शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

कॅन्सरग्रस्तांना आयुव्रेदाचा दिलासा

By admin | Updated: November 1, 2014 00:15 IST

कॅन्सरशी लढा देताना त्रसून जाणा:या कुटुंबाना दिलासा देण्याचे काम करणा:या डॉ. सदानंद सरदेशमुख आणि त्यांच्या आयुव्रेदिक उपचार संशोधनाला समर्पित केलेल्या 2क् वर्षाची ही कहाणी आहे.

कॅन्सरशी लढा देताना त्रसून जाणा:या कुटुंबाना दिलासा देण्याचे काम करणा:या डॉ. सदानंद सरदेशमुख आणि त्यांच्या आयुव्रेदिक उपचार संशोधनाला समर्पित केलेल्या 2क् वर्षाची ही कहाणी आहे. रविवारी या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अॅन्ड रिसर्च सेंटरतर्फे मुंबईत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.
सदानंद सरदेशपांडे. त्यांचे वडील प्रभाकर सरदेशमुख. लोक त्यांना आदराने महाराज म्हणायचे. आयुव्रेदात अभ्यास एवढा की नाडी पाहून तुम्ही काय खाल्लं हे ते अचूक सांगायचे.. त्यांना त्यांच्या वडिलांकडून हा वारसा मिळाला होता, तर सदानंद सरदेशमुखांना त्यांच्या वडिलांकडून.. नाडी परीक्षेचाच हा वारसा पुढे चालावा एवढीच माफक अपेक्षा प्रभाकर देशमुख यांची नव्हती, तर देशातलं कॅन्सरवरील सर्वात उत्तम संशोधन केंद्र आपल्या मुलाने उभं करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी 
त्यांचे मनही विशाल होते. स्वत: किरायाच्या घरात राहात त्यांनी स्वत:च्या मालकीची पुण्याजवळील तब्बल 63 एकर जमीन सदानंद सरदेशमुख यांना ट्रस्ट करून देऊ केली आणि 1994 मध्ये पुण्यात इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अॅन्ड रिसर्च सेंटरच्या अंतर्गत कॅन्सर संशोधन प्रकल्प सुरू झाला.
या प्रकल्पाची कथा तेवढीच रोमहर्षक. डॉक्टरांनी 1967 मध्ये पुण्यात, तर 1968 ला मुंबईत प्रॅक्टीस सुरू केली. तेव्हापासून डॉ. सरदेशमुख यांनी कॅन्सर संशोधन प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. त्या एका स्वप्नासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. एकदा बाळासाहेब भारदे एका रुग्णाला घेऊन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले. म्हणाले, काही करा, पण याला बरं करा.. आम्ही आमचे आयुव्रेदाचे उपचार सुरू केले आणि पुढेच सात वर्षे तो रुग्ण व्यवस्थित जीवन जगू शकला. भारदे म्हणाले, आता तुमचंच हॉस्पिटल सुरू करा.. आणि सरदेशमुख यांच्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. त्यासाठी त्यांच्या मदतीला धावून आले, परदेशातून भारतात परत आलेले बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडियोलॉजी विभागाचे प्रमुख 
डॉ. अरविंद कुलकर्णी. अत्यंत देखणं असं काम कोणताही गाजावाजा न करता पुण्यात चालू आहे. परदेशातून कॅन्सरने त्रस्त झालेले रुग्ण येथे येत आहेत आणि डॉ. सरदेशमुख त्यांच्यावर उपाय करत आहेत..
कॅन्सरपुरते सांगायचे, तर प्रचलित उपचार पद्धती केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीचा सर्रास वापर होतो. त्याचे शरीरावर जे विपरीत दृश्य परिणाम (साईडईफेक्ट्स) दिसतात, त्याला रोगी अगतिकपणो सामोरे जातात. हे जणू अटळ असल्याच्या भावनेने सहन करीत राहतात. प जवळपास 75क्क् हजार कॅन्सर पेशन्ट्सना आयुर्वेद या बाबतीत देऊ करत असलेल्या साहय़भूत भूमिकेचा चांगला अनुभव आलेला आहे. प्रचलित उपचारातून उद्भवणारे साइड इफेक्ट्स कमी करणो आणि त्याच्या वेदना सुसहय़ वाटण्याजोगी प्रतिकारक्षमता वाढविणो हे दोन्ही हेतू आयुर्वेद पूर्ण करू शकतो. डोक्यावरचे केस जाणो, वजनात अमाप घट होणो, अशा परिणामांवर उपाय म्हणून आयुर्वेद साहय़भूत भूमिका बजावतो. म्हणजेच एकाचवेळी दोन उपचार पद्धतींचा सुयोग्य मिलाफ रुग्णांसाठी वरदान ठरतो हे स्वत:च्या प्रयोगातून आणि गेल्या काही वर्षाच्या सातत्यपूर्ण मेहनतीतून डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी सिद्ध करून दाखवले आहे. 
अॅलोपॅथीने आयुव्रेदाकडे कसे पाहावे, हा आजचा विषय नाही; मात्र आयुव्रेदाने अॅलोपॅथीची साथ घेत कॅन्सरच्या हजारो रुग्णांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. अत्यंत साधेपणाने, कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता, पुण्याजवळ वाघोलीत इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अॅन्ड रिसर्च सेंटर सुरू आहे. त्याशिवाय मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक व दिल्ली येथेदेखील ओपीडी सुरू करून डॉ. सरदेशमुख आणि डॉ. वासंती गोडसे, डॉ. श्रीनिवास दातार आणि संपूर्ण टीमने आयुव्रेदाला सर्वदूर नेण्याचे काम केले आहे. 
त्यांचे हे काम पाहून केमोथेरेपी, रेडिओथेरिपी, शस्त्रकर्म या आधुनिक चिकित्सापद्धती वाजवी दरात मिळाव्यात म्हणून अद्ययावत कोबाल्ट रेडिएशन सेंटर सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या अॅटोमिक एनर्जी विभागाने मोठे अर्थसाह्य उपलब्ध करून दिले आहे. डॉ. अनिल काकोडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, हे 
विशेष. शिवाय, उद्योगपती रतन टाटा यांनी कॅन्सर रुग्णांसाठी पंचकर्म हॉस्पिटलच्या इमारतीकरिता अर्थसाह्यच दिले नाही, तर स्वत: वाघोलीला भेटही 
दिली. अजूनही रतन टाटा या प्रकल्पाला अधूनमधून भेट देतात व कामाची पाहणी करतात. वीस वर्षापूर्वी वाघोलीत सुरू झालेल्या कॅन्सर संशोधन प्रकल्पात 
आज 16क् बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, येथे रुग्णांना मिळणारी बहुतांशी औषधे संस्थेच्या अथर्व नेचर हेल्थकेअरमध्ये तयार केली जाऊ लागली. त्यासाठी संजीवनी वनौषधी उद्यान विकसित केले गेले. संस्थेतर्फे कॅन्सर आयुव्रेदविषयक चार जागतिक परिषदांचे आयोजन व कॅन्सर संशोधन प्रकल्पातील संशोधनावर आधारित शास्त्रीय शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. 
कॅन्सरमुळे जगण्याची उमेद हरवलेल्या मनाला उभारी देण्याचे काम करताना नुकताच आलेला अनुभव डॉक्टर सरदेशमुख यांनी उत्साहाने सांगितला. ते म्हणाले, जर्मनीच्या एका हॉस्पिटलने एका रुग्णाच्या रिपोर्टमध्ये ‘भारतात जाऊन सतत आयुव्रेदिक उपचार घेतल्याने 
अमूक अमूक रुग्णाचा त्वचेचा कॅन्सर बरा झाला’ असा उल्लेख केला आहे. आजवर आम्ही केलेल्या कामाची यापेक्षा मोठी पावती आणखी कोणती असेल, असेही डॉक्टर शांतपणो सांगतात तेव्हा त्यांच्या साधेपणाची प्रचिती येते..
 
अतुल कुलकर्णी
वरिष्ठ सहायक संपादक
लोकमत, मुंबई