शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
4
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
6
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
7
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
8
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
9
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
10
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
11
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
12
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
13
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
14
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
15
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
16
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
17
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
18
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
19
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
20
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

कीर्तनकारांचा परिवर्तनाचा टाळ

By admin | Updated: May 21, 2016 04:44 IST

कीर्तन ऐकून कुणी सुधारला नाही व तमाशा पाहून कुणी बिघडला नाही

कीर्तन ऐकून कुणी सुधारला नाही व तमाशा पाहून कुणी बिघडला नाही, हे वाक्य महाराष्ट्राच्या समाजजीवनात वारंवार उच्चारले जाते. आपल्या अध्यात्मिक क्षेत्राने या वाक्याला खरे तर आक्षेप नोंदविणे अपेक्षित होते. पण, तसा तो नोंदविला न गेल्याने एकप्रकारे कीर्तनातून काही सुधारणा घडत नाहीत या गृहीतकाला आपण मान्यताच देऊन बसलो आहोत. पुण्यात आजपासून सुरू होत असलेल्या पाचव्या मराठी संत साहित्य संमेलनात मात्र हे गृहीतक मोडण्याच्या दृष्टीने काही पावले पडणार आहेत.नगर जिल्ह्यातील ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे हे या वर्षीच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. वारकरी हा शेतकरी आहे, हे सूत्र घेऊन हे संमेलन त्यांनी पूर्णत: दुष्काळग्रस्तांना समर्पित केले आहे. या संमेलनात होणारे सर्व परिसंवाद दुष्काळ, शेती, पाणी, शेतकरी याच विषयांशी निगडित आहेत. तनपुरे मूळचे दगडवाडीचे. त्यांचे वडील कुशाबा तनपुरे म्हणजेच ‘तनपुरे महाराज’ हे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून परिचित होते. ‘जेथे कीर्तन करावे, तेथे अन्न न सेवावे’ हा वसा त्यांनी आयुष्यभर जपला. गाडगेबाबांचे ते शिष्य. साने गुरुजींना पंढरपुरातील उपोषणात त्यांनी सहाय्य केले. व्यसनमुक्ती, पशुहत्त्याबंदी याबाबत काम करतानाच दुष्काळात माणसांसाठी भाकरी व पशुधनासाठी वैरण पाण्याची सोय करण्याची मोठी मोहीम त्यांनी आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून राबविली. नाम सप्ताहातून राष्ट्रभक्ती व स्वातंत्र्यांचे संस्कार रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ‘देवभक्ती’ व ‘राष्ट्रभक्ती’ यांची सांगड त्यांच्या कीर्तनाने घातली. कीर्तनाच्या माध्यमातून चालणारे त्यांचे काम पाहून तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ते इंदिरा गांधी यांच्यापर्यंत बहुतांश राष्ट्रीय नेते हे त्याकाळी तनपुरे महाराजांना भेटले होते. १९५३च्या दुष्काळात नगर जिल्ह्यातील माही जळगाव येथे त्यांनी सुरू केलेल्या दुष्काळी केंद्राला पंडित नेहरुंनी भेट दिली. त्यावेळी पंडित नेहरुंच्या गळ्यात त्यांनी ओल्या हरभऱ्याचा हार घातला व हातात भाकरी पिठल्याचा प्रसाद दिला. नेहरुंनीही मोठ्या आनंदाने तो सेवन केला. ‘ऐसे महात्मा और होंगे तो भारत बदलेगा’ असे नेहरू त्यावेळी म्हणाले होते. आज तर महाराष्ट्रात २५ हजार कीर्तनकारांची फौज आहे. ठरविले तर हे सर्व कीर्तनकार- प्रवचनकार महात्मा बनू शकतात. गावात लोक ग्रामसभेला जमत नाहीत. पण, कीर्तन-प्रवचनाला हजर असतात. सार्वजनिक कामासाठी लोकसहभाग लवकर जमत नाही. पण, धार्मिक सप्ताहाची वर्गणी देण्यासाठी लिलावात बोली लागते. हा सगळा पैसा व शक्ती जलसंधारणाच्या कामात एकत्र आली तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकते. हाच विचार आता बद्रीनाथ तनपुरे यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सुरू केला आहे. कीर्तनकारांनी ठरवून जलसंधारणाचा अभंग सेवेत घेतला, तर आपण दुष्काळ हटवू शकतो. त्यासाठी प्रत्येक कीर्तनकाराने एक गाव दत्तक घ्यावे, असे आवाहन ते करणार आहेत. स्वत:चे दगडवाडी गाव दत्तक घेऊन या अभियानाचा ते प्रारंभ करणार आहेत. ‘बुडता हे जन न देखवे डोळा’ ही संतांची भूमिका होती. ती भूमिका आता कीर्तनकारांनी वठवावी असे वारकरी परिषदेचेच म्हणणे आहे. तुकाराम महाराजांनी ‘मढें झाकूनिया करिती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाहे’ म्हणजे प्रसंगी घरात मढे झाकून ठेवून कुणबी पेरणी करतो, असे शेतकऱ्याच्या कर्तव्याचे धाडसी वर्णन केले. हेच शेतकरी व गावे परिवर्तनाचे टाळ हाती घेऊ शकतात. मात्र त्यासाठी कीर्तनकारांना प्रबोधनाची वीणा गळ्यात बांधावी लागेल. राज्य दुष्काळाने होरपळत आहे. अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील तीन गावांनी भजन-कीर्तनासाठी ९० लाख रुपये जमविल्याची बातमी कानावर आली. एवढा देवभोळेपणा आजच्या महाराष्ट्राला कसा परवडेल? - सुधीर लंके