शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

बा विठ्ठला, तू विक्रम केलास, देवेंद्रजी कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 02:28 IST

पंढरपुरात येणा-या वारक-यांच्या मांदियाळीने जागतिक विक्रम केला; मात्र त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी सरकार कधी पूर्ण करणार...

- राजा मानेपंढरपुरात येणा-या वारक-यांच्या मांदियाळीने जागतिक विक्रम केला; मात्र त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी सरकार कधी पूर्ण करणार...आषाढी वारी उभ्या महाराष्ट्रातील सर्वस्तरातील पंढरी भक्तांचा उत्सव. आषाढी वारीला वर्षानुवर्षे लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात, ही बाब कधीच नवी नव्हती. लाखो वारकºयांची भक्तीभावाने हजेरी ही तर आषाढी वारीची परंपराच आहे. या परंपरेची आता आठवण होण्याला मात्र एक कारण आहे. ते कारण म्हणजे ‘बा विठ्ठला, आषाढी वारीतील एका दिवशीच्या वारकºयांच्या हजेरीचा विश्वविक्रम तू नोंदलास, आता पंढरीच्या विकासाचा विक्रम महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी कधी नोंदणार?’, असा भाबडा प्रश्न समस्त वारकºयांच्या मनात उभा राहिला तर आश्चर्य वाटू नये.इंडो-ब्रिटिश कल्चरल फोरम या लंडनस्थित संस्थेने २५ जून २०१७ रोजीच्या आषाढी वारीदिवशी पंढरीत हजेरी लावून विठुरायाची भक्ती करणाºया वारकरी संख्येने जागतिक विक्रम नोंदला आहे. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी एवढ्या संख्येने दर्शन घेणाºया भाविकांचा विक्रम पंढरीच्या नावे नोंदला गेला आहे. विठुरायावर निस्सीम श्रद्धा असणारा वारकरी मंदिराच्या कळस दर्शनानेही धन्य पावतो. या विक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरी विकासाच्या आणाभाका घेणारे देवेंद्र फडणवीस हे देखील पंढरपूर विकासाचा विक्रम नोंदवतील ही अपेक्षा ठेवणे गैर आहे काय? ‘नमामि चंद्रभागा’चा डंका पिटला गेला, त्यासंदर्भात मंत्र्यांच्या लवाजम्यासह त्या विषयावर पंढरपुरात परिषदही झाली. २२ कोटी रुपयांचा आराखडा तयार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आज धूळखात पडलेल्या त्या आराखड्याची आणि घोषणेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. चंद्रभागेचे पात्र वर्षानुवर्षे दूषित राहते, पंढरपूर शहर आणि परिसरातील अगदी रस्त्यापासून ते स्वच्छतेपर्यंतचे प्रश्न दुर्लक्षितच राहतात. एकीकडे धार्मिक पर्यटनाला चालना देण्याची भाषा केली जाते आणि दुसरीकडे कुठल्याही प्रकारची कृती मात्र होत नाही. नमामि चंद्रभागा या जिव्हाळ्याच्या विषयाला न्याय मिळत नाही. खरे तर उजनी धरणातील प्रदूषित आणि विषारी पाण्याच्या प्रश्नाला वाचा फुटायला हवी. उजनी धरणातील तब्बल १५ टीएमसी एवढ्या गाळमिश्रित तथाकथित ४० हजार कोटी रुपये मूल्यांच्या वाळू संदर्भातदेखील चर्चा व्हायला हवी. कारण आषाढी वारीनिमित्ताने आपण चंद्रभागा नदीत उजनीचेच दूषित पाणी सोडत असतो. जिथून दूषित पाणी येते तिथल्या शुद्धीकरणाला न्याय द्यायचा नाही आणि नमामि चंद्रभागाची केवळ भाषा करायची हे लाखो वारकºयांना व पंढरपुरातील रहिवाशांना फसविण्याचा प्रकार आहे. वारकºयांच्या ‘निवाºयासाठी ६५ एकर’ हा तळ विकसित करण्यात आला. तो देखील अपुरा पडतो. त्यामुळे आता १०० एकराचा आणखी एक तळ सांगोला मार्गावर विकसित झाला पाहिजे. वारकºयांना दिल्या जाणाºया सोयीसुविधा आणि दर्शन रांगेत क्रांतिकारी बदल व्हायला हवेत. पंढरीच्या एकात्मिक विकास कामाला निधीच्या रूपात मुख्यमंत्र्यांनी पाठबळासह दिशा द्यावी अशी अपेक्षा आहे. पण ती फोल ठरत असल्याचा अनुभव येतो. म्हणूनच ‘बा विठ्ठला, तुझ्या वारकºयांच्या हजेरीचा विश्वविक्रम तू नोंदलास, आता पंढरी विकासाच्या कामाचा विक्रम देवेंद्रजी कधी नोंदविणार?’