शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाणाचा अश्वमेध यज्ञ !

By सचिन जवळकोटे | Updated: June 21, 2018 00:53 IST

‘मातोश्री’वर भलतीच लगबग सुरू झालेली. अनेक उपसरदार अन् उप-उपसरदारांची ये-जा होऊ लागलेली.

‘मातोश्री’वर भलतीच लगबग सुरू झालेली. अनेक उपसरदार अन् उप-उपसरदारांची ये-जा होऊ लागलेली. महालाच्या खिडक्यांमधून धूर बाहेर पडू लागलेला. खरंतर, ‘मातोश्री’लगतच्या शेजाऱ्यांना गेल्या चार वर्षांत धूर तसा नवीन नव्हता. तिकडं ‘नमों’चा उदो-उदो झाला की इकडं म्हणे ‘धूर’ अधिकच सुटायचा. जळायचा वास पसरायचा. मात्र आजचा धूर सुगंधी होता. उत्साहित करणारा होता.आतल्या खास गृहामध्ये चक्क यज्ञ पेटविण्यात आलेला. समोर मंचकावर चक्रवर्ती नरेश ऊर्फ ‘उद्धो’ महाराज बसलेले. त्यांच्या शेजारी छोटे ‘आदित्य’ राजेही. ‘जय पिताऽऽ जय पुत्रऽऽ’च्या मंत्रघोषात अनेकांच्या नेतृत्वाची ‘आहुती’ देण्यात येऊ लागलेली. यात नाशिकची ‘स्ट्राँग आर्म’वाली फळं होती. कोकणातल्या कणकवलीचा ‘नारायण नागबळी’ही देण्यात आलेला. हे सारं कमी पडलं की काय म्हणून, ‘कृष्णकुंज’वर कधीकाळी ‘शिशिर’ ॠतूत फुललेली फळंही बाजूला काढून ठेवलेली.या यज्ञाचं नाव होतं ‘अश्वमेध’... होय. स्वबळाचा नारा देत अवघं जग जिंकण्याची भीष्मप्रतिज्ञा होती. ‘देशभरात पिताश्रींची पताका फडकावी,’ हे ‘मातोश्री’वरील ‘आदित्य’ राजेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘उद्धो’ महाराजांनी सोडलेला महान संकल्प होता. ‘पंतप्रधान न होताही देशाचं सक्षम नेतृत्व करण्यासाठी काय-काय करायला हवं,’ याची अनुभवी टीप त्यांनी ‘राहुलबाबां’कडून घेतलेली... खरंतर हा सल्ला त्यांना ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्याकडून घ्यायचा होता. मात्र, अलीकडच्या काळात ‘काका’ म्हणे ‘मला तसं म्हणायचं नव्हतं!’ ही कादंबरी लिहिण्यात मश्गुल होते. कदाचित ‘पुणेरी पगडी’ प्रकरणाचा ‘इम्पॅक्ट’ असावा. गेल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीतील त्यांच्या शेकडो बुद्धिभेदी संवादाचा उल्लेख म्हणे या पुस्तकात होणार होता. असो.‘उद्धों’नी टाळी वाजवून सरदारांना जवळ बोलाविलं, ‘मोडकी-तोडकी का होईना; परंतु इतर सरदारांपेक्षा संजयराव चांगली हिंदी बोलतात. तेव्हा एक घोडा घेऊन त्यांनी दिल्लीकडं कूच करावी. उत्तरेतील प्रत्येक गावात आपली शाखा स्थापन करावी. किमान वेशीवर बोर्ड तरी लावावेत.’ असा आदेश दिला... कारण ‘रौतांची लेखणी अन् बानुगडेंची वाणी’ ही दोन हुकुमी शस्त्रं होती त्यांची. त्यानंतर मुंबई महापालिकेतल्या ‘विश्वनाथ अण्णां’ना दक्षिणेकडं कर्नाटकात जाऊन जुन्या नातलगांचा शोध घेण्याचा आदेश त्यांनी दिला. भविष्यात कुमारस्वामींशी तह करण्यासाठी म्हणे तिथंही फौजेची गरज होती. ‘दिवाकररावऽऽ तुमच्या शिवशाही अन् शिवनेरीसोबत दोन-चार घोडेही उधळू द्या.’ असं महाराजांनी सांगताच सरदार गडबडले; कारण ताफ्यातल्या किती भंगार गाड्या बंद अन् किती कर्मचारी संपात, याचा ताळमेळ अजूनही लागला नव्हता....एवढ्यात धाकट्या महाराजांनी बानुगडेंच्या नितीनबापूंना फर्मावलं, ‘पक्षाच्या जगज्जेतेपदाची द्वाही तुम्ही तुमच्या भाषणातून देशोदेशी फिरवा. शक्य झाल्यास अवघ्या ब्रह्मांडावर आपलं राज्य निर्माण करा.’ तेव्हा डोकं खाजवत नितीनबापू हळूच पुटपुटले, ‘अगोदर माझ्या सातारी राजधानीत तरी किमान एक-दोन मेंबर निवडून आणू द्या. जिल्ह्यात पक्षाचे जेवढे प्रमुख, तेवढे सदस्यही नाहीत झेडपीत.’