शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

बाळासाहेब तिरपुडे वादळी व्यक्तिमत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 20:40 IST

पक्ष हितासाठी सतत अन्याय सहन करून त्याग करणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणारे जनहितासाठी सातत्याने लढणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, स्पष्ट व निर्भिड बोलणारे वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. बाळासाहेब तिरपुडे होत

ठळक मुद्देनाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी वर्षनिमित्त

अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला. आयुष्यभर अनेक कष्ट सहन केले. पक्ष हितासाठी सतत अन्याय सहन करून त्याग करणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणारे जनहितासाठी सातत्याने लढणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, स्पष्ट व निर्भिड बोलणारे वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. बाळासाहेब तिरपुडे होत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही अतिशयोक्ती नव्हे तर वस्तुस्थिती आहे.राजकीय जीवनात प्रामाणिक, स्पष्ट व निर्भिडपणे बोलणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची आजच्या तथाकथित पुढाऱ्यांना जरी गरज वाटत नसली तरी त्या तथाकथित विचारांचा बुरुज चांगलाच ढासळून उकीरडा होण्यास सुरुवात झालेली आहे. पुढाऱ्यांनी परिधान केलेल्या ढोंगी विचाराचे बुरखे जनतेस कळून चुकले आहेत. म्हणूनच सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. पुढाऱ्यास कार्यकर्त्यांची गरज असते हे जरी सत्य असले तरी आजच्या घटकेला कार्यकर्त्यांस खऱ्या नेतृत्वाची गरज निर्माण झालेली आहे. राजकीय परिस्थितीने जबरदस्त कलाटणी घेतल्याने निर्भिड व स्पष्ट व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाच्या शोधात सामान्य कार्यकर्ते आहेत आणि आज ती वेळ येवून ठेपलेली असून बरबटलेल्या राजकीय जीवनातून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता बाळासाहेब तिरपुडे यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण भासत आहे.पक्ष संघटना बांधण्यासाठी सामान्य कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असल्याने कधीही सामान्य कार्यकर्त्यास बाजूला सारण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केलेला नाही. आजचे पुढारी स्वत:साठी स्वत:चे अपत्य व नातेवाईकांना पक्षाची तिकिटे मिळवून देण्यासाठी मश्गुल आहेत. ज्याला त्याला स्वत:च्या स्वार्थाचे वेध लागलेले आहे. ज्यांची मानसिकताच संपली आहे, त्यांच्याकडून जनकल्याणाच्या बाबींची अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल. अशा नेत्यांकडून शिक्षणातील अधोगती, विकास, अन्याय, अत्याचार रोखणे यासंदर्भात अपेक्षा न केलेलीच बरी. या उलट बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा डोंगर अफाट पसरलेला असताना कोणत्याही जातीधर्माचा विचार न करता सामान्यजनांसाठी आवश्यक ते प्रयत्न करणारे व सामान्य कार्यकर्त्यास सत्तेत बसवून त्याचा योग्य सन्मान केल्याचे बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यामुळेच राजकारणातील अहितकाऱ्यांनी महाराष्ट्रातील अनेक धुरंधर नेत्याचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु बाळासाहेबांचे विचार मात्र ते संपवू शकले नाहीत. हेच बाळसाहेबांचे खरे पाठबळ व भांडवल आहे.भावी पिढीच्या दृष्टिकोनातून त्यांनी महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेस नावाची संघटना निर्माण करून विद्यार्थी नेतृत्वाची संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त फळी उभारण्याचे कार्य केले हे निर्विकार सत्य कोणीही टाळू शकत नाही.बाळासाहेबांच्या सम्यक मार्गदर्शनाने अनेक युवक तयार झालेले असून निरनिराळ्या संघटनांद्वारे विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत. तसेच वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या चळवळीसाठी अनेक राजकीय पक्षांचे पुढारी व कार्यकर्ते बाळासाहबांच्या कुशल नेतृत्वाताखाली एकत्र झाले होते. आजही विदर्भ राज्य निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत आहेत.महराष्ट्र शासनात बाळासाहेब तिरपुडे असतांना जनहिताच्या दृष्टीने गैर मागासवर्गीयांसाठी दूरदृष्टी ठेवून अनेक जनहिताच्या योजना राबविल्या असून सर्वधर्म समभाव साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शासकीय योजनांमध्ये जनहित साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला असून तळमळ, चिकाटी, व विद्वत्तेच्या आधारावर प्रशासकीय यंत्रणेत बाळासाहेबांना वर्चस्व निर्माण करता आले.

  • भाऊ भालेराव

८६६९३३१२३४

 

टॅग्स :nagpurनागपूर