शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भावर अस्मानी संकट, पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:29 IST

विदर्भात पाऊस समाधानकारक नाही. पिकांची अवस्था वरकरणी चांगली दिसत असली तरी पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण वाढत असून कास्तकार पुन्हा अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकला आहे.

विदर्भात पाऊस समाधानकारक नाही. पिकांची अवस्था वरकरणी चांगली दिसत असली तरी पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण वाढत असून कास्तकार पुन्हा अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकला आहे. सोयाबीन पेरले; पण शेंगाच आल्या नाही. केलेल्या मेहनतीचे चीज झाले नाही, म्हणून अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवतो. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे गोंदिया, भंडारा या धानपट्ट्यातील बहुतांश धान उत्पादक रोवणीच करीत नाहीत, तेव्हा या संकटाचा अंदाज येतो. यंदा धानाचे उत्पादन निम्म्यावर येण्याची दाट शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा उद्रेक आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख ६३ हजार क्षेत्रापैकी किमान दीड लाख हेक्टरमधील कपाशी पिकावर सध्या लाल्याच्या आक्रमणासह गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झाला आहे. मूग, उडीद या पिकावर पावसाच्या लहरीपणानेच पाणी फेरले. शेतकºयांची अवस्था बिकट आहे. अपवाद वगळता विदर्भातील जलाशयांमधील जलसाठा चिंताजनक आहे. गडचिरोलीत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी आणखी पावसाची गरज आहे. गेले दोन दिवस दमदार बरसल्याने अनेक जलाशयांत वाढलेला साठा जलसंकटापासून दिलासा देणारा असला तरी यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीत. केवळ एक मध्यम आणि दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. शहराला पाणी पुरवठा करणा-या निळोणा प्रकल्पात तर केवळ पाच टक्केच जलसाठा असल्याने पाणी टंचाईचे संकट आ वासून आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सिंचन प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. आधीच सुल्तानी संकटात भरडला जाणारा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत पुरता हतबल झालेला दिसतो. रबीच्या पिकावर बरेच काही अवलंबून असते. शेतकºयांसाठी हेच त्याचे वर्षभराचे बजेट; पण पाऊस आला नाही तर हाती आलेले पीकही गमविण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावली जाऊ शकते. आशिया खंडातील मोठ्या महाऔष्णिक वीज केंद्रांपैकी एक चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि चंद्रपूरकरांची तहान भागविणा-या इरई धरणात असलेला ३४.५० टक्के जलसाठा राज्याच्या वीज निर्मितीचे गणित बिघडविणारा ठरू शकतो. २३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा डोलारा इरई धरणाच्याच पाण्यावर आहे. त्यामुळे अत्यल्प जलसाठ्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होणार, हे निश्चित.