शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

अस्मानी,सुलतानी अपेक्षाभंग!

By admin | Updated: October 11, 2016 04:13 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, अकोला व वाशिम जिल्ह्यांचा दौरा शुक्रवारी पार पडला. या दौऱ्याला शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अस्मानी संकटाची

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, अकोला व वाशिम जिल्ह्यांचा दौरा शुक्रवारी पार पडला. या दौऱ्याला शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अस्मानी संकटाची किनार होती. आधी पावसाच्या आगमनाला झालेल्या विलंबामुळे, नंतर त्याने मारलेल्या दीर्घ दडीमुळे आणि आता परतीच्या मार्गावर असताना तो अनावश्यकरीत्या रेंगाळल्यामुळे, सलग चौथ्या वर्षी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. एक वर्ष अतिवृष्टी आणि दोन वर्षे अवर्षण, अशी सलग तीन वर्षे खराब गेल्यावर, या वर्षी वाईट प्रारंभानंतर दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित विलसित होते. गेल्या तीन वर्षांची कसर या वर्षी भरून निघेल, अशी आशा त्याला वाटू लागली असतानाच, पावसाने आधी नेमकी गरजेच्या वेळी दडी मारली आणि मग परतताना घात केला. पावसाच्या दडीमुळे हातातोंडाशी आलेला मूग गेला आणि मग परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने, उडीद, सोयाबीन, कपाशीलाही फटका बसला.या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत असतानाच, मुख्यमंत्र्यांचा दौरा घोषित झाला. व्यवस्था परिवर्तनाची ग्वाही देऊन सत्तारुढ झालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री दौऱ्यावर येत असल्याने, नक्कीच आपल्यासाठी काही तरी खूशखबर असेल, अशी आशा शेतकऱ्याला वाटू लागली होती; पण अकोला शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन देऊन आणि वाशिममध्ये समृद्धी महामार्गाचे गुणगाण करून, मुख्यमंत्री रवाना झाले. पश्चिम विदर्भात आज ओला दुष्काळ जरी नाही, तरी ओला दुष्काळसदृश परिस्थिती नक्कीच आहे. परतीचा पाऊस आणखी थोडा लांबला, तर ओला दुष्काळ नक्कीच म्हणावा लागेल. मूग, उडीद, सोयाबीन ही पिके आजच पन्नास टक्के हातची गेली आहेत. कपाशीवरही रोगराईचे संकट घोंगावू लागले आहे. एकट्या तुरीचे पीक काय ते बऱ्या अवस्थेत आहे. कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकरांनी वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने, सर्वेक्षण न करता सरसकट नुकसानभरपाई देण्याचे सूतोवाच केले खरे; पण उपस्थित शेतकरी काही त्यामुळे आश्वस्त झाल्यासारखे वाटले नाहीत. अन् का व्हावे त्यांनी? मोठा गाजावाजा करून नव्या स्वरुपात आणण्यात आलेल्या पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना जे अनुभव येत आहेत, ते बघू जाता त्यांची साशंकता योग्यच म्हणावी लागेल.एकीकडे शेतकऱ्यांना शासनाकडून असलेली मदतीच्या हाताची अपेक्षा पूर्ण होत नसताना, दुसरीकडे सरकार त्यांच्याकडून समृद्धी महामार्गासाठी पुन्हा एकदा जमिनी घेऊ बघत आहे. वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमधील अनेक शेतकरी या महामार्गामुळे भूमिहीन होणार आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी समृद्धी महामार्ग आवश्यकच आहे. त्याबद्दल किंतू असण्याचे काही कारणच नाही; पण महामार्गासाठी आवश्यक असलेली जमीन ज्यांच्याकडून घेतली जाणार आहे, त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याची जबाबदारी शासनाची नाही का? मुख्यमंत्र्यांनी वाशिम येथील भाषणातून तसा प्रयत्न नक्कीच केला; पण यापूर्वी ज्या प्रकल्पांसाठी जमिनी घेण्यात आल्या, त्या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाची अजूनही पूर्ती झाली नसल्याने, शेतकऱ्यांच्या मनात धाकधुक असेल, तर त्यामध्ये चुकीचे ते काय? आज राज्यात सर्वत्र एक प्रकारची विचित्र अस्वस्थता जाणवत आहे. विविध समाज घटक त्यांची नाराजी रस्त्यांवर उतरून जाहीररीत्या प्रकट करीत आहेत. शेतकरी वर्गदेखील, मग तो ऊस उत्पादक असेल, बागायतदार असेल, वा कोरडवाहू शेती करणारा असेल, सरकारवर नक्कीच नाराज आहे. नाराजी प्रकट करण्यासाठी तोसुद्धा रस्त्यावर उतरला, तर सरकारसमोर बाका प्रसंग निर्माण होईल. सरकारने हे भान बाळगणे गरजेचे आहे. - रवी टाले