शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भावर अस्मानी संकट, पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:29 IST

विदर्भात पाऊस समाधानकारक नाही. पिकांची अवस्था वरकरणी चांगली दिसत असली तरी पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण वाढत असून कास्तकार पुन्हा अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकला आहे.

विदर्भात पाऊस समाधानकारक नाही. पिकांची अवस्था वरकरणी चांगली दिसत असली तरी पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण वाढत असून कास्तकार पुन्हा अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकला आहे. सोयाबीन पेरले; पण शेंगाच आल्या नाही. केलेल्या मेहनतीचे चीज झाले नाही, म्हणून अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवतो. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे गोंदिया, भंडारा या धानपट्ट्यातील बहुतांश धान उत्पादक रोवणीच करीत नाहीत, तेव्हा या संकटाचा अंदाज येतो. यंदा धानाचे उत्पादन निम्म्यावर येण्याची दाट शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा उद्रेक आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख ६३ हजार क्षेत्रापैकी किमान दीड लाख हेक्टरमधील कपाशी पिकावर सध्या लाल्याच्या आक्रमणासह गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झाला आहे. मूग, उडीद या पिकावर पावसाच्या लहरीपणानेच पाणी फेरले. शेतकºयांची अवस्था बिकट आहे. अपवाद वगळता विदर्भातील जलाशयांमधील जलसाठा चिंताजनक आहे. गडचिरोलीत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी आणखी पावसाची गरज आहे. गेले दोन दिवस दमदार बरसल्याने अनेक जलाशयांत वाढलेला साठा जलसंकटापासून दिलासा देणारा असला तरी यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीत. केवळ एक मध्यम आणि दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. शहराला पाणी पुरवठा करणा-या निळोणा प्रकल्पात तर केवळ पाच टक्केच जलसाठा असल्याने पाणी टंचाईचे संकट आ वासून आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सिंचन प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. आधीच सुल्तानी संकटात भरडला जाणारा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत पुरता हतबल झालेला दिसतो. रबीच्या पिकावर बरेच काही अवलंबून असते. शेतकºयांसाठी हेच त्याचे वर्षभराचे बजेट; पण पाऊस आला नाही तर हाती आलेले पीकही गमविण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावली जाऊ शकते. आशिया खंडातील मोठ्या महाऔष्णिक वीज केंद्रांपैकी एक चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि चंद्रपूरकरांची तहान भागविणा-या इरई धरणात असलेला ३४.५० टक्के जलसाठा राज्याच्या वीज निर्मितीचे गणित बिघडविणारा ठरू शकतो. २३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा डोलारा इरई धरणाच्याच पाण्यावर आहे. त्यामुळे अत्यल्प जलसाठ्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होणार, हे निश्चित.