शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

गोव्याचे विधानसभा अधिवेशन, अर्थसंकल्प केवळ ‘उपचार?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 19:40 IST

गोवा विधानसभेचे तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन ‘शांततेने’ पार पडले. शांततेने एवढय़ाचसाठी कारण विरोधी काँग्रेसला त्यांच्याकडे योग्य गणसंख्या असूनही सरकारला नामोहरम करता आले नाही.

- राजू नायक

गोवा विधानसभेचे तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन ‘शांततेने’ पार पडले. शांततेने एवढय़ाचसाठी कारण विरोधी काँग्रेसला त्यांच्याकडे योग्य गणसंख्या असूनही सरकारला नामोहरम करता आले नाही. काँग्रेस पक्षाने पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला खाली खेचण्यासाठी नव्याने हालचाली चालविलेल्या आहेत. परंतु काही आमदार फोडून, मगो पक्षाला बंडखोरी करण्यास प्रवृत्त करून भागणार नाही. हे सरकार कसे निष्क्रिय आहे, ते त्यांना लोकांच्या मनावर बिंबवावे लागेल. विधानसभेत त्यांचा हा प्रतिकार जाणवला नाही.

पर्रीकरांनी मांडलेला अर्थसंकल्प किंवा राज्यपालांचे अभिभाषण ही विरोधकांना सरकारचे वाभाडे काढण्यासाठी योग्य संधी होती. अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी अर्थसंकल्प हा केवळ एक उपचार असे म्हटले. ज्या पद्धतीने हा अर्थसंकल्प मांडला, ती गोवेकरांची चेष्टा होती, गोव्याच्या भवितव्यावरच सरकारने सर्जिकल स्ट्राइक केला, असे रमाकांत खलप म्हणाले. परंतु त्यांच्या पक्षाच्या सभागृहातील सदस्यांना विनियोग विधेयक मंजूर करताना सरकारला पेचात आणण्याची संधी होती, ती त्यांनी गमावली. जे सरकार पर्रीकरांच्या आजारामुळे लुळेपांगळे बनले आहे- ज्या सरकारमधील मंत्री सतत वादात असतात व एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्यात धन्यता मानतात- त्या सरकारचे वाभाडे काढण्याची संधी काँग्रेसने गमावली.

मगो पक्ष सरकारातून बाहेर पडण्यास उत्सुक आहे असे वातावरण आहे. त्यांना सरकारातील दुसरा घटक पक्ष गोवा फॉरवर्डने तसे करण्याचे जाहीर आव्हान दिले आहे. मगोपने पाठिंबा काढला तर आम्ही नवे सदस्य उभे करू असे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. मगोपच्या तीन सदस्यांपैकी दोन सदस्य यापूर्वीच भाजपाच्या संपर्कात आहेत व काँग्रेसच्या काही सदस्यांनाही सत्ताधारी बनण्याचे डोहाळे लागले आहेत. दुस-या बाजूला भाजपाचेही काही सदस्य काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

अशा राजकीय घडामोडी तेजीत असतात तेव्हा विरोधी पक्षाला सरकारला अडचणीत आणण्याचा डाव खेळावा लागतो. सरकारचे कमकुवत संख्याबळ दाखवून देण्याचीही ती संधी असते.

या अधिवेशनाची एकमेव उपलब्धी म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची उपस्थिती. पर्रीकरांनी ज्या प्रकारे- अत्यंत आजारी असताना- चालता-व्यवस्थित बोलताही येत नसताना खिंड लढविली ती लोकांच्या, पत्रकारांच्या कायम स्मरणात राहील. त्यांना बोलताना-वाचताना-चालताना दोन सुरक्षा रक्षकांनी पकडावे लागत असे. त्यांच्याबरोबर एक डॉक्टर ठेवण्यात आला होता. आवाज अस्पष्ट होता; परंतु त्यातूनही हा माणूस जिद्दीनेच नाही तर त्यांनीच म्हटल्याप्रमाणे - जे त्यांच्यावरच्या ‘उरी’ चित्रपटातले वाक्य ‘जोश’ दाखवतो- ही गोष्ट संस्मरणीय, वैशिष्टय़पूर्ण आहे. याच पर्रीकरांनी दोन दिवसांपूर्वी नवीन आकर्षक मांडवी पुलाचे उद्घाटन केले. त्यांना पाहून लोक खुश झाले. मात्र, सरकारला ते वेग देऊन जनतेचे समाधान करू शकले असते तर लोकांचा आनंद द्विगुणीत झाला असता. त्यानंतर पर्रीकर तातडीने दिल्लीला वैद्यकीय इलाजासाठी गेले.

परंतु, केवळ ‘इच्छे’वर सरकार चालत नाही. नेतृत्व वेगवान पाहिजे, मंत्री कार्यक्षम आणि धाडसी हवेत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने एकवाक्यता दाखवायला हवी. पर्रीकर आजारी असल्यापासून गेले वर्षभर सरकार अडखळत आहे. विरोधकांनीही फारसा आशेचा किरण दाखविलेला नाही.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर