शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

विदर्भावर अस्मानी संकट, पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:29 IST

विदर्भात पाऊस समाधानकारक नाही. पिकांची अवस्था वरकरणी चांगली दिसत असली तरी पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण वाढत असून कास्तकार पुन्हा अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकला आहे.

विदर्भात पाऊस समाधानकारक नाही. पिकांची अवस्था वरकरणी चांगली दिसत असली तरी पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण वाढत असून कास्तकार पुन्हा अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकला आहे. सोयाबीन पेरले; पण शेंगाच आल्या नाही. केलेल्या मेहनतीचे चीज झाले नाही, म्हणून अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवतो. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे गोंदिया, भंडारा या धानपट्ट्यातील बहुतांश धान उत्पादक रोवणीच करीत नाहीत, तेव्हा या संकटाचा अंदाज येतो. यंदा धानाचे उत्पादन निम्म्यावर येण्याची दाट शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा उद्रेक आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख ६३ हजार क्षेत्रापैकी किमान दीड लाख हेक्टरमधील कपाशी पिकावर सध्या लाल्याच्या आक्रमणासह गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झाला आहे. मूग, उडीद या पिकावर पावसाच्या लहरीपणानेच पाणी फेरले. शेतकºयांची अवस्था बिकट आहे. अपवाद वगळता विदर्भातील जलाशयांमधील जलसाठा चिंताजनक आहे. गडचिरोलीत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी आणखी पावसाची गरज आहे. गेले दोन दिवस दमदार बरसल्याने अनेक जलाशयांत वाढलेला साठा जलसंकटापासून दिलासा देणारा असला तरी यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीत. केवळ एक मध्यम आणि दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. शहराला पाणी पुरवठा करणा-या निळोणा प्रकल्पात तर केवळ पाच टक्केच जलसाठा असल्याने पाणी टंचाईचे संकट आ वासून आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सिंचन प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. आधीच सुल्तानी संकटात भरडला जाणारा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत पुरता हतबल झालेला दिसतो. रबीच्या पिकावर बरेच काही अवलंबून असते. शेतकºयांसाठी हेच त्याचे वर्षभराचे बजेट; पण पाऊस आला नाही तर हाती आलेले पीकही गमविण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावली जाऊ शकते. आशिया खंडातील मोठ्या महाऔष्णिक वीज केंद्रांपैकी एक चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि चंद्रपूरकरांची तहान भागविणा-या इरई धरणात असलेला ३४.५० टक्के जलसाठा राज्याच्या वीज निर्मितीचे गणित बिघडविणारा ठरू शकतो. २३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा डोलारा इरई धरणाच्याच पाण्यावर आहे. त्यामुळे अत्यल्प जलसाठ्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होणार, हे निश्चित.