शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

अस्मानी,सुलतानी अपेक्षाभंग!

By admin | Updated: October 11, 2016 04:13 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, अकोला व वाशिम जिल्ह्यांचा दौरा शुक्रवारी पार पडला. या दौऱ्याला शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अस्मानी संकटाची

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, अकोला व वाशिम जिल्ह्यांचा दौरा शुक्रवारी पार पडला. या दौऱ्याला शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अस्मानी संकटाची किनार होती. आधी पावसाच्या आगमनाला झालेल्या विलंबामुळे, नंतर त्याने मारलेल्या दीर्घ दडीमुळे आणि आता परतीच्या मार्गावर असताना तो अनावश्यकरीत्या रेंगाळल्यामुळे, सलग चौथ्या वर्षी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. एक वर्ष अतिवृष्टी आणि दोन वर्षे अवर्षण, अशी सलग तीन वर्षे खराब गेल्यावर, या वर्षी वाईट प्रारंभानंतर दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित विलसित होते. गेल्या तीन वर्षांची कसर या वर्षी भरून निघेल, अशी आशा त्याला वाटू लागली असतानाच, पावसाने आधी नेमकी गरजेच्या वेळी दडी मारली आणि मग परतताना घात केला. पावसाच्या दडीमुळे हातातोंडाशी आलेला मूग गेला आणि मग परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने, उडीद, सोयाबीन, कपाशीलाही फटका बसला.या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत असतानाच, मुख्यमंत्र्यांचा दौरा घोषित झाला. व्यवस्था परिवर्तनाची ग्वाही देऊन सत्तारुढ झालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री दौऱ्यावर येत असल्याने, नक्कीच आपल्यासाठी काही तरी खूशखबर असेल, अशी आशा शेतकऱ्याला वाटू लागली होती; पण अकोला शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन देऊन आणि वाशिममध्ये समृद्धी महामार्गाचे गुणगाण करून, मुख्यमंत्री रवाना झाले. पश्चिम विदर्भात आज ओला दुष्काळ जरी नाही, तरी ओला दुष्काळसदृश परिस्थिती नक्कीच आहे. परतीचा पाऊस आणखी थोडा लांबला, तर ओला दुष्काळ नक्कीच म्हणावा लागेल. मूग, उडीद, सोयाबीन ही पिके आजच पन्नास टक्के हातची गेली आहेत. कपाशीवरही रोगराईचे संकट घोंगावू लागले आहे. एकट्या तुरीचे पीक काय ते बऱ्या अवस्थेत आहे. कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकरांनी वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने, सर्वेक्षण न करता सरसकट नुकसानभरपाई देण्याचे सूतोवाच केले खरे; पण उपस्थित शेतकरी काही त्यामुळे आश्वस्त झाल्यासारखे वाटले नाहीत. अन् का व्हावे त्यांनी? मोठा गाजावाजा करून नव्या स्वरुपात आणण्यात आलेल्या पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना जे अनुभव येत आहेत, ते बघू जाता त्यांची साशंकता योग्यच म्हणावी लागेल.एकीकडे शेतकऱ्यांना शासनाकडून असलेली मदतीच्या हाताची अपेक्षा पूर्ण होत नसताना, दुसरीकडे सरकार त्यांच्याकडून समृद्धी महामार्गासाठी पुन्हा एकदा जमिनी घेऊ बघत आहे. वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमधील अनेक शेतकरी या महामार्गामुळे भूमिहीन होणार आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी समृद्धी महामार्ग आवश्यकच आहे. त्याबद्दल किंतू असण्याचे काही कारणच नाही; पण महामार्गासाठी आवश्यक असलेली जमीन ज्यांच्याकडून घेतली जाणार आहे, त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याची जबाबदारी शासनाची नाही का? मुख्यमंत्र्यांनी वाशिम येथील भाषणातून तसा प्रयत्न नक्कीच केला; पण यापूर्वी ज्या प्रकल्पांसाठी जमिनी घेण्यात आल्या, त्या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाची अजूनही पूर्ती झाली नसल्याने, शेतकऱ्यांच्या मनात धाकधुक असेल, तर त्यामध्ये चुकीचे ते काय? आज राज्यात सर्वत्र एक प्रकारची विचित्र अस्वस्थता जाणवत आहे. विविध समाज घटक त्यांची नाराजी रस्त्यांवर उतरून जाहीररीत्या प्रकट करीत आहेत. शेतकरी वर्गदेखील, मग तो ऊस उत्पादक असेल, बागायतदार असेल, वा कोरडवाहू शेती करणारा असेल, सरकारवर नक्कीच नाराज आहे. नाराजी प्रकट करण्यासाठी तोसुद्धा रस्त्यावर उतरला, तर सरकारसमोर बाका प्रसंग निर्माण होईल. सरकारने हे भान बाळगणे गरजेचे आहे. - रवी टाले