रामाणिक, स्पष्ट व निर्भिडपणे बोलणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची आजच्या तथाकथित पुढाऱ्यांना जरी गरज वाटत नसली तरी त्या तथाकथित विचारांचा बुरुज चांगलाच ढासळून उकीरडा होण्यास सुरुवात झालेली आहे. पुढाऱ्यांनी परिधान केलेल्या ढोंगी विचाराचे बुरखे जनतेस कळून चुकले आहेत. म्हणूनच सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. पुढाऱ्यास कार्यकर्त्यांची गरज असते हे जरी सत्य असले तरी आजच्या घटकेला कार्यकर्त्यांस खऱ्या नेतृत्वाची गरज निर्माण झालेली आहे. राजकीय परिस्थितीने जबरदस्त कलाटणी घेतल्याने निर्भिड व स्पष्ट व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाच्या शोधात सामान्य कार्यकर्ते आहेत आणि आज ती वेळ येवून ठेपलेली असून बरबटलेल्या राजकीय जीवनातून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता बाळासाहेब तिरपुडे यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण भासत आहे.पक्ष संघटना बांधण्यासाठी सामान्य कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असल्याने कधीही सामान्य कार्यकर्त्यास बाजूला सारण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केलेला नाही. आजचे पुढारी स्वत:साठी स्वत:चे अपत्य व नातेवाईकांना पक्षाची तिकिटे मिळवून देण्यासाठी मश्गुल आहेत. ज्याला त्याला स्वत:च्या स्वार्थाचे वेध लागलेले आहे. ज्यांची मानसिकताच संपली आहे, त्यांच्याकडून जनकल्याणाच्या बाबींची अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल. अशा नेत्यांकडून शिक्षणातील अधोगती, विकास, अन्याय, अत्याचार रोखणे यासंदर्भात अपेक्षा न केलेलीच बरी. या उलट बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा डोंगर अफाट पसरलेला असताना कोणत्याही जातीधर्माचा विचार न करता सामान्यजनांसाठी आवश्यक ते प्रयत्न करणारे व सामान्य कार्यकर्त्यास सत्तेत बसवून त्याचा योग्य सन्मान केल्याचे बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यामुळेच राजकारणातील अहितकाऱ्यांनी महाराष्ट्रातील अनेक धुरंधर नेत्याचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु बाळासाहेबांचे विचार मात्र ते संपवू शकले नाहीत. हेच बाळसाहेबांचे खरे पाठबळ व भांडवल आहे.भावी पिढीच्या दृष्टिकोनातून त्यांनी महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेस नावाची संघटना निर्माण करून विद्यार्थी नेतृत्वाची संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त फळी उभारण्याचे कार्य केले हे निर्विकार सत्य कोणीही टाळू शकत नाही.बाळासाहेबांच्या सम्यक मार्गदर्शनाने अनेक युवक तयार झालेले असून निरनिराळ्या संघटनांद्वारे विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत. तसेच वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या चळवळीसाठी अनेक राजकीय पक्षांचे पुढारी व कार्यकर्ते बाळासाहबांच्या कुशल नेतृत्वाताखाली एकत्र झाले होते. आजही विदर्भ राज्य निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत आहेत.महराष्ट्र शासनात बाळासाहेब तिरपुडे असतांना जनहिताच्या दृष्टीने गैर मागासवर्गीयांसाठी दूरदृष्टी ठेवून अनेक जनहिताच्या योजना राबविल्या असून सर्वधर्म समभाव साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शासकीय योजनांमध्ये जनहित साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला असून तळमळ, चिकाटी, व विद्वत्तेच्या आधारावर प्रशासकीय यंत्रणेत बाळासाहेबांना वर्चस्व निर्माण करता आले.

  • भाऊ भालेराव

८६६९३३१२३४

 

टॅग्स :nagpurनागपूर