शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

विदर्भावर अस्मानी संकट, पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:29 IST

विदर्भात पाऊस समाधानकारक नाही. पिकांची अवस्था वरकरणी चांगली दिसत असली तरी पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण वाढत असून कास्तकार पुन्हा अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकला आहे.

विदर्भात पाऊस समाधानकारक नाही. पिकांची अवस्था वरकरणी चांगली दिसत असली तरी पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण वाढत असून कास्तकार पुन्हा अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकला आहे. सोयाबीन पेरले; पण शेंगाच आल्या नाही. केलेल्या मेहनतीचे चीज झाले नाही, म्हणून अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवतो. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे गोंदिया, भंडारा या धानपट्ट्यातील बहुतांश धान उत्पादक रोवणीच करीत नाहीत, तेव्हा या संकटाचा अंदाज येतो. यंदा धानाचे उत्पादन निम्म्यावर येण्याची दाट शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा उद्रेक आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख ६३ हजार क्षेत्रापैकी किमान दीड लाख हेक्टरमधील कपाशी पिकावर सध्या लाल्याच्या आक्रमणासह गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झाला आहे. मूग, उडीद या पिकावर पावसाच्या लहरीपणानेच पाणी फेरले. शेतकºयांची अवस्था बिकट आहे. अपवाद वगळता विदर्भातील जलाशयांमधील जलसाठा चिंताजनक आहे. गडचिरोलीत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी आणखी पावसाची गरज आहे. गेले दोन दिवस दमदार बरसल्याने अनेक जलाशयांत वाढलेला साठा जलसंकटापासून दिलासा देणारा असला तरी यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीत. केवळ एक मध्यम आणि दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. शहराला पाणी पुरवठा करणा-या निळोणा प्रकल्पात तर केवळ पाच टक्केच जलसाठा असल्याने पाणी टंचाईचे संकट आ वासून आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सिंचन प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. आधीच सुल्तानी संकटात भरडला जाणारा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत पुरता हतबल झालेला दिसतो. रबीच्या पिकावर बरेच काही अवलंबून असते. शेतकºयांसाठी हेच त्याचे वर्षभराचे बजेट; पण पाऊस आला नाही तर हाती आलेले पीकही गमविण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावली जाऊ शकते. आशिया खंडातील मोठ्या महाऔष्णिक वीज केंद्रांपैकी एक चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि चंद्रपूरकरांची तहान भागविणा-या इरई धरणात असलेला ३४.५० टक्के जलसाठा राज्याच्या वीज निर्मितीचे गणित बिघडविणारा ठरू शकतो. २३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा डोलारा इरई धरणाच्याच पाण्यावर आहे. त्यामुळे अत्यल्प जलसाठ्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होणार, हे निश्चित.