शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

वनांवरील अतिक्रमण टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:58 IST

अलीकडेच मुलुंड येथे बिबट्याच्या हल्ल्यात सातहून अधिक मुंबईकर जखमी झाले असतानाच मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या ४१ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अलीकडेच मुलुंड येथे बिबट्याच्या हल्ल्यात सातहून अधिक मुंबईकर जखमी झाले असतानाच मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या ४१ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. बिबट्यांचा आकडा वाढणे हे उत्तम दर्जाच्या जंगलाचे लक्षण आहे. मात्र आता बिबटे मानववस्तीत शिरणार नाहीत, याची खबरदारी अधिक प्रकर्षाने घ्यावी लागणार आहे. २०१५मध्ये कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात ३५ बिबटे आढळले होते. आता ताज्या सर्वेक्षणात ही संख्या ४१ एवढी झाली आहे. आरे मिल्क कॉलनी, आयआयटी-पवई, घोडबंदर गाव, नागला ब्लॉक या परिसरात ही मोजणी झाली. जवळपास १४० किलोमीटर क्षेत्रात हा अभ्यास करण्यात आला. २०१५मधील डेटाबेसच्या तुलनेत २०१७ साली बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसते. त्यामुळे आता हल्ले वाढणार नाहीत, यासाठी प्रशासनाने काळजी आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे. उद्यानाच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करणे हे मोठे आव्हान आहे. तर लोकांमध्ये जागृती करणे हे दुसरे आव्हान. मुळात बिबट्या मनुष्यवस्तीत शिरतो, असे म्हणणे चुकीचे आहे. उद्यानालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे बिबट्याने आपल्या घरात नाही; तर आपण त्याच्या घरात शिरकाव केला आहे. दुसरे असे की बिबट्या कधीच माणसावर हल्ला करीत नाही. बिबट्या हल्ला करतो तो त्याच्या समांतर उंची असलेल्या भक्षावर. यासाठी उद्यानालगत उघड्यावर शौचास बसणे बंद करावे लागेल. म्हणजेच सरकारला पुरेशी शौचालये बांधावी लागतील. आरे कॉलनीत शौचालयांचा अभाव आहे. एकंदर महापालिका आणि उद्यान प्रशासनाला यासाठी एकत्र काम करावे लागेल. बिबट्याला जेरबंद करण्याची वेळ आल्यास पुरेसे साहित्य वनविभागाकडे नाही. एक किंवा दोन पिंजरे असले म्हणजे झाले, ही भूमिका बदलावी लागेल. हल्ले होण्याचे प्रमाण अधिक आहे; तेथे कायमस्वरूपी पिंजरे लावण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत हल्ले कमी झाल्याचा दावा उद्यान प्रशासनाने केला आहे. बिबटे मानवी वस्तीत शिकारीसाठी शिरतात हे सत्य आहे. जंगलेच राहिली नाही, तर त्यांनी जावे कुठे? अशाच प्रकारे मोर, हरणेदेखील मानवी वस्तीत पाण्यासाठी येतात. वाढत्या लोकवस्तीमुळे वन क्षेत्रावर होणारे अतिक्रमण हे मानव आणि प्राणी संघर्षाचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निसर्गाचा बदलणारा असमतोल सावरायचा झाल्यास त्यात वन्य प्राण्यांची भूमिका मोठी आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना जपण्याचे काम मनुष्याला अग्र्रक्रमाने करावे लागणार आहे. यात साथ लागेल ती सगळ्यांचीच!