शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

बा विठ्ठला, तू विक्रम केलास, देवेंद्रजी कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 02:28 IST

पंढरपुरात येणा-या वारक-यांच्या मांदियाळीने जागतिक विक्रम केला; मात्र त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी सरकार कधी पूर्ण करणार...

- राजा मानेपंढरपुरात येणा-या वारक-यांच्या मांदियाळीने जागतिक विक्रम केला; मात्र त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी सरकार कधी पूर्ण करणार...आषाढी वारी उभ्या महाराष्ट्रातील सर्वस्तरातील पंढरी भक्तांचा उत्सव. आषाढी वारीला वर्षानुवर्षे लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात, ही बाब कधीच नवी नव्हती. लाखो वारकºयांची भक्तीभावाने हजेरी ही तर आषाढी वारीची परंपराच आहे. या परंपरेची आता आठवण होण्याला मात्र एक कारण आहे. ते कारण म्हणजे ‘बा विठ्ठला, आषाढी वारीतील एका दिवशीच्या वारकºयांच्या हजेरीचा विश्वविक्रम तू नोंदलास, आता पंढरीच्या विकासाचा विक्रम महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी कधी नोंदणार?’, असा भाबडा प्रश्न समस्त वारकºयांच्या मनात उभा राहिला तर आश्चर्य वाटू नये.इंडो-ब्रिटिश कल्चरल फोरम या लंडनस्थित संस्थेने २५ जून २०१७ रोजीच्या आषाढी वारीदिवशी पंढरीत हजेरी लावून विठुरायाची भक्ती करणाºया वारकरी संख्येने जागतिक विक्रम नोंदला आहे. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी एवढ्या संख्येने दर्शन घेणाºया भाविकांचा विक्रम पंढरीच्या नावे नोंदला गेला आहे. विठुरायावर निस्सीम श्रद्धा असणारा वारकरी मंदिराच्या कळस दर्शनानेही धन्य पावतो. या विक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरी विकासाच्या आणाभाका घेणारे देवेंद्र फडणवीस हे देखील पंढरपूर विकासाचा विक्रम नोंदवतील ही अपेक्षा ठेवणे गैर आहे काय? ‘नमामि चंद्रभागा’चा डंका पिटला गेला, त्यासंदर्भात मंत्र्यांच्या लवाजम्यासह त्या विषयावर पंढरपुरात परिषदही झाली. २२ कोटी रुपयांचा आराखडा तयार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आज धूळखात पडलेल्या त्या आराखड्याची आणि घोषणेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. चंद्रभागेचे पात्र वर्षानुवर्षे दूषित राहते, पंढरपूर शहर आणि परिसरातील अगदी रस्त्यापासून ते स्वच्छतेपर्यंतचे प्रश्न दुर्लक्षितच राहतात. एकीकडे धार्मिक पर्यटनाला चालना देण्याची भाषा केली जाते आणि दुसरीकडे कुठल्याही प्रकारची कृती मात्र होत नाही. नमामि चंद्रभागा या जिव्हाळ्याच्या विषयाला न्याय मिळत नाही. खरे तर उजनी धरणातील प्रदूषित आणि विषारी पाण्याच्या प्रश्नाला वाचा फुटायला हवी. उजनी धरणातील तब्बल १५ टीएमसी एवढ्या गाळमिश्रित तथाकथित ४० हजार कोटी रुपये मूल्यांच्या वाळू संदर्भातदेखील चर्चा व्हायला हवी. कारण आषाढी वारीनिमित्ताने आपण चंद्रभागा नदीत उजनीचेच दूषित पाणी सोडत असतो. जिथून दूषित पाणी येते तिथल्या शुद्धीकरणाला न्याय द्यायचा नाही आणि नमामि चंद्रभागाची केवळ भाषा करायची हे लाखो वारकºयांना व पंढरपुरातील रहिवाशांना फसविण्याचा प्रकार आहे. वारकºयांच्या ‘निवाºयासाठी ६५ एकर’ हा तळ विकसित करण्यात आला. तो देखील अपुरा पडतो. त्यामुळे आता १०० एकराचा आणखी एक तळ सांगोला मार्गावर विकसित झाला पाहिजे. वारकºयांना दिल्या जाणाºया सोयीसुविधा आणि दर्शन रांगेत क्रांतिकारी बदल व्हायला हवेत. पंढरीच्या एकात्मिक विकास कामाला निधीच्या रूपात मुख्यमंत्र्यांनी पाठबळासह दिशा द्यावी अशी अपेक्षा आहे. पण ती फोल ठरत असल्याचा अनुभव येतो. म्हणूनच ‘बा विठ्ठला, तुझ्या वारकºयांच्या हजेरीचा विश्वविक्रम तू नोंदलास, आता पंढरी विकासाच्या कामाचा विक्रम देवेंद्रजी कधी नोंदविणार?’