शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

धनुष्यबाणाचा अश्वमेध यज्ञ !

By सचिन जवळकोटे | Updated: June 21, 2018 00:53 IST

‘मातोश्री’वर भलतीच लगबग सुरू झालेली. अनेक उपसरदार अन् उप-उपसरदारांची ये-जा होऊ लागलेली.

‘मातोश्री’वर भलतीच लगबग सुरू झालेली. अनेक उपसरदार अन् उप-उपसरदारांची ये-जा होऊ लागलेली. महालाच्या खिडक्यांमधून धूर बाहेर पडू लागलेला. खरंतर, ‘मातोश्री’लगतच्या शेजाऱ्यांना गेल्या चार वर्षांत धूर तसा नवीन नव्हता. तिकडं ‘नमों’चा उदो-उदो झाला की इकडं म्हणे ‘धूर’ अधिकच सुटायचा. जळायचा वास पसरायचा. मात्र आजचा धूर सुगंधी होता. उत्साहित करणारा होता.आतल्या खास गृहामध्ये चक्क यज्ञ पेटविण्यात आलेला. समोर मंचकावर चक्रवर्ती नरेश ऊर्फ ‘उद्धो’ महाराज बसलेले. त्यांच्या शेजारी छोटे ‘आदित्य’ राजेही. ‘जय पिताऽऽ जय पुत्रऽऽ’च्या मंत्रघोषात अनेकांच्या नेतृत्वाची ‘आहुती’ देण्यात येऊ लागलेली. यात नाशिकची ‘स्ट्राँग आर्म’वाली फळं होती. कोकणातल्या कणकवलीचा ‘नारायण नागबळी’ही देण्यात आलेला. हे सारं कमी पडलं की काय म्हणून, ‘कृष्णकुंज’वर कधीकाळी ‘शिशिर’ ॠतूत फुललेली फळंही बाजूला काढून ठेवलेली.या यज्ञाचं नाव होतं ‘अश्वमेध’... होय. स्वबळाचा नारा देत अवघं जग जिंकण्याची भीष्मप्रतिज्ञा होती. ‘देशभरात पिताश्रींची पताका फडकावी,’ हे ‘मातोश्री’वरील ‘आदित्य’ राजेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘उद्धो’ महाराजांनी सोडलेला महान संकल्प होता. ‘पंतप्रधान न होताही देशाचं सक्षम नेतृत्व करण्यासाठी काय-काय करायला हवं,’ याची अनुभवी टीप त्यांनी ‘राहुलबाबां’कडून घेतलेली... खरंतर हा सल्ला त्यांना ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्याकडून घ्यायचा होता. मात्र, अलीकडच्या काळात ‘काका’ म्हणे ‘मला तसं म्हणायचं नव्हतं!’ ही कादंबरी लिहिण्यात मश्गुल होते. कदाचित ‘पुणेरी पगडी’ प्रकरणाचा ‘इम्पॅक्ट’ असावा. गेल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीतील त्यांच्या शेकडो बुद्धिभेदी संवादाचा उल्लेख म्हणे या पुस्तकात होणार होता. असो.‘उद्धों’नी टाळी वाजवून सरदारांना जवळ बोलाविलं, ‘मोडकी-तोडकी का होईना; परंतु इतर सरदारांपेक्षा संजयराव चांगली हिंदी बोलतात. तेव्हा एक घोडा घेऊन त्यांनी दिल्लीकडं कूच करावी. उत्तरेतील प्रत्येक गावात आपली शाखा स्थापन करावी. किमान वेशीवर बोर्ड तरी लावावेत.’ असा आदेश दिला... कारण ‘रौतांची लेखणी अन् बानुगडेंची वाणी’ ही दोन हुकुमी शस्त्रं होती त्यांची. त्यानंतर मुंबई महापालिकेतल्या ‘विश्वनाथ अण्णां’ना दक्षिणेकडं कर्नाटकात जाऊन जुन्या नातलगांचा शोध घेण्याचा आदेश त्यांनी दिला. भविष्यात कुमारस्वामींशी तह करण्यासाठी म्हणे तिथंही फौजेची गरज होती. ‘दिवाकररावऽऽ तुमच्या शिवशाही अन् शिवनेरीसोबत दोन-चार घोडेही उधळू द्या.’ असं महाराजांनी सांगताच सरदार गडबडले; कारण ताफ्यातल्या किती भंगार गाड्या बंद अन् किती कर्मचारी संपात, याचा ताळमेळ अजूनही लागला नव्हता....एवढ्यात धाकट्या महाराजांनी बानुगडेंच्या नितीनबापूंना फर्मावलं, ‘पक्षाच्या जगज्जेतेपदाची द्वाही तुम्ही तुमच्या भाषणातून देशोदेशी फिरवा. शक्य झाल्यास अवघ्या ब्रह्मांडावर आपलं राज्य निर्माण करा.’ तेव्हा डोकं खाजवत नितीनबापू हळूच पुटपुटले, ‘अगोदर माझ्या सातारी राजधानीत तरी किमान एक-दोन मेंबर निवडून आणू द्या. जिल्ह्यात पक्षाचे जेवढे प्रमुख, तेवढे सदस्यही नाहीत झेडपीत.’