शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

कलावंत आले धावून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 13:37 IST

वेगवेगळ्या स्पर्धा, मेळावे, भूमिपूजन, उद्घाटने आयोजित करुन कलावंतांना बोलावले जात आहे.

मिलिंद कुलकर्णीराजकीय नेते आणि कलावंत यांच्यात साम्यस्थळे खूप आहेत. दोघेही उत्कृष्ट अभिनय, वक्तृत्व, लेखन याद्वारे तमाम रसिकांचे मोठे रंजन करीत असतात. त्यामुळे या दोघांचा एकमेकांच्या क्षेत्रातील वावरदेखील सहज, उत्स्फूर्त असतो. राजकीय मंडळी ही कलावंत म्हणून छोट्या, मोठ्या पडद्यावर, रंगमंचावर अवतरतात तर पडद्यावरील कलावंत राजकीय व्यासपीठावरुन भूमिका वठवतात.भारतीय राजकारणात अशी खूप उदाहरणे आहेत. अर्थात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर दोन-तीन दशके स्वातंत्र्य चळवळ, देशाची उभारणी हे उद्दिष्ट ठेवून कलावंत मंडळी राजकीय लोकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाली होती. दोघांमध्ये फारसे अंतर नव्हते. राजकीय पक्षांमध्ये कलावंतांचे मोठे स्थान होते. विशेषत: साम्यवादी, समाजवादी पक्षांमध्ये ते पूर्वीही होते आणि अलिकडे प्रमाण कमी असले तरी आहेच. संयुक्त महाराष्टÑाच्या आंदोलनात पहिल्यांदा राजकीय मंडळी आणि कलावंतांमध्ये संघर्ष बघायला मिळाला. आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, निळू फुले यांच्यासारखे कलावंत सरकारच्या विरोधात उभे ठाकले होते. हे चित्र नंतर आणीबाणीच्यावेळी पुन्हा एकदा दिसून आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रयत्नाला त्यावेळी कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राने मोठा विरोध केला. एखादी कलाकृती, चित्रपट, पुस्तकाला समूहपातळीवर विरोध होण्याच्या घटना वारंवार घडत असतात, यावेळी संख्येने कमी असले तरी कलावंत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या अतिक्रमणाला विरोध करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावरुन कलावंतांनी केलेली पुरस्कारवापसी मोठा चर्चेचा विषय ठरली होती.एन.टी.रामाराव, करुणानिधी, जयललिता, अमिताभ बच्चन, गोविंदा, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, जया बच्चन, जयाप्रदा, स्मृती इराणी असे अनेक कलावंत राजकारणात आली, त्यापैकी काही यशस्वी झाली तर काही अपयशी ठरली. कलावंतांचा सन्मान करण्यासाठी राष्टÑपती त्यांना राज्यसभेत नियुक्त करीत असतात. लता मंगेशकर, वैजयंतीमाला, रेखा, जावेद अख्तर यांच्यासारख्या कलावंतांनी ही भूमिकादेखील उत्तमपणे वठवली. पद्म पुरस्कारांनीदेखील या कलावंतांना गौरविले जाते. केंद्र व राज्य शासनाचे वेगवेगळे पुरस्कार, तसेच कला, साहित्य व सांस्कृतिक विषयाशी निगडीत समित्यांवर स्थान देऊन त्यांचा सन्मान केला जात असतो.राजकीय मंडळी पाच वर्षे उत्तम अभिनय करुन विकासाचा आभास निर्माण करण्यात यशस्वी तर ठरतात, परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात त्यांना कलावंतांची मदत घ्यायची आवश्यकता भासते. यामागे बहुदा हेच कारण असावेच. पाच वर्षातील त्यांचा अभिनय पाहून जनता वीटलेली असते. आभास आणि वास्तव यातील फरक कळलेला असतो. म्हणून चवपालट सारखे खऱ्या कलावंताला उभे करुन पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जात असावा. किंवा राजकीय मंडळींची लोकप्रियता खालावत चालली की, कलावंतांच्या लोकप्रियतेचा आधार घ्यावा लागतो, असेही म्हणता येईल. पूर्वी निवडणूक काळात कलावंत प्रचारासाठी मैदानात उतरायचे. आता निवडणूक पूर्व तयारी म्हणून वेगवेगळ्या स्पर्धा, मेळावे, भूमिपूजन, उद्घाटने आयोजित करुन कलावंतांना बोलावले जात आहे.दोन्ही क्षेत्र एकमेकांशी निगडीत असल्याने बहुदा ऋणानुबंध कायम असावा.

टॅग्स :Jalgaonजळगाव