शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

गंडस्थळावरच हल्ला

By admin | Updated: January 3, 2016 22:54 IST

भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंजाबातील पठाणकोटच्या हवाई अड्ड्यावर पाच अतिरेक्यांनी केलेला हल्लादेखील देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या गंडस्थळावरील हल्लाच मानला गेला पाहिजे

भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंजाबातील पठाणकोटच्या हवाई अड्ड्यावर पाच अतिरेक्यांनी केलेला हल्लादेखील देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या गंडस्थळावरील हल्लाच मानला गेला पाहिजे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास हा हल्ला चढविला गेला व त्यामागे जैश-ए-महम्मदचा हात असल्याचा भारताच्या संरक्षण दलाचा कयास आहे. हल्ला चढविणारे अतिरेकी मारले गेले असले तरी त्यात काही भारतीय अधिकारीही शहीद झाले आहेत. हल्ला होण्यापूर्वी पंजाबातून एका पोलीस अधिकाऱ्याचे ज्यांनी अपहरण केले त्यांचाच या हल्ल्यात हात असल्याचेही सांगितले गेले आहे. अपहरण झाल्यानंतर संबंधितांचा मागमूसही लागू नये आणि हल्लेखोर तीन दिवसांपासून त्या परिसरातच फिरत होते अशीही जी एक माहिती दिली गेली आहे ती तर आणखीनच गंभीर आणि संरक्षण सज्जतेमधील उणिवा अधोरेखित करणारी आहे. भारतीय जवानांनी अतिरेक्यांना ‘मुँहतोड जबाब’ दिल्याची केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रतिक्रिया जवानांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त असली तरी, असा जबाब देण्याची वेळच का यावी, हा यातील महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा केव्हा असे अतिरेकी हल्ले होतात तेव्हा दोन मुद्दे हिरीरीने मांडले जातात. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सुरळीत होण्याने ज्यांचे मनसुबे उधळले जाऊ शकतात अशा व्यक्तींचे वा संघटनांचे हे कार्य आहे आणि संबंध सुधारले जाऊ नयेत म्हणून खुद्द पाकिस्तानचे लष्करच अतिरेक्यांच्या मदतीने असे उद्योग करीत असते. यातील पहिला मुद्दा आपणच आपले सांत्वन करून घेण्याचा एक प्रयत्न असतो. दुसऱ्या मुद्द्याचा अर्थ आपण पाकिस्तानातील लोकनियुक्त सरकार व लष्कर ही दोन स्वतंत्र अस्तित्वे असल्याचे मान्य करतो. अशा वेळी ‘करारा किंवा मुँहतोड जबाब देंगे’ तो नेमका कोणाला, असा प्रश्न उपस्थित होतो. उभय देशांमधील चर्चेला अपशकुन करण्यासाठी त्या देशातील विघातक शक्ती जाणीवपूर्वक असे घातपाती उद्योग करीत असतात हे मान्य असल्यास ‘अतिरेकी हल्ले आणि चर्चा हातात हात घालून चालू शकत नाहीत’ हे विधान निरर्थक ठरते.