शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

वनांवरील अतिक्रमण टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:58 IST

अलीकडेच मुलुंड येथे बिबट्याच्या हल्ल्यात सातहून अधिक मुंबईकर जखमी झाले असतानाच मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या ४१ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अलीकडेच मुलुंड येथे बिबट्याच्या हल्ल्यात सातहून अधिक मुंबईकर जखमी झाले असतानाच मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या ४१ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. बिबट्यांचा आकडा वाढणे हे उत्तम दर्जाच्या जंगलाचे लक्षण आहे. मात्र आता बिबटे मानववस्तीत शिरणार नाहीत, याची खबरदारी अधिक प्रकर्षाने घ्यावी लागणार आहे. २०१५मध्ये कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात ३५ बिबटे आढळले होते. आता ताज्या सर्वेक्षणात ही संख्या ४१ एवढी झाली आहे. आरे मिल्क कॉलनी, आयआयटी-पवई, घोडबंदर गाव, नागला ब्लॉक या परिसरात ही मोजणी झाली. जवळपास १४० किलोमीटर क्षेत्रात हा अभ्यास करण्यात आला. २०१५मधील डेटाबेसच्या तुलनेत २०१७ साली बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसते. त्यामुळे आता हल्ले वाढणार नाहीत, यासाठी प्रशासनाने काळजी आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे. उद्यानाच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करणे हे मोठे आव्हान आहे. तर लोकांमध्ये जागृती करणे हे दुसरे आव्हान. मुळात बिबट्या मनुष्यवस्तीत शिरतो, असे म्हणणे चुकीचे आहे. उद्यानालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे बिबट्याने आपल्या घरात नाही; तर आपण त्याच्या घरात शिरकाव केला आहे. दुसरे असे की बिबट्या कधीच माणसावर हल्ला करीत नाही. बिबट्या हल्ला करतो तो त्याच्या समांतर उंची असलेल्या भक्षावर. यासाठी उद्यानालगत उघड्यावर शौचास बसणे बंद करावे लागेल. म्हणजेच सरकारला पुरेशी शौचालये बांधावी लागतील. आरे कॉलनीत शौचालयांचा अभाव आहे. एकंदर महापालिका आणि उद्यान प्रशासनाला यासाठी एकत्र काम करावे लागेल. बिबट्याला जेरबंद करण्याची वेळ आल्यास पुरेसे साहित्य वनविभागाकडे नाही. एक किंवा दोन पिंजरे असले म्हणजे झाले, ही भूमिका बदलावी लागेल. हल्ले होण्याचे प्रमाण अधिक आहे; तेथे कायमस्वरूपी पिंजरे लावण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत हल्ले कमी झाल्याचा दावा उद्यान प्रशासनाने केला आहे. बिबटे मानवी वस्तीत शिकारीसाठी शिरतात हे सत्य आहे. जंगलेच राहिली नाही, तर त्यांनी जावे कुठे? अशाच प्रकारे मोर, हरणेदेखील मानवी वस्तीत पाण्यासाठी येतात. वाढत्या लोकवस्तीमुळे वन क्षेत्रावर होणारे अतिक्रमण हे मानव आणि प्राणी संघर्षाचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निसर्गाचा बदलणारा असमतोल सावरायचा झाल्यास त्यात वन्य प्राण्यांची भूमिका मोठी आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना जपण्याचे काम मनुष्याला अग्र्रक्रमाने करावे लागणार आहे. यात साथ लागेल ती सगळ्यांचीच!