शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

कोरड्या विहिरीतील उड्या !

By किरण अग्रवाल | Updated: April 2, 2019 07:10 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी पक्षांतरे होतच असतात, तर काहीजण तिकिटाकरिता नाही; पण सत्तेच्या छायेत कायम राहण्यासाठीही राजकीय घरोबे बदलत असतात.

किरण अग्रवाल 

राजकारणात बाकी, म्हणजे पक्षनिष्ठा वगैरे काही असो वा नसो; परंतु स्वत:बद्दलचा दांडगा आत्मविश्वास असणारे नेते मोठ्या संख्येने बघायला मिळतात. समोर पराभव अगर अपयश दिसत असतानाही अनेकजण या आत्मविश्वासामुळेच स्वत:हून त्याकडे चालत जातानाही दिसतात. अर्थात, बऱ्याचदा जाणतेपणातूनही असे केले जाते, कारण पडणे निश्चित असले तरी पाडण्यासाठीच होती आमची खरी लढाई, अशी भूमिका घेऊन काहीजण लढत असतात. काही तर थांबण्याकरिता कुणाचा शब्द घेण्यासाठी देखील लढायची तयारी दर्शवतात. ‘भविष्यासाठीचा वायदा’ असा स्वच्छ वा स्पष्ट हेतू त्यामागे असतो. अशा साऱ्यांसाठी निवडणुकांचा काळ म्हणजे सुगीचे दिवस असतात. त्यामुळे आताही लोकसभा निवडणूक होत असल्याने अशाच अनेकांनी ठिकठिकाणी प्रमुख पक्षीय उमेदवारांच्या नाकात दम आणून ठेवलेला दिसून येणे स्वाभाविक म्हणायला हवे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी पक्षांतरे होतच असतात, तर काहीजण तिकिटाकरिता नाही; पण सत्तेच्या छायेत कायम राहण्यासाठीही राजकीय घरोबे बदलत असतात. याखेरीज काही असे असतात, जे बंडखोरी करून व प्रसंगी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून आपले उपद्रवमूल्य दर्शवून देण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, कमी मतदारसंख्येच्या निवडणुकीत त्यांचे गणित जुळूनही जाते कधी कधी; परंतु लोकसभेसारख्या मोठ्या मतदारसंघात तसे होणे अवघडच असते. नाशिक जिल्ह्याचेच उदाहरण घ्या, नाशिकसह पूर्वीच्या मालेगाव व आताच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंतच्या म्हणजे १९५१ ते २००४ पर्यंतच्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ११५ अपक्षांनी नशीब आजमावले; परंतु त्यापैकी एकालाही दिल्ली गाठणे शक्य झाले नाही. एकदा तर खासदार राहून नंतर अपक्ष उमेदवारी करणा-या डॉ. प्रतापराव वाघ यांना अवघ्या नऊ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. तात्पर्य इतकेच की, बंडखोरी करीत अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढणे हे साधे सोपे नाही.

खासदारकीची हॅट्ट्रिक करूनही यंदा तिकीट कापले गेलेल्या दिंडोरीतील हरिश्चंद्र चव्हाण यांनी हीच वास्तविकता लक्षात घेऊन, अपक्ष उमेदवारी म्हणजे ‘कोरड्या विहिरीतली उडी’ असल्याचे अतिशय अचूक विधान केले आहे. पण राज्यातच नव्हे; संपूर्ण देशात अशा ‘उड्या’ घेऊ पाहणाऱ्यांची संख्या वाढतेय हेच आश्चर्यकारक आहे. अर्थात, प्रारंभी उल्लेखिल्यानुसार स्वत:बद्दलच्या फाजील वा अतिआत्मविश्वासातूनच या अपक्ष उमेदवा-या वाढत आहेत हेच खरे. यात अशा उमेदवा-यांना कुणाचा विरोध असण्याचेही कारण नाही, कारण लोकशाही व्यवस्थेने तसा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. परंतु कधी कधी प्रमुख उमेदवारांची गणिते बिघडवायला त्या कारणीभूत ठरतात, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणारे नसते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारी नाकारली गेल्याने बंडखोरी करणा-या किंवा अपक्ष लढणा-यांचेही एकवेळ समजून घेता यावे; परंतु साध्या साध्या कारणाने रुसून बसणा-यांच्या नाराजीचे स्तोम हल्ली वाढत चालले आहे. पक्ष व निष्ठा यासंबंधी काही बांधिलकीच उरली नसल्याने हे घडते आहे. याच निवडणुकीतले उत्तर महाराष्ट्रातीलच एक उदाहरण घ्या, काय तर म्हणे गावात दुस-याकडे भेटायला येऊन गेलेला उमेदवार आपल्याकडे मात्र आला नाही म्हणून काँग्रेसमधील एका मातब्बर ज्येष्ठाने थेट वेगळ्या विचाराची भाषा केलेली दिसून आली. किती हा बालिशपणा? पण, उगाच किरकोळ कारणातून नजरेत भरून जाण्यास काहीजण जसे उत्सुकच असतात. तिकीट वाटपात डावलले गेलेले अन्य इच्छुक आणि असे नाराजीचे स्तोम माजवण्यास उत्सुक असणा-यांना सांभाळत लढायचे म्हणजे तेच खरे दिव्य असते. मतदारांच्या दारात जाण्यापूर्वी अशांकडे हात जोडत फिरणे मग उमेदवारासाठी गरजेचे होऊन बसते. सध्या बहुतेक ठिकाणी अशाच कोरड्या विहिरीत उड्या घेऊ पाहणा-यांच्या नाकदु-या काढण्याचे प्रयत्न चाललेले पहावयास मिळत आहेत.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcडिंडोरीnashik-pcनाशिकElectionनिवडणूक