शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

दोन बॅरिस्टर मुख्यमंत्र्यांना ‘भिडणारा’ विरोधी पक्षनेता!

By सुधीर लंके | Updated: October 28, 2023 08:03 IST

माजी केंद्रीय मंत्री व ‘पुलोद’ सरकारच्या काळात जनता पक्षाचे नेतृत्व करणारे पुरोगामी नेते बबनराव ढाकणे यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणी सांगणारा लेख..

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

दोन बॅरिस्टर मुख्यमंत्री व त्यांना भिडणारे आठवी पास विरोधी पक्षनेते, हा संघर्ष राज्यातील नवीन पिढीने पाहिलेला नाही; पण राज्याच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे हे ठळक उदाहरण आहे. चळवळीतून साकारलेले नेतृत्व किती कसदार असते हे यातून दिसते. हा इतिहास बबनराव ढाकणे यांच्या निधनामुळे आज राज्याला पुन्हा एकदा आठवला असेल.

अहमदनगर जिल्ह्यातील ढाकणे हे १९८१-८२ मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. या काळात अ. र. अंतुले व बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होऊन गेले. दोघेही बॅरिस्टर. त्यांच्याशी ढाकणे संसदीय आयुधे वापरून वैचारिक संघर्ष करत. ढाकणे यांचा पिंडच लढाऊ दिसतो. पाथर्डी येथे शिक्षण घेताना वसतिगृह अधीक्षक रागावले म्हणून वयाच्या चौदाव्या वर्षी ते एसटीने मुंबईला गेले. तेथून विनातिकीट दिल्लीला जात थेट पंडित नेहरूंना भेटले. ही दंतकथा वाटावी; पण हाच मुलगा मोठेपणी खासदार, मंत्री म्हणून दिल्लीत पोहोचला.

तालुक्यातील प्रश्न सुटत नाहीत म्हणून १९६८ साली विधानसभेच्या गॅलरीतून त्यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांवर पत्रके भिरकावली होती. हा विधानसभेचा मानभंग होता. त्यांनी सभागृहाची माफी मागावी, असा प्रस्ताव आला. मात्र, माफी न मागितल्याने त्यांची रवानगी आठ दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये झाली. लगोलग नाईकांनी पाथर्डीच्या समस्याही जाणून घेतल्या. १९७२ च्या दुष्काळात ढाकणे पंचायत समितीचे सभापती होते. लोकांच्या हाताला काम नव्हते. 

पुन्हा मुंबई गाठत नाईकांसमोर वस्तुस्थिती मांडली. त्यातून पाझर तलाव, नालाबंडिंग, रस्ते ही कामे सुरू होऊन सत्तर हजार लोकांना रोजगार मिळाला. इंजिनिअरची कमी होती म्हणून दहावी पास मुलांना तलाव व बंडिंगची आखणी कशी करायची हे शिकविले गेले. दुष्काळाशी लढाई करणारा हा पॅटर्न पाहण्यासाठी इंदिरा गांधी त्यावेळी पाथर्डीत आल्या होत्या. नाईकांवर विधानसभेत पत्रके भिरकावली; पण त्यांनीच प्रश्न सोडविले म्हणून त्यांचा पाथर्डीत पुतळा उभारण्याचा निर्णय ढाकणेंनी घेतला. विशेष म्हणजे, नाईकांनीच पुतळ्याचे अनावरण करावे, असा प्रस्ताव ठेवला. स्वत:च पुतळ्याचे अनावरण करणे ही नाईकांची परीक्षाच होती. म्हणून मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण अनावरणाला आले. 

ज्या विधानसभेने ढाकणेंना शिक्षा दिली त्याच सभागृहात ‘पुलोद’ सरकारच्या काळात १९७८ ला ते आमदार म्हणून पोहोचले. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. पुढे विरोधी पक्षनेता झाले. जनता पक्षाच्या स्थापनेपासून ढाकणे त्या पक्षात होते. प्रदेशाध्यक्षही झाले. वीस वर्षांचा कालखंड त्यांनी विधिमंडळात काढला. जनता पक्ष विभागल्यानंतर बीड लोकसभेची जागा जनता दलाकडे गेली. त्यावेळी १९८९ साली ते बीडमधून केशरकाकू क्षीरसागर यांच्याविरुद्ध लढले व जिंकले. चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ते कोळसा व ऊर्जा राज्यमंत्री झाले. 

मंडल आयोगाच्या मागणीसाठी त्यांनी १९८३ साली विधानसभेत राजदंड पळविला होता. १९७७ साली बेरोजगार तरुणांचा मोर्चा काढला. पुढे मंत्री झाल्यावर त्यांच्यासाठी शंभर रुपये बेकारभत्ता मंजूर करण्याचा आग्रह धरला. शेती, सिंचन, ऊसतोड कामगार, सहकार, शिक्षण, ऊर्जा असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. अपक्ष, काँग्रेस, जनता पक्ष, पुन्हा काँग्रेस व शेतकरी विचारदल असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. १९९४ साली ते दुग्धविकासमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी गुजरातच्या आनंद डेअरीच्या धर्तीवर महिलांचे सहकारी दूध संघ सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

‘लोकमत’च्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘आमची पिढी फारशी शिकली नव्हती; पण आम्ही सतत लोकांमध्ये राहून शिकलो. समाजाचाही आमच्यावर धाक होता. आता असा धाक कमी होतोय. सत्ताधारी लोकशाहीची दमकोंडी करताहेत तर विरोधक त्यांच्याशी जुळवून घेताहेत’...

 

टॅग्स :Babanrao Dhakaneबबनराव ढाकणे