शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मुलगी ‘हाताबाहेर’ जाते? काढून घ्या तिचा मोबाइल; एवढे सगळे करून शेवटी काय मिळते?

By नंदकिशोर पाटील | Updated: July 15, 2023 09:34 IST

मोबाइलमुळे केवळ अविवाहित मुलीच संस्कृतीविरोधी गैरवर्तन करतात का? मग असेच वागणारी मुले, विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या स्त्री-पुरुषांचे मोबाइल कोण काढून घेणार?

घटना तशी जुनी आहे. दोन वर्षांपूर्वीची. पण सध्या ती बिपोरजॉय चक्रीवादळाच्या वेगाने व्हायरल होत आहे. लव्ह जिहाद, लिव्ह इन रिलेशनशिप, लव्ह मॅरेज आणि त्यातून घडलेल्या काही घटनांचा संदर्भ देत मुलींसाठी ‘सातच्या आत घरात’चे समर्थन केले जात आहे. एवढेच कशाला, गुजरातमधील ठाकोर समुदायाने घेतलेला एक निर्णय देशभर लागू करण्याची जोरदार वकालतदेखील केली जात आहे. 

आधुनिक युगातील सावित्रीच्या लेकींनी अणूपासून अंतराळापर्यंत प्रगतीची अनेक शिखरं पादाक्रांत केली तरी, त्यांच्या बाबतीत ‘चूल आणि मूल’ या पलीकडे आपला दृष्टिकोन रुंदावत नाही हेच खरे. गुजरातमधल्या ठाकोर समाजाने हाच दृष्टिकोन बाळगून मुलींच्या मोबाइल वापरावर बंदी आणली आहे ! समाजातील एखाद्या मुलीने आंतरजातीय विवाह केला तर तिच्या पालकांना जबर दंड लावण्यात येणार आहे. प्रेमसंबंध, मुली-मुलांमधील मैत्री किंवा आंतरजातीय विवाह यांचा थेट उल्लेख न करता, अल्पवयीन मुलींमध्ये मोबाइल वापरल्याने अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे सेलफोन वापरावर बंदी घालण्याची गरज आहे, असे या समाजाचे मत आहे.

ठाकोर समाजाच्या जातपंचायतीने घेतलेल्या या तालिबानी निर्णयाने अनेक प्रश्न उपस्थित होतात. ते असे की, मोबाइलमुळे केवळ अविवाहित मुलीच समाजबाह्य, संस्कृतीविरोधी गैरवर्तन करतात का? शिवाय, हा निष्कर्ष कशावरून काढण्यात आला? मग अशाच प्रकारचे वर्तन, कृती करणारी मुले किंवा विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या हातातील मोबाईल कोण काढून घेणार? मुळात आज समाजात ज्या घटना घडत आहेत, त्यास केवळ मोबाइल जबाबदार आहे का? मोबाइल हे तर केवळ एक संवादी माध्यम आहे. एखाद्या नव्या तंत्रज्ञानामुळे समाजात स्वैराचार वाढतो, असा समज करून घेणे हे केवळ विचित्र आहे. शिवाय, ते तांत्रिक साधन विशिष्ट वर्गाला वापरण्याची मनाई करणे हे तर अमानवीयच म्हटले पाहिजे. विशिष्ट वयामध्ये शारीरिक आकर्षण निर्माण होणे आणि त्यातून संबंध निर्माण होणे ही तर नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे नियमन करण्याचा जितका प्रयत्न केला जाईल, तितक्या नव्या वाटा शोधल्या जातील. 

एखाद्या मुलीने आंतरजातीय विवाह केला तर तिच्या पालकांना समाजातून वाळीत टाकण्याच्या घटना आजही घडतात. मात्र, मुलांना ती मुभा दिली जाते, हे कसे काय? कौटुंबिक नातेसंबंधातील स्त्री-पुरुष भेद पूर्वापार चालत आलेला आहेच, सामाजिक संदर्भातही याबाबतीतली प्रगती एक पाऊल पुढे, दोन पावले मागे अशीच दिसते! मंत्रिपदावरील एखादी महिला जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आहे का, असा सवाल उपस्थित करणारे लोकप्रतिनिधी पाहिले की, आपल्या समाजमनावर पुरुषसत्ताक मानसिकतेचा पगडा किती घट्ट आहे, हे दिसून येईल.

सध्या देशभर समान नागरी कायद्याचे वारे वाहू लागले आहेत. पण गंमत अशी की, एक देश-एक कायदा असला पाहिजे, अशी जोरकसपणे मागणी करणारेच गुजरातेतील ठाकोर समाजाने मुलींच्या बाबतीत घेतलेल्या एकतर्फी निर्णयाचेदेखील समर्थक आहेत! समाजातील अशा दुभंग मानसिकतेमुळेच एखादा समाजघटक मुलींवर निर्बंध लादण्याचे धाडस करू शकतो. ‘बाईपण भारी देवा’ नावाच्या मराठी सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सिनेमाला होणारी महिलांची गर्दी बरेच काही सांगून जाते. चित्रपटाच्या पात्रांशी स्वत:ला ‘रिलेट’ करू पाहणाऱ्या या प्रेक्षक वर्गाच्या मनाचा तळ गाठता आला तर अशा अनेक चित्रपटांना साजेशा ‘स्टोरीज’ मिळू शकतील. 

काही वर्षांपूर्वी ‘मिरर’ नावाचा एक लघुपट आला होता. एक नवविवाहिता मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी आरशासमोर स्वत:ला न्याहाळत उभी असते. समोरच्या आरशात तिला स्वत:चा भूतकाळ दिसू लागतो. जन्मापासून लग्नापर्यंत तिच्यावर लादण्यात आलेेले निर्णय, निर्बंध तिला आठवू लागतात. शाळकरी वयात मुलांसोबत न खेळण्याच्या बंधनापासून ते लग्नासाठी सुयोग्य वर मिळावा म्हणून नानाप्रकारची व्रतवैकल्ये, सुंदर दिसण्यासाठी बॉडीशेपिंगपर्यंत सगळे ‘प्रयोग’ तिच्यावर झालेले असतात. एवढे सगळे करून शेवटी काय मिळते? तिच्या डोळ्यांतील अश्रू.. लघुपट संपतो... प्रश्न अनुत्तरितच राहतो!

nandu.patil@lokmat.com

टॅग्स :Mobileमोबाइल