शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गंडस्थळावरच हल्ला

By admin | Updated: January 3, 2016 22:54 IST

भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंजाबातील पठाणकोटच्या हवाई अड्ड्यावर पाच अतिरेक्यांनी केलेला हल्लादेखील देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या गंडस्थळावरील हल्लाच मानला गेला पाहिजे

भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंजाबातील पठाणकोटच्या हवाई अड्ड्यावर पाच अतिरेक्यांनी केलेला हल्लादेखील देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या गंडस्थळावरील हल्लाच मानला गेला पाहिजे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास हा हल्ला चढविला गेला व त्यामागे जैश-ए-महम्मदचा हात असल्याचा भारताच्या संरक्षण दलाचा कयास आहे. हल्ला चढविणारे अतिरेकी मारले गेले असले तरी त्यात काही भारतीय अधिकारीही शहीद झाले आहेत. हल्ला होण्यापूर्वी पंजाबातून एका पोलीस अधिकाऱ्याचे ज्यांनी अपहरण केले त्यांचाच या हल्ल्यात हात असल्याचेही सांगितले गेले आहे. अपहरण झाल्यानंतर संबंधितांचा मागमूसही लागू नये आणि हल्लेखोर तीन दिवसांपासून त्या परिसरातच फिरत होते अशीही जी एक माहिती दिली गेली आहे ती तर आणखीनच गंभीर आणि संरक्षण सज्जतेमधील उणिवा अधोरेखित करणारी आहे. भारतीय जवानांनी अतिरेक्यांना ‘मुँहतोड जबाब’ दिल्याची केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रतिक्रिया जवानांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त असली तरी, असा जबाब देण्याची वेळच का यावी, हा यातील महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा केव्हा असे अतिरेकी हल्ले होतात तेव्हा दोन मुद्दे हिरीरीने मांडले जातात. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सुरळीत होण्याने ज्यांचे मनसुबे उधळले जाऊ शकतात अशा व्यक्तींचे वा संघटनांचे हे कार्य आहे आणि संबंध सुधारले जाऊ नयेत म्हणून खुद्द पाकिस्तानचे लष्करच अतिरेक्यांच्या मदतीने असे उद्योग करीत असते. यातील पहिला मुद्दा आपणच आपले सांत्वन करून घेण्याचा एक प्रयत्न असतो. दुसऱ्या मुद्द्याचा अर्थ आपण पाकिस्तानातील लोकनियुक्त सरकार व लष्कर ही दोन स्वतंत्र अस्तित्वे असल्याचे मान्य करतो. अशा वेळी ‘करारा किंवा मुँहतोड जबाब देंगे’ तो नेमका कोणाला, असा प्रश्न उपस्थित होतो. उभय देशांमधील चर्चेला अपशकुन करण्यासाठी त्या देशातील विघातक शक्ती जाणीवपूर्वक असे घातपाती उद्योग करीत असतात हे मान्य असल्यास ‘अतिरेकी हल्ले आणि चर्चा हातात हात घालून चालू शकत नाहीत’ हे विधान निरर्थक ठरते.