शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे विधानसभा अधिवेशन, अर्थसंकल्प केवळ ‘उपचार?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 19:40 IST

गोवा विधानसभेचे तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन ‘शांततेने’ पार पडले. शांततेने एवढय़ाचसाठी कारण विरोधी काँग्रेसला त्यांच्याकडे योग्य गणसंख्या असूनही सरकारला नामोहरम करता आले नाही.

- राजू नायक

गोवा विधानसभेचे तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन ‘शांततेने’ पार पडले. शांततेने एवढय़ाचसाठी कारण विरोधी काँग्रेसला त्यांच्याकडे योग्य गणसंख्या असूनही सरकारला नामोहरम करता आले नाही. काँग्रेस पक्षाने पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला खाली खेचण्यासाठी नव्याने हालचाली चालविलेल्या आहेत. परंतु काही आमदार फोडून, मगो पक्षाला बंडखोरी करण्यास प्रवृत्त करून भागणार नाही. हे सरकार कसे निष्क्रिय आहे, ते त्यांना लोकांच्या मनावर बिंबवावे लागेल. विधानसभेत त्यांचा हा प्रतिकार जाणवला नाही.

पर्रीकरांनी मांडलेला अर्थसंकल्प किंवा राज्यपालांचे अभिभाषण ही विरोधकांना सरकारचे वाभाडे काढण्यासाठी योग्य संधी होती. अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी अर्थसंकल्प हा केवळ एक उपचार असे म्हटले. ज्या पद्धतीने हा अर्थसंकल्प मांडला, ती गोवेकरांची चेष्टा होती, गोव्याच्या भवितव्यावरच सरकारने सर्जिकल स्ट्राइक केला, असे रमाकांत खलप म्हणाले. परंतु त्यांच्या पक्षाच्या सभागृहातील सदस्यांना विनियोग विधेयक मंजूर करताना सरकारला पेचात आणण्याची संधी होती, ती त्यांनी गमावली. जे सरकार पर्रीकरांच्या आजारामुळे लुळेपांगळे बनले आहे- ज्या सरकारमधील मंत्री सतत वादात असतात व एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्यात धन्यता मानतात- त्या सरकारचे वाभाडे काढण्याची संधी काँग्रेसने गमावली.

मगो पक्ष सरकारातून बाहेर पडण्यास उत्सुक आहे असे वातावरण आहे. त्यांना सरकारातील दुसरा घटक पक्ष गोवा फॉरवर्डने तसे करण्याचे जाहीर आव्हान दिले आहे. मगोपने पाठिंबा काढला तर आम्ही नवे सदस्य उभे करू असे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. मगोपच्या तीन सदस्यांपैकी दोन सदस्य यापूर्वीच भाजपाच्या संपर्कात आहेत व काँग्रेसच्या काही सदस्यांनाही सत्ताधारी बनण्याचे डोहाळे लागले आहेत. दुस-या बाजूला भाजपाचेही काही सदस्य काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

अशा राजकीय घडामोडी तेजीत असतात तेव्हा विरोधी पक्षाला सरकारला अडचणीत आणण्याचा डाव खेळावा लागतो. सरकारचे कमकुवत संख्याबळ दाखवून देण्याचीही ती संधी असते.

या अधिवेशनाची एकमेव उपलब्धी म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची उपस्थिती. पर्रीकरांनी ज्या प्रकारे- अत्यंत आजारी असताना- चालता-व्यवस्थित बोलताही येत नसताना खिंड लढविली ती लोकांच्या, पत्रकारांच्या कायम स्मरणात राहील. त्यांना बोलताना-वाचताना-चालताना दोन सुरक्षा रक्षकांनी पकडावे लागत असे. त्यांच्याबरोबर एक डॉक्टर ठेवण्यात आला होता. आवाज अस्पष्ट होता; परंतु त्यातूनही हा माणूस जिद्दीनेच नाही तर त्यांनीच म्हटल्याप्रमाणे - जे त्यांच्यावरच्या ‘उरी’ चित्रपटातले वाक्य ‘जोश’ दाखवतो- ही गोष्ट संस्मरणीय, वैशिष्टय़पूर्ण आहे. याच पर्रीकरांनी दोन दिवसांपूर्वी नवीन आकर्षक मांडवी पुलाचे उद्घाटन केले. त्यांना पाहून लोक खुश झाले. मात्र, सरकारला ते वेग देऊन जनतेचे समाधान करू शकले असते तर लोकांचा आनंद द्विगुणीत झाला असता. त्यानंतर पर्रीकर तातडीने दिल्लीला वैद्यकीय इलाजासाठी गेले.

परंतु, केवळ ‘इच्छे’वर सरकार चालत नाही. नेतृत्व वेगवान पाहिजे, मंत्री कार्यक्षम आणि धाडसी हवेत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने एकवाक्यता दाखवायला हवी. पर्रीकर आजारी असल्यापासून गेले वर्षभर सरकार अडखळत आहे. विरोधकांनीही फारसा आशेचा किरण दाखविलेला नाही.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर